शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
2
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
3
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
4
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
5
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
6
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
7
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
8
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
9
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
10
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
11
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
12
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
13
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
14
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
15
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...
16
Elphinstone Bridge: प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
17
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
18
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
19
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
20
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी

पोषण आहारावर आता समीक्षा पथकाची नजर!

By admin | Updated: September 27, 2014 00:08 IST

पोषण आहार योजनेच्या अंमलबजावणीची समीक्षा करण्यासाठी राज्य समीक्षा पथकाचे गठन.

बुलडाणा: शालेय पोषण आहार योजनेचे लाभ गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहचत नसल्याचे, राज्य शासनाने केलेल्या पाहणीत स्पष्ट झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर, शासनाने पोषण आहार योजनेच्या अंमलबजावणीची तपासणी करण्यासाठी राज्य समीक्षा पथकाचे गठन केले आहे. शाळांमधील आहाराची वेळोवेळी तपासणी करण्याचे काम राज्य समीक्षा पथक करणार आहे. त पासणीमुळे पोषण आहार योजनेतील काळाबाजार बंद होऊन, पोषण आहार गरजू विद्यार्थ्यांपयर्ंत पोहचण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे. विद्यार्थ्यांना वाढीसाठी आवश्यक ते घटक मिळावे, यासाठी शासनाने शालेय पोषण आहार योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांसाठी दररोज वेगवेगळ्या पद्धतीचा आहार ठरवून देण्यात आला आहे. त्यासाठी शाळांना पुरवठा विभागामार्फत तांदूळ आणि शासनाने नेमलेल्या कंत्राटदारांमार्फत अन्य साहित्य पुरवले जाते. दुर्दैवाने शाळांमधून विद्यार्थ्यांना पुरविल्या जाणार्‍या आहारामध्ये सातत्य नाही, तसेच पुरविल्या जात असलेला तांदूळ आणि अन्य साहित्य निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारीही मोठ्या प्रमाणात होत असतात.आहार आवश्यक त्या प्रमाणात शिजवला जात नाही आणि तो गरजू विद्यार्थ्यांपयर्ंत पोहचत नाही, असे शासनाने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे. त्याची दखल घेऊन, राज्य शासनाने आहाराच्या अंमलबजावणी यंत्रणेची तपासणी करण्यासाठी राज्य समीक्षा पथकाचे गठन केले आहे. या प थकामार्फत शालेय पोषण आहार योजनेच्या अंमलबजावणी यंत्रणेची व आहाराची तपासणी करण्या त येणार आहे. हे पथक अंमलबजावणीची तपासणी करून आवश्यक त्या उपाययोजना सुचविणारा अहवाल शासनाला सादर करणार आहे. या तपासणीतून कोणत्या जिल्ह्यात व तालुक्यात सदर योजना चांगल्या पद्धतीने राबवली जात नाही, हे समोर येणार आहे.