शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

कर्जमाफीतही ‘आॅनलाइन’चे अडथळे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 02:26 IST

अकोला: कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीत थकबाकीदार शेतकºयांकडून जिल्ह्यातील महा ई-सेवा केंद्रांवर ‘आॅनलाइन’ अर्ज भरुन घेण्यात येत असून, ‘आपले सरकार ’पोर्टल वर आॅनलाइन अर्ज भरताना जिल्ह्यातील ग्रामीण भागात ‘नेट कनेक्टीव्हीटी ’चा....

ठळक मुद्देअर्ज भरण्यासाठी शेतकºयांना हेलपाटे!अनेक शेतक-यांचे ‘आधार लिंक’च नाही!जिल्ह्यात केवळ ५९० शेतकºयांचे ‘आॅफलाइन’ अर्ज!

संतोष येलकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीत थकबाकीदार शेतकºयांकडून जिल्ह्यातील महा ई-सेवा केंद्रांवर ‘आॅनलाइन’ अर्ज भरुन घेण्यात येत असून, ‘आपले सरकार ’पोर्टल वर आॅनलाइन अर्ज भरताना जिल्ह्यातील ग्रामीण भागात ‘नेट कनेक्टीव्हीटी ’चा अभाव, वारंवार ‘लॉग आऊट’ होणारे पोर्टल व इतर कारणांमुळे ‘आॅनलाइन ’ अर्ज भरण्यात अडचणी येत आहेत, त्यामुळे कर्जमाफी योजनेत आॅनलाइन अर्ज सादर करण्यासाठी शेतकºयांना नाहक हेलपाटे सहन करावे लागत आहेत.सन २००९ ते ३० जून २०१६ पर्यंत थकबाकीदार शेतकºयांसाठी दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी शासनामार्फत जाहीर करण्यात आली आहे. कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीत थकबाकीदार शेतकºयांना कर्जमाफी तसेच कर्जाची नियमित परतफेड करणाºया शेतकºयांना प्रोत्साहनपर अनुदान आणि कर्जाचे पुनर्गठन करण्यात आलेल्या शेतकºयांना विशेष योजनेचा लाभ देण्यासाठी, संबंधित शेतकºयांकडून ‘आॅनलाइन’ अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया २४ जुलैपासून जिल्ह्यात सुरू करण्यात आली. महा ई-सेवा केंद्र, ग्रामपंचायतींचे आपले सरकार सेवा केंद्र आणि कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी)केंद्रांमार्फत शेतकºयांचे ‘आॅनलाइन’ अर्ज शासनाच्या ‘आपले सरकार’ या संकेतस्थळावर भरुन घेण्यात येत आहेत; परंतु कर्जमाफी योजनेंतर्गत आॅनलाइन अर्ज भरुन घेताना, ग्रामीण भागात सर्व्हर डाऊन असल्याने, नेट कनेक्टीव्हीटीच्याअभावी आपले ‘सरकार पोर्टल ’वारंवार लॉगआऊट होते, तसेच पोर्टल वारंवार बंद पडत असल्याने कर्जमाफीसाठी आॅनलाइन अर्ज भरण्यास कमालीचा विलंब होत आहे, त्यामुळे कर्जमाफीसाठी आॅनलाइन अर्ज सादर करण्याकरिता महा- ई-सेवा केंद्रांमध्ये शेतकºयांना तासंतास प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यानुषंगाने कर्जमाफीसाठी आॅनलाइन अर्ज भरण्याकरिता शेतकºयांना नाहक हेलपाटे सहन करावे लागत आहेत.