शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
3
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
4
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
5
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
6
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
7
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
8
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
9
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
10
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
11
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
12
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
13
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण
14
पुण्यातील विठ्ठल भक्तांवर पंढरपुरात हल्ला करणारे 'ते' तिघे कोण? वाद इतका विकोपाला का गेला?
15
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
16
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
17
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
18
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
19
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
20
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह

.आता रेल्वे, फलाटांवरील बेवारस बालकांवर राहील नजर!

By admin | Updated: March 5, 2015 01:54 IST

रेल्वे प्रशासन घेणार दखल, दरवर्षी होतात लाखावर बालकं बेपत्ता.

राम देशपांडे / अकोला : रेल्वे गाड्या व फलाटांवर बेवारस स्थितीत फिरणार्‍या बालकांची दरवर्षीची सरासरी संख्या एक लाखापेक्षा जास्त असल्याचे रेल्वे प्रशासनाच्या सर्वेक्षणात आढळून आले आहे. यावर प्रभावीपणे नियंत्रण मिळविण्याचे निर्देश केंद्रिय रेल्वे अधिकार्‍यांनी २ मार्च रोजी चारही झोनमधील रेल्वे स्थानक प्रबंधकांना दिले आहेत. २0१0 ते २0१४ या पाच वर्षात रेल्वेच्या चारही झोनमधील सर्व रेल्वे स्थानकांवर रेल्वे पोलीस फोर्स (आरपीएफ) आणि गव्हर्मेंट रिझर्व पोलीस प्रोटेक्शन (जीआरपी) ला आढळून आलेल्या बेवारस बालकांची आकडेवारी ग्राहय़ मानून केंद्रीय रेल्वे प्रशासनाने फेब्रुवारी २0१४ मध्ये सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणावरून दरवर्षी ७0 हजार ते १ लाख २0 हजार बालके हरविल्याच्या तक्रारी रेल्वे पोलिसांकडे नोंदविल्या गेल्या आहेत. सर्वेक्षणाअंती स्पष्ट झालेल्या या आकडेवारीनंत र ेल्वे प्रशासन खडबडून जागे झाले आहे. धावत्या रेल्वे गाड्यांमध्ये आणि रेल्वे स्थानकांवर बेवारस स्थितीत फिरणारी बालके प्रवासादरम्यान आपल्या कुटुंबीयांपासून दुरावतात किंवा मतिमंद, अपंग किंवा अनैतिक संबंधातून जन्मलेली अनाथ मुले काही लोक सोडून निघून जातात. आपल्या आप्तांपासून दुरावलेली ही मुले काही असामाजिक तत्त्वांच्या हाती लागत असल्याची गंभीर बाब भारतीय रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केली आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यासाठी पाऊल उचलले आहे. यासाठी रेल्वेस्थानकांवर आणि रेल्वे गाड्यांमध्ये वाट चुकलेल्या बालकांचा शोध घेण्यासाठी स्थानिक सामाजिक संस्थांची मदत घेण्याचे आवाहनदेखील करण्यात आले आहे. या आदर्श प्रणालीमध्ये गवसणार्‍या बालकांच्या सर्वसामान्य गरजा पूर्ण करून त्यांना कुटुंबीयांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभारण्याचे निर्देश प्रबंधकांना तसेच आरपीएफ व जीआरपी पोलिसांना देण्यात आले आहेत. *भुसावळ मंडळात गवसले ५२ बालकेभुसावळ मंडळात लहान बालकांची पळवून त्यांना इतर प्रदेशात विकणारी टोळी सक्रिय असल्याच्या बाबीला भुसावळ मंडळ रेल्वे पोलीस आयुक्त चंद्रमोहन मिश्रा यांनी दुजोरा दिला आहे. त म्हणाले की, नाशिक रोड ते बडनेरा या मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळात वर्ष २0१४ मध्ये ५२ बालके रेल्वे पोलिसांना गवसली. नाशिक रोड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर व बडनेरा रेल्वे स्थानकांवर आढळून आलेल्या या बालकांना प्रथम भुसावळ येथील बाल सहाय्यता केंद्रात आणले जाते. या ठिकाणी त्यांच्या प्राथमिक गरजा पूर्ण करून त्यांना त्यांच्या कुटुंबीयांच्या सुपूर्द करण्यासाठी प्रयत्न केले जातात. बेवारस स्थितीत सापडलेल्या मुलांची प्राथमिक माहिती व त्यांचे फोटो रेल्वेच्या संकेतस्थळावर प्रकाशित केले जातात. कुणीच नसलेल्या बालकांना अखेरीस जळगावच्या राज्यस्तरीय बाल सहाय्यता कमिटीच्या सुपूर्द केले जाते, असेही त्यांनी सांगितले.