शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
6
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
7
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
8
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
9
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
10
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
11
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
12
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
13
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
14
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
15
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
16
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
17
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
18
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
19
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
20
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार

आता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षेपासून सुटका नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 13:41 IST

अकोला: केंद्र शासनाने शिक्षण हक्क कायद्यात नव्याने केकेल्या दुरुस्तीनुसार इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.

- प्रवीण खेतेअकोला: केंद्र शासनाने शिक्षण हक्क कायद्यात नव्याने केकेल्या दुरुस्तीनुसार इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे आता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षेपासून सुटका होणार नाही, तर परीक्षेत नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीनुसारच त्यांना पुढच्या वर्गात प्रवेश देण्यात येईल. हा अधिकार संबंधित शाळांनाच देण्यात आला आहे.शिक्षण हक्क कायदा २००९ नुसार देशात प्रत्येक विद्यार्थ्याला इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिक्षणाचा अधिकार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेपासून भयमुक्त करण्यासाठी यापूर्वी शासनाने इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची परीक्षाच रद्द करण्यात आली होती; परंतु केंद्र शासनाने शिक्षण हक्क कायदा २००९ मध्ये पुन्हा एकदा दुरुस्ती करून परीक्षेला महत्त्व दिले आहे. त्यानुसार इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात जाण्यासाठी परीक्षा द्यावी लागणार आहे. अभ्यासात कमकुवत ठरणाºया विद्यार्थ्यांच्या प्रगतीनुसार त्यांना पुढच्या वर्गात प्रवेश द्यायचा की नाही, याचा अधिकार संबंधित शाळांना राहणार असल्याचेही त्यामध्ये नमूद आहे. केंद्र शासनाने हा बदल केला असला, तरी राज्य शासनातर्फे यासंदर्भात अद्याप शासन निर्णय काढण्यात आला नाही. त्यामुळे हे बदल नेमके कसे असतील, हे शासन निर्णयानंतरच स्पष्ट होईल.चौथीपर्यंतचे विद्यार्थी परीक्षा मुक्तच!केंद्र सरकारने इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा परीक्षा सुरू करण्याचा निर्णय घेतला, तरी इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा मुक्तच ठेवले आहे.नापास विद्यार्थ्यांसाठी फेर परीक्षाएकाच वर्गात नापास झालेल्या विद्यार्थ्यांची शाळांमार्फत नव्याने तयारी करून घेण्यात येईल. त्यानंतर त्या विद्यार्थ्यांची फेर परीक्षा घेतली जाईल. यामध्ये त्यांची प्रगती पाहूनच त्यांना पुढच्या वर्गात प्रवेश दिल्या जाईल. 

इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा घेण्याबाबत कायद्यात दुरुस्ती करण्यात आली; मात्र या संदर्भात शासन निर्णय आला नाही. त्यामुळे त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी कशा पद्धतीने होईल, यासंदर्भात स्पष्ट सांगता येणार नाही.- प्रकाश मुकुंद, शिक्षणाधिकारी, माध्यमिक, जिल्हा परिषद, अकोला

 

टॅग्स :AkolaअकोलाRight To Educationशिक्षण हक्क कायदाexamपरीक्षा