शहरं
Join us  
Trending Stories
1
बायजूच्या रवींद्रन यांना अमेरिकेच्या कोर्टाचा मोठा झटका! कोर्टाचे आदेश न पाळल्यामुळे १ अब्ज डॉलरचा दंड
2
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
3
जानेवारीत लग्न ठरलेले...! २८ वर्षीय महिला डॉक्टरने ९व्या मजल्यावरून उडी मारली, होणाऱ्या नवऱ्याला तिथेच...   
4
बांगलादेश सीमेलगतच्या जिल्ह्यांत मतदारांची संख्या अचानक वाढली; भाजप म्हणतेय मुस्लिम, तृणमूल म्हणतेय हिंदू...
5
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
6
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
7
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
8
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
9
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
10
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
11
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
12
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
13
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
14
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
15
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
16
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
17
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
18
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
19
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
20
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम विदर्भात ४२ टक्के शेतकऱ्यांनाच कर्जमाफी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 12:33 IST

पश्चिम विदर्भातील ४२ टक्के शेतकºयांनाच बँकांमार्फत आतापर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे, अशी माहिती कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी १३ डिसेंबर रोजी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

- संतोष येलकरअकोला : सरकारने शेतकºयांना कर्जमाफी जाहीर करून दीड वर्षांचा कालावधी उलटत असताना, कर्जमाफीस पात्र शेतकºयांपैकी पश्चिम विदर्भातील ४२ टक्के शेतकºयांनाच बँकांमार्फत आतापर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे, अशी माहिती कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी १३ डिसेंबर रोजी ‘लोकमत’शी बोलताना दिली.गतवर्षी राज्यातील थकबाकीदार शेतकºयांसाठी सरकारने दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर केली. शेतकºयांचे कर्ज माफ करण्यासाठी सरकारकडून बँकांना निधीदेखील वितरित करण्यात आला; मात्र कर्जमाफी जाहीर होऊन दीड वर्षांचा कालावधी उलटून जात असताना, कर्जमाफीस पात्र सर्व शेतकºयांना अद्यापही कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, वाशिम, बुलडाणा व यवतमाळ या पाचही जिल्ह्यात कर्जमाफीस पात्र असलेल्या शेतकºयांपैकी आतापर्यंत सरासरी ४२ टक्केच शेतकºयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ पोहोचला असून, उर्वरित शेतकरी अद्यापही कर्जमाफी लाभाच्या प्रतीक्षेत आहेत, असेही किशोर तिवारी यांनी सांगितले.मुख्यमंत्र्यांची भेट घेणार; समस्या मांडणार!कर्जमाफी योजनेंतर्गत विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ देण्याचे प्रमाण अत्यल्प असल्याने, या मुद्यावर आपण लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्याकडे शेतकºयांच्या समस्या मांडणार असून, कर्जमाफीस पात्र सर्व शेतकºयांना तातडीने कर्जमाफीचा लाभ देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचेही किशोर तिवारी यांनी सांगितले.शेतकरी अडचणीत; व्याजाने पैसे घेण्याची वेळ!दुष्काळी परिस्थितीत अडचणीत सापडलेल्या शेतकºयांवर बाजारातून व्याजाने पैसे घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे कर्जमाफीस पात्र सर्व शेतकºयांना तातडीने कर्जमाफीचा लाभ देण्याची गरज आहे. शेतकºयांनी घेतलेल्या खासगी कर्जापोटी मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून होणारी वसुलीही बंद केली पाहिजे, असे मत किशोर तिवारी यांनी व्यक्त केले.

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरीKishor Tiwariकिशोर तिवारी