शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
4
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
5
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
6
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
7
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
8
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
9
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
10
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
11
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
12
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
13
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
14
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
15
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
16
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
17
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
18
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
19
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
20
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान

वऱ्हाडातील जलसाठ्यात वेगाने घट; २९ टक्केच जलसाठा शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 12:38 IST

अकोला: वऱ्हाडातील(पश्चिम विदर्भ) धरणांमधील जलसाठ्यात वेगाने घट होत असून, बाष्पिभवनाचा वेगही वाढत असल्याने जलसंकट निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे.

अकोला: वऱ्हाडातील(पश्चिम विदर्भ) धरणांमधील जलसाठ्यात वेगाने घट होत असून, बाष्पिभवनाचा वेगही वाढत असल्याने जलसंकट निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. पाच जिल्ह्यात आजमितीस केवळ २९.९५ टक्केच जलसाठा शिल्लक असून, बुलडाणा जिल्ह्यातील चार धरणातील जलसाठा शून्यावर पोहोचला आहे.वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व अमरावती या पाच जिल्ह्यात नऊ मोठे, २४ मध्यम व ४६६ लघु प्रकल्प आहेत. या सर्व धरणांमध्ये आजमितीस १० फेब्रुवारीपर्यंत केवळ २९.९५ टक्के जलसाठा शिल्लक होता. मागीलवर्षी वऱ्हाडात पाऊस कमी झाल्याने जलसाठ्यात अपेक्षित साठा झाला नसल्याने आता उन्हाळा लागण्यापूर्वी जलसाठ्यात वेगाने घट होत आहे. बाष्पिभवनाचा वेग वाढत असून, मागच्या काही दिवसांपूर्वी ३ मि.मी. असलेला हा दर आता दुप्पट झाला असून, सोमवारी ६.२ मि.मी.पर्यंत पोहोचला आहे.वºहाडात सर्वाधिक वाईट स्थिती बुलडाणा जिल्ह्याची असून, या जिल्ह्यातील खडकपूर्णा, मस, कोराडी धरणातील जलसाठा शून्य आहे. पेनटाकळी या मोठ्या धरणात ४.५ तर तोरणा मध्यम प्रकल्पात केवळ ५.९६ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. नळगंगा मोठ्या धरणात ११.९०, ज्ञानगंगा १४.६५,पलढग १९.५७, मन २०.३१ तर उतावळी या मध्यम प्रकारच्या धरणात ३२. ५९ टक्के साठा शिल्लक आहे. वाशिम जिल्ह्यातील अडाणमध्ये ४१.७७ टक्के, एकबुर्जी ३३.०८ तर सोनल धरणात ३३.२२ टक्के जलसाठा शिल्लक आहे.अमरावती जिल्ह्यातील अपर वर्धा धरणात आता केवळ २४.५५ टक्केच जलसाठा आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पूसमध्ये ५८.५३, अरुणावती ३८.५७ तर बेंबळा धरणात ३०.४५ टक्केच जलसाठा आहे. अकोला शहराची जीवनवाहिनी असलेल्या काटेपूर्णा या मोठ्या धरणात ४१.९१ टक्के जलसाठा शिल्लक आहे. याच जिल्ह्यातील निर्गुणा मध्यम धरणात ४२.२५ टक्के जलसाठा असून, उमा २४.१४, मोर्णा धरणात २७.५२ टक्के, तर वान धरणात ५०.१० टक्के जलसाठा आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाKatepurna Damकाटेपूर्णा धरणWaterपाणी