शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

जलजन्य आजारांच्या उद्रेकाचे प्रमाण घटले!

By admin | Updated: June 17, 2015 02:11 IST

आरोग्यविषयक दक्षता वाढली; साथरोगांमुळे होणा-या मृत्यूचे प्रमाण घटले.

अकोला: पाण्यापासून पसरणार्‍या रोगांचा उद्रेक होण्याचे प्रमाण राज्यात अध्र्यावर आले आहे. गत तीन वर्षात आरोग्य विभागाने राबविलेल्या उपाययोजनांचे सकारात्मक परिणाम पुढे आले असून, लोकांमध्येही स्वच्छतेबाबतची दक्षता वाढल्याने जलजन्य आजारांपासून होणार्‍या मृत्यूचे प्रमाण घटत आहे. सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत जलजन्य आजारांचा उद्रेक थांबविण्यासाठी अनेक उपाययोजना राबविल्या जात आहेत. यात दूषित पाण्याचे स्रोत शोधणे, पाण्यात ब्लिचिंग पावडरचा वापर वाढविणे, आरोग्यविषयक जनजागृती शेवटच्या घटकापर्यंत करणे आणि उद्रेक झालाच तर पुरेशा प्रमाणात औषधांचा पुरवठा होईल याकडे लक्ष दिले जात आहे. परिणामी तीन वर्षात राज्यात जलजन्य आजारांच्या उद्रेकाचे प्रमाण घटले आहे. गॅस्ट्रो, तीव्र अतिसार, कॉलरा, कावीळ, लेप्टोपायरोसिस यासारख्या आजारांची लागण दूषित पाण्यामुळे होते. राज्यात २0१२ मध्ये वर्षभरात जलजन्य आजारांचा ११६२८ ठिकाणी उद्रेक झाल्याची नोंद आरोग्य विभागाकडे आहे. त्यानंतर २0१३ मध्ये ३७६१ ठिकाणी उद्रेक झाला होता. हे प्रमाण २0१४ मध्ये अध्र्यावर आले आहे. २0१४ मध्ये ११४८ ठिकाणी जलजन्य आजारांचा उद्रेक झाला होता. अतिसाराची लागण होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यापाठोपाठ टायफाईड होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. पावसाळ्य़ात या आजारांची लागण अधिक होत असल्याने यावर्षी आरोग्य विभागातर्फे आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश राज्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना देण्यात आले आहेत. *दूषित पाण्याच्या स्रोतात अकोला आघाडीवरराज्यातील दूषित पाण्याचे स्रोत शोधून तेथील पाणी पिण्यासाठी वापरले जाणार नाही, याबाबत काळजी घेतली जात आहे. शिवाय या स्रोतातील पाणी शुद्ध करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहे. ज्या ग्रामपंचायतींकडून दूषित पाण्याच्या स्रोताबाबत काळजी घेतली जात नाही, त्यांना आवश्यक त्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. असे असतानाही दूषित पाण्यासाठी रेड कार्ड मिळालेल्या ग्रामपंचायतींची संख्या अकोल्यात सर्वाधिक आहे. दूषित पाण्याच्या स्रोतांचे प्रमाण अधिक असलेल्या आघाडीच्या पाच जिल्ह्यात अकोल्याचा क्रम पहिला आहे. अकोला जिल्ह्यातील १३.६५ टक्के ग्रामपंचायतींच्या हद्दीत दूषित पाणी आहे. त्यापाठोपाठ ठाणे जिल्ह्यात ८.३७ टक्के, गडचिरोली ५.५७ टक्के गोंदिया ३.७८ आणि उस्मानाबाद जिल्ह्यात ३.३८ टक्के ग्रामपंचायतींच्या हद्दीत दूषित पाण्याचे स्रोत आहेत.