शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

एक होतं गाव..

By admin | Updated: September 8, 2014 01:10 IST

विकासाअभावी गाव झालं उजाड; तेल्हारा तालुक्यातील कळमखेड झालं एका व्यक्तीचं गाव.

सदानंद खारोडे/ तेल्हाराकधीकाळी संपन्न असलेलं तेल्हारा तालुक्यातील एक लहानसं गाव पार उजाड झालं आहे. स्वातंत्र्योत्तर काळात या गावाकडे प्रशासनाने लक्षच दिले नाही. त्यामुळे गावाचा विकास होऊ शकला नाही. परिस्थिती एवढी बिकट झाली की, अख्ख गावंच उजाड झालं. ग्रामस्थांना या गावातून स्थलांतर करणे भाग पडले. आजमितीस या गावात केवळ एकच व्यक्ती वास्तव्य आहे. या एका ग्रामस्थासाठी शासनानं स्वतंत्र पोलिस पाटील नेमण्याची कृपा केली, एवढं मात्र खरं.सातपुड्याच्या जवळच शेतकरी व शेतमजुरांच्या ५0 कुटुंबांचा समावेश असलेल्या कळमखेड गावात हिंदू-मुस्लिम गुण्यागोंविदाने राहायचे. सामाजिक एकतेचे प्रतिक असलेल्या या गावात दोन्ही धर्मियांची धर्मस्थळं आहेत. गावातील घरांची पडझड झाली आहे. विहिरी खचल्या असून, केवळ दोन घरं कशीबशी तग धरून आहेत. गावात दूषित पाणी पुरविणारी, एक कूपनलिका आहे. गावात आजपर्यंत कोणताही शासकीय अधिकारी पोहोचला नाही. रस्ता, पथदिवे, शौचालय नाही; शाळा, आरोग्य केंद्र आणि समाजमंदिर तर दूरच राहिले. आजूबाजुचा ३६ एकर परिसर काटेरी झाडाझुडपांनी व्यापला आहे. गावात रस्ताच नसल्याने, गावकर्‍यांनी १९७२ साली मातीचा भराव टाकून दोन किलोमीटर लांबीचा रस्ता तयार केला हो ता; परंतु त्यानंतर साधा रस्ताही कुणी केला नाही. त्यामुळे विवाह समारंभाकरीताही गावामध्ये पाहुणे येण्यास टाळाटाळ करायचे. त्यामुळे गावाची अवस्था हळुहळू आणखी बकाल झाली. कालांतराने येथील गावकर्‍यांनी स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला. तळेगाव बाजारपासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असल्याने, काही गावकरी तळेगाव बाजार, काही खंडाळा, तर काही अकोली येथे राहण्यास गेले; मात्र त्यांची घरं अद्यापही कळमखेड येथे कायम आहेत. गाव उजाड असलं तरी, शासनाने इथे वर्षा बोदडे नामक पोलिस पाटील नेमला आहे. गावात सध्या केवळ प्रल्हाद बोदडे नामक ग्रामस्थ वास्तव्यास असून, तोच या गावाची रखवाली करीत आहे. एक ना एक दिवस विकासाची गंगा गावात येईल, या आशेने गावाची वेस ओलांडण्याचे तो टाळत आहे. येथून स्थलांतर केलेल्या ग्रामस्थांनी, नव्या गावची मतदान ओळखपत्रे बनविली आहेत; मात्र ७ गावकर्‍यांची ओळखपत्र अद्यापही कळमखेडच्या नावानेच आहेत. ह्यगड्या आपला गाव बराह्ण असे म्हणत विकासाचा सूर्य कधी ना कधी उगवेल, अशी आशा त्यांनाही आहे. अकोली रूपराव येथील सरपंच जनार्दन ढोकणे यानीकळमखेड गावात सध्या एकच रहिवासी असल्याने, या गावात विकासाची कोणतीही कामे केली जात नसल्याचे सांगत गावाची लोकसंख्या वाढल्यास, विकासाला प्राधान्य दिले जाईल, असे म्हणाले. तर तेल्हारा येथील तहसीलदार यांनी तहसील कार्यालयाच्या दफ्तरी कळमखेड गावांची उजाड म्हणून नोंद नाही; परंतु या गावाला भेट देऊन माहिती अवगत करू. येथील समस्या सोडविण्यासाठी वरिष्ठ अधिकार्‍यांकडे अहवालही पाठवू, असे सांगीतले. ** प्रत्येक निवडणुकीत मतदान निवडणुकीच्या काळात गावात पुढार्‍यांच्या, अधिकार्‍यांच्या गाड्या पोहचतात. आश्‍वासनांची खैरात वाटली जाते, त्यानंतर एकदाची निवडणूक संपली, की मग कुणीही गावाकडे वळून पाहत नाही. याच कारणामुळे गावकरी लगतच्या गावांमध्ये वास्तव्यास गेले आहेत. गावाची ओढ असलेल्या प्रत्येकाजवळ याच गावचे मतदान ओळखपत्र आहे. ते प्रत्येक निवडणुकीत मतदानासाठी गावात आवर्जून येतात.