शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
2
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
3
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
4
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
5
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
6
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
7
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
8
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
9
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
10
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
11
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
12
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
13
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
14
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
15
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
16
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
17
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
18
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
19
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

आॅनलाइन बदल्या; शिक्षकांची आयुक्तांकडे धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 12:49 IST

अकोला : शासनाने केलेल्या आॅनलाइन बदल्यांमध्ये अन्याय झाल्याच्या तक्रारी करण्यासाठी अमरावती विभागातील एक हजारांपेक्षाही अधिक शिक्षकांनी विभागीय आयुक्तांकडे धाव घेतली.

ठळक मुद्देआॅनलाइन बदल्यांमध्ये झालेल्या अन्यायाविरोधात शिक्षकांनी प्रथम विभागीय आयुक्तांकडे धाव घेतली. त्यासाठी तक्रारी संबंधित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे पाठवण्यात आल्या.मात्र, त्याचा अहवाल विभागीय आयुक्तांना सादर केला नाही.

- सदानंद सिरसाटअकोला : शासनाने केलेल्या आॅनलाइन बदल्यांमध्ये अन्याय झाल्याच्या तक्रारी करण्यासाठी अमरावती विभागातील एक हजारांपेक्षाही अधिक शिक्षकांनी विभागीय आयुक्तांकडे धाव घेतली. त्यावर वेळापत्रक ठरवून देत १९ ते २१ जुलैदरम्यान सुनावणीचा स्वतंत्र कार्यक्रमच आयुक्तांनी लावला. त्यासाठी पाचही जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाºयांना हजर राहण्याचे बजावले आहे.आॅनलाइन बदल्यांमध्ये झालेल्या अन्यायाविरोधात शिक्षकांनी प्रथम विभागीय आयुक्तांकडे धाव घेतली. दाखल तक्रारीनुसार त्यावर आयुक्त निर्णय देणार आहेत. त्यासाठी तक्रारी संबंधित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे पाठवण्यात आल्या. मात्र, त्याचा अहवाल विभागीय आयुक्तांना सादर केला नाही. त्यामुळे तक्रारी तशाच प्रलंबित आहेत. अमरावती विभागातील सर्व तक्रारींचा एकाचवेळी निपटारा करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी मुख्य कार्यकारी अधिकाºयांना बुधवार, १८ जुलै रोजी पत्र देत अहवाल मागवला. सोबतच तक्रारींची सुनावणी करण्यासाठी जिल्ह्यातील तक्रारकर्त्या शिक्षकांना उपस्थित राहण्याचा निरोप देण्याचेही बजावले.अकोला जिल्ह्यातील १५० पेक्षाही अधिक शिक्षकांनी बदलीसंदर्भात तक्रारी केल्या आहेत. विभागीय आयुक्त त्या शिक्षकांची तीन दिवस विभागून सुनावणी घेणार आहेत. महसूल उपायुक्तांच्या कक्षात ही सुनावणी होत आहे. १९, २०, २१ जुलै रोजी तक्रारकर्त्या शिक्षकांचे ठरावीक संख्येत म्हणणे ऐकून घेतले जाणार आहे.  शिस्तभंगाची कारवाईसुनावणी प्रक्रियेत शिक्षकांसह जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी, संबंधित कर्मचारी प्रत्यक्ष उपस्थित न राहिल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशाराही आयुक्तांनी दिला आहे.  न्यायालयात दाखल करणार प्रतिज्ञापत्रशासनाने केलेल्या आॅनलाइन बदली प्रक्रियेतून अन्याय झाल्याच्या याचिका राज्यातील उच्च न्यायालयात दाखल झाल्या आहेत. त्या प्रकरणांची सुनावणीही न्यायालयात एकत्रितपणे होत आहे. शिक्षकांच्या तक्रारीनुसार म्हणणे ऐकून घेऊन त्यानुसार न्यायालयात शासनाची बाजू मांडणारे प्रतिज्ञापत्र सादर केले जाईल. त्यासाठी ही सुनावणी घेतली जात आहे.अकोट तालुक्यातील ३२ शिक्षकांच्या तक्रारीअकोला जिल्ह्यात १५० पेक्षाही अधिक शिक्षकांमध्ये अकोटमधील ३२ शिक्षकांनी एकत्रित तक्रार केली आहे. सविता तुकाराम ढाले अधिक ३२ अन्यायग्रस्त शिक्षकांची नावे त्यामध्ये आहेत, तर इतरांनी वैयक्तिक तक्रारी नोंदवल्या आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाTeacherशिक्षक