शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

काटेपूर्णा धरणात ३.३१ टक्केच साठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 12:30 IST

अकोला: अकोला शहराची जीवनरेखा काटेपूर्णा धरणात केवळ ३.३१ टक्केच जलसाठा शिल्लक असून, जिवंत जलसाठ्यात वेगाने घट होत असल्याने नागरिकांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: अकोला शहराची जीवनरेखा काटेपूर्णा धरणात केवळ ३.३१ टक्केच जलसाठा शिल्लक असून, जिवंत जलसाठ्यात वेगाने घट होत असल्याने नागरिकांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.अकोला जिल्ह्यात काटेपूर्णा हे एकमेव मोठे धरण असून, या धरणाच्या पाण्यावर ८ लाख अकोलेकरांची तहान भागविली जाते; पण मागील वर्षी पूरक पाऊस न झाल्याने या धरणात अल्प जलसाठा संचयित झाला. यावषीही अर्धा पावसाळा संपला तरी अद्याप पूरक पाऊस झाला नसल्याने धरणांतील जलसाठ्याची पातळी खालावल्याने पाणीटंचाईचे संकट अधिक गंभीर झाले आहे. उन्हाचा कडाकाही ३४ ते ३७ अंशांपर्यंत पोहोचल्याने पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत असल्याने धरणातील जलसाठ्यात वेगाने घट होत आहे. यावर्षी बऱ्यापैकी पाऊस होण्याची शक्यता हवामान शास्त्र विभागाने वर्तविली होती. तथापि, पावसाळ््याचे दोन महिने संपूनही काटेपूर्णा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाला नसल्याने धरणात पिण्यासाठी पूरक जलसाठा उपलब्ध झाला नाही. तर पातूर तालुक्यातील निर्गुणा व मूर्तिजापूर तालुक्यातील उमा धरणात शून्य टक्केच जलसाठा आहे. याच तालुक्यातील घुंगशी बॅरेजमध्ये केवळ ०.३१ टक्के म्हणजे शून्य टक्केच जलसाठा शिल्लक आहे. पातूर तालुक्यातील मोर्णा धरणात १०.४४ टक्के साठा आहे. तेल्हारा तालुक्यातीन वान धरणातही २५.१९ टक्केच साठा शिल्लक आहे.महापालिकेने पाण्याचे नियोजन केले आहे. पाच दिवसांनी एकदा पाणीपुरवठा करण्यात येतो. पाऊस जर लांबला तर मात्र पुन्हा पुनर्नियोजन करावे लागणार असल्याचे संकेत आहे; पण पाऊस येईल, धरण पाण्याने भरेल, अशी सर्वांना अपेक्षा आहे.

मृत जलसाठा११ दलघमी!

  •  या धरणात ११ दशलक्ष घनमीटर मृत जलसाठा आहे. असे असले, तरी अर्ध्यापेक्षा जास्त त्यामध्ये गाळ आहे.
  •  सध्या उपलब्ध जिवंत जलसाठा जुलै महिना पार करेल. त्यानंतर मात्र मृत जलसाठा उपसावा लागणार.
  •  यासाठीची तयारी महापालिका प्रशासनाने करण्याची गरज आहे.

काटेपूर्णा धरणात उपलब्ध जलसाठ्याचे व्यवस्थित नियोजन केल्यास हा जलसाठा आणखी ३५ ते ४५ दिवस पुरू शकतो.- चिन्मय वाकोडे, कार्यकारी अभियंता,पाटबंधारे विभाग, अकोला.

टॅग्स :Katepurna Damकाटेपूर्णा धरणAkolaअकोलाwater scarcityपाणी टंचाई