शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
2
“PM केअर फंडातून राज्याचा शेतकरी कर्जमुक्त करा”: राऊत, ठाकरे गट बळीराजासाठी रस्त्यावर उतरणार
3
झोमॅटोद्वारे हॉटेल मालकाने २१,००० रुपयांच्या १०७ ऑर्डर बनवून दिल्या, हातात किती शिल्लक राहिले... तुम्हीच पहा...
4
'सर्व दोष माझ्यावर टाकण्यात आले, तर...'; सोनम वांगचुक यांनी परदेशी निधीवर स्पष्टच सांगितले
5
सोने-चांदीच्या दरात आज मोठी उलथापालथ; Gold झालं स्वस्त, पण चांदी अवाक्याच्या बाहेर
6
"पाकिस्तानचा संघ एवढा भारी आहे की..."; IND vs PAK FINAL आधी कर्णधार सलमानने भारताला डिवचले
7
VIRAL :'सोनार बनवणार नाही, चोर चोरणार नाही'! ट्रेनमध्ये विक्रेत्याचा शायराना अंदाज; तरुणाची स्टाईल पाहून पब्लिक झाली फॅन!
8
३० वर्षांनी केंद्र त्रिकोण राजयोग: ८ राशींना वक्री शनि करेल मालामाल, बक्कळ पैसा; चौपट लाभ!
9
Tariffs on Furniture: ट्रम्प यांचा फर्निचर उद्योगावरही 'टॅरिफ घाव'; कोणत्या भारतीय कंपन्यांना बसणार फटका?
10
समीर वानखेडे यांना झटका! आर्यन खानच्या शोवरील मानहानी खटल्यात सुनावणी, कोर्ट काय म्हणाले..
11
४ लाख कोटी स्वाहा! TATA च्या 'या' शेअरनं गुंतवणूकदारांना दिला मोठा झटका, आणखी खाली जाऊ शकते किंमत?
12
भारतीय हवाई दलात इतिहास घडवणारे 'MiG-21' झाले निवृत; पाकिस्तानचा थरकाप उडवणाऱ्या विमानाला शेवटचा सॅल्यूट!
13
Jalebi Recipe: रसरशीत जिलेबी करण्यासाठी शेफने सांगितली खास टीप; १० मिनिटांत होईल तयार 
14
टाटाने Nexon EV विकल्या पण स्पेअर पार्टच मिळत नाहीत...; चार्जिंग गन जोडतात तेच अ‍ॅक्च्युएटर फॉल्टी
15
मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी
16
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! पाहा ११ कोटी रुपयांच्या १० किलो सोन्याच्या 'दुबई ड्रेस'चे खास फोटो
17
लक्ष्मी मित्तल यांनी दिल्लीत केली या वर्षीची सर्वात मोठी प्रॉपर्टी डील, कितीला खरेदी केला बंगला?
18
आंधळं प्रेम! प्रियकरला भेटण्यासाठी ११०० किमीचा प्रवास करून मध्य प्रदेशला पोहोचली १८ वर्षांची मुलगी; पण पुढे काहीतरी भलतंच घडलं
19
जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
20
हाय बीपी, थायरॉईड, फॅटी लिव्हर: एका बँक कर्मचाऱ्याची वेदनादायक कहाणी, सांगितलं का सोडावी लागली नोकरी?

जांभा गावाचे शंभर टक्के पुनर्वसन करा; अन्यथा सामूहिक आत्मदहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:18 IST

मूर्तिजापूर : तालुक्यात पूर्णा नदीवर घुंगशी बॅरेज, काटेपूर्णा नदीवर मंगरूळ कांबे येथे आणि उमा नदीवर रोहणा येथे बॅरेजेस मंजूर ...

मूर्तिजापूर : तालुक्यात पूर्णा नदीवर घुंगशी बॅरेज, काटेपूर्णा नदीवर मंगरूळ कांबे येथे आणि उमा नदीवर रोहणा येथे बॅरेजेस मंजूर करण्यात आले आहेत. मंजूर झालेल्या बॅरेजेसमुळे बाधित झालेल्या गावांमध्ये जांबा बुद्रुक गावाचा समावेश असून, या गावच्या पुनर्वसनाचा प्रश्न रखडल्याने गावाचा विकास थांबला आहे. त्यामुळे जांभा येथील १०० टक्के पुनर्वसन करावे, अशी मागणी गावकऱ्यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली. प्रश्न मार्गी लागला नाही, तर सामूहिक आत्मदहनाचा इशाराही गावकऱ्यांनी दिला आहे.

जांभा येथील ग्रामस्थांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, गाव १०० टक्के बाधित असल्याने तसा अहवाल कार्यकारी अभियंता अकोला पाटबंधारे विभाग यांच्या वतीने २ डिसेंबर २०१० रोजी सादर केला. गावाचे शंभर टक्के पुनर्वसन होत असल्याबाबतचे पत्र देण्यात आले होते. त्यातच पुनर्वसन कलम (११) जाहीर झालेले असल्याने जांभा बुद्रुक गावामध्ये विकासाची कामे करण्याबाबत पूर्ण मनाई करण्यात आली आहे. त्यानंतर २०१६ मध्ये सदर गाव अंंशत: बाधित असल्याबाबतचा जावईशोध लावण्यात आला. विकासाचा मार्ग खुंटल्याने गावकऱ्यांनी यापूर्वी गावात साखळी उपोषण सुरू केले होते. त्यावेळीदेखील अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी आश्वासन देऊन आंदोलन मागे घेण्यात आले होते. सद्य:स्थितीत प्रकल्प अधिकाऱ्यांनी गाव १३ टक्के बाधित क्षेत्रात येत आहे, असे सांगून ३५० घरांपैकी ७० घरांंची पुनर्वसन यादी तयार केली आहे. गावात शंभर फुटांपर्यंत माती असल्यामुळे गावातील जमीन दलदल होऊन गावातील घरे व इमारती क्षतिग्रस्त होऊन जमीनदोस्त होण्याचा धोका आहे. गावाच्या १०० टक्के पुनर्वसनाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी तीव्र स्वरूपाचे आंदोलन गावकरी छेडणार असल्याचा इशारा पत्रकार परिषदेत देण्यात आला. प्रश्न मार्गी लावण्याकरिता गाव पुनर्वसन संघर्ष समिती स्थापन करण्यात आलेली आहे. या समितीचे अध्यक्ष म्हणून बाळासाहेब ठोकळ, तर उपाध्यक्ष म्हणून सुनील जाधव असून, या समितीत डॉ. राजकुमार ठोकळ, प्रभाकर कांबळे, विठ्ठलराव ठोकळ, गजानन इंगळे आदींचा समावेश आहे.

-----------------

शासकीय कर्मचाऱ्यांना गावबंदी!

गावाचे शंभर टक्के पुनर्वसन करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ साखळी उपोषण, आमरण उपोषण, रास्ता रोको, शोले आंदोलन, जिल्हाधिकारी कार्यालयावर रॅली, आत्मदहन, जेलभरो, रास्ता रोको, अशा प्रकारची आंदोलने न्याय्य मागण्या पूर्ण होईपर्यंत करणार असल्याचे पत्रकार परिषदेमध्ये गावकऱ्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे शासकीय कर्मचाऱ्यांना गावबंदी करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.

----------------------------------------

गावाचे शंभर टक्के पुनर्वसन करण्यात येणार असल्याचे सांगितल्यावरून आम्ही आमच्या शेती सदर प्रकल्पाकरिता दिल्या. पाच वर्षांनंतर प्रकल्प अधिकाऱ्यांनी भूमिका बदलून अंशत: पुनर्वसनाचे सांगितले. यामुळे ही भूमिका संशयास्पद असून, गावाचे शंभर टक्के पुनर्वसन व्हावे, यासाठी आंदोलन करण्याची तयारी आहे.

-विठ्ठलराव ठोकळ, माजी सरपंच जांभा बु.

--------------------------