शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
2
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
3
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
4
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
5
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
6
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
7
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
8
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
9
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
10
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
11
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
12
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
13
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
14
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
15
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
16
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
17
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
18
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
19
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
20
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)

जलजन्य आजारांच्या उद्रेकाचे प्रमाण घटले!

By admin | Updated: June 17, 2015 02:11 IST

आरोग्यविषयक दक्षता वाढली; साथरोगांमुळे होणा-या मृत्यूचे प्रमाण घटले.

अकोला: पाण्यापासून पसरणार्‍या रोगांचा उद्रेक होण्याचे प्रमाण राज्यात अध्र्यावर आले आहे. गत तीन वर्षात आरोग्य विभागाने राबविलेल्या उपाययोजनांचे सकारात्मक परिणाम पुढे आले असून, लोकांमध्येही स्वच्छतेबाबतची दक्षता वाढल्याने जलजन्य आजारांपासून होणार्‍या मृत्यूचे प्रमाण घटत आहे. सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत जलजन्य आजारांचा उद्रेक थांबविण्यासाठी अनेक उपाययोजना राबविल्या जात आहेत. यात दूषित पाण्याचे स्रोत शोधणे, पाण्यात ब्लिचिंग पावडरचा वापर वाढविणे, आरोग्यविषयक जनजागृती शेवटच्या घटकापर्यंत करणे आणि उद्रेक झालाच तर पुरेशा प्रमाणात औषधांचा पुरवठा होईल याकडे लक्ष दिले जात आहे. परिणामी तीन वर्षात राज्यात जलजन्य आजारांच्या उद्रेकाचे प्रमाण घटले आहे. गॅस्ट्रो, तीव्र अतिसार, कॉलरा, कावीळ, लेप्टोपायरोसिस यासारख्या आजारांची लागण दूषित पाण्यामुळे होते. राज्यात २0१२ मध्ये वर्षभरात जलजन्य आजारांचा ११६२८ ठिकाणी उद्रेक झाल्याची नोंद आरोग्य विभागाकडे आहे. त्यानंतर २0१३ मध्ये ३७६१ ठिकाणी उद्रेक झाला होता. हे प्रमाण २0१४ मध्ये अध्र्यावर आले आहे. २0१४ मध्ये ११४८ ठिकाणी जलजन्य आजारांचा उद्रेक झाला होता. अतिसाराची लागण होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यापाठोपाठ टायफाईड होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. पावसाळ्य़ात या आजारांची लागण अधिक होत असल्याने यावर्षी आरोग्य विभागातर्फे आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश राज्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना देण्यात आले आहेत. *दूषित पाण्याच्या स्रोतात अकोला आघाडीवरराज्यातील दूषित पाण्याचे स्रोत शोधून तेथील पाणी पिण्यासाठी वापरले जाणार नाही, याबाबत काळजी घेतली जात आहे. शिवाय या स्रोतातील पाणी शुद्ध करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहे. ज्या ग्रामपंचायतींकडून दूषित पाण्याच्या स्रोताबाबत काळजी घेतली जात नाही, त्यांना आवश्यक त्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. असे असतानाही दूषित पाण्यासाठी रेड कार्ड मिळालेल्या ग्रामपंचायतींची संख्या अकोल्यात सर्वाधिक आहे. दूषित पाण्याच्या स्रोतांचे प्रमाण अधिक असलेल्या आघाडीच्या पाच जिल्ह्यात अकोल्याचा क्रम पहिला आहे. अकोला जिल्ह्यातील १३.६५ टक्के ग्रामपंचायतींच्या हद्दीत दूषित पाणी आहे. त्यापाठोपाठ ठाणे जिल्ह्यात ८.३७ टक्के, गडचिरोली ५.५७ टक्के गोंदिया ३.७८ आणि उस्मानाबाद जिल्ह्यात ३.३८ टक्के ग्रामपंचायतींच्या हद्दीत दूषित पाण्याचे स्रोत आहेत.