शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘अवकाळी’च्या नुकसानीची शेतकऱ्यांना वाढीव दराने मिळणार मदत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2024 20:23 IST

गेल्या २६ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या कालावधीत जिल्ह्यात अवकाळी पावसाच्या तडाख्यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

अकोला : महिनाभरापूर्वी अवकाळी पावसाच्या तडाख्यात जिल्ह्यातील पीक नुकसानीच्या अहवालासह पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी अपेक्षित निधी मागणीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत गेल्या १९ डिसेंबर रोजी शासनाकडे सादर करण्यात आला; मात्र शासन निर्णयानुसार वाढीव दरानुसार जिल्ह्यातील मदतनिधी मागणीचा अहवाल सादर करण्याचे विभागीय आयुक्तांचे आदेश ५ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले. त्यामुळे जिल्ह्यातील ‘अवकाळी’ग्रस्त २ लाख ४४ हजार शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार आहे.

गेल्या २६ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या कालावधीत जिल्ह्यात अवकाळी पावसाच्या तडाख्यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यानुषंगाने जिल्हा प्रशासनामार्फत पीक नुकसानीचे पंचनामे करण्यात आल्यानंतर पीक नुकसानाचा अंतिम अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत गेल्या महिन्यात राज्य शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाकडे सादर करण्यात आला. त्यानुसार अवकाळी पावसाच्या तडाख्यात जिल्ह्यात २ लाख ४४ हजार ६९ शेतकऱ्यांचे १ लाख ८८ हजार ४२४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, जिल्ह्यातील संबंधित शेतकऱ्यांना पीक नुकसानीची मदत देण्यासाठी २०७ कोटी ९२ लाख ६४ हजार ८१० रुपये अपेक्षित निधीची मागणीही अहवालात करण्यात आली होती. 

दरम्यान, शासन निर्णयानुसार अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार असल्याने, वाढीव दरानुसार जिल्ह्यातील मदतनिधी मागणीचा सुधारित अहवाल सादर करण्याचे अमरावती विभागीय आयुक्तांचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले. त्यानुसार जिल्ह्यातील अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी वाढीव दरानुसार मदतनिधी मागणीचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत लवकरच विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात येणार आहे.

शेतकरी आणि पिकांचे असे आहे नुकसान !क्षेत्राचा प्रकार      शेतकरी       नुकसान (हेक्टर)जिरायत पिके     १,६८,०३५     १,३६,५२६.६६बागायत पिके        ६६,३६१       ४५,२५८.०५फळ पिके             ९,६७३          ६,६३९.७२

वाढीव दरानुसार अशी आहे हेक्टरी मदत !पिके               मदत (रुपये)कोरडवाहू पिके     १३,०००बागायत पिके       २७,०००फळपिके            ३६,०००

तहसीलदारांकडून मागितली मदतीची माहिती !जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यातील सातही तालुक्यांत अवकाळीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वाढीव दरानुसार मदत देण्यासाठी मदतनिधीची तालुकानिहाय माहिती जिल्ह्यातील सातही तहसीलदारांकडून मागविण्यात आली आहे. ही माहिती प्राप्त झाल्यानंतर लवकरच वाढीव दरानुसार जिल्ह्यातील मदतनिधी मागणीचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत अमरावती विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात येणार आहे. 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरी