शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

आता १४ दिवसांच्या उधारीवर रेल्वे प्रवास शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 17:43 IST

 अकोला: आयआरसीटीसीच्या नवीन योजनेमुळे आता १४ दिवसांच्या उधारीवर रेल्वे प्रवास करणे शक्य झाले आहे.

- संजय खांडेकर

 अकोला: आयआरसीटीसीच्या नवीन योजनेमुळे आता १४ दिवसांच्या उधारीवर रेल्वे प्रवास करणे शक्य झाले आहे. यासाठी प्रवाशाला ३.५ टक्के सर्व्हिस चार्ज मोजावे लागणार आहे. या प्रणालीमुळे आता रेल्वे तिकिटाचे आरक्षण करणे सोपे झाले आहे.जर आपण उन्हाळी सुट्ट्यांचे नियोजन करीत असाल आणि बजेटची समस्या असेल तर घाबरण्याचे काही कारण कारण नाही. आयआरसीटीसीने अभिनव अशी योजना आणली आहे. त्यात १४ दिवसांच्या उधारीवर तुम्हाला तिकीट बुक करता येते. भारतीय रेल्वेच्या वेबसाइटवरील प्रवाशांना ही क्रेडिट सुविधा दिली जात आहे. या योजनेअंतर्गत प्रवास करण्याच्या केवळ पाच दिवस आधी तिकीट बुक करणे गरजेचे आहे. तिकीट बुक केल्यानंतर १४ दिवसांत ही रक्कम भरावी लागणार आहे. त्यावर ३.५ टक्के सर्व्हिस चार्ज देणे सक्तीचे आहे. या व्यवस्थेसाठी आयआरसीटीसीने मुंबईच्या एका कंपनी ईपेलेटरसोबत करार केला आहे. जर १४ दिवसांत प्रवाशाने तिकिटाची रक्कम भरली नाही तर आयआरसीटीसी त्या प्रवाशाविरुद्ध कायदेशीर कारवाई करीत दंड वसूल करू शकते. जर दुसऱ्यांदादेखील प्रवाशाने हीच वागणूक ठेवली तर त्याला या योजनेपासून वंचित केले जाऊ शकते.बँक लोनप्रमाणे सुविधाएखादी वस्तू विकत घेण्यासाठी ग्राहकास लोन दिले जाते. यासाठी बँक क्षेत्रात स्पर्धा सुरू झाली आहे. त्याचप्रमाणे आता प्रवासासाठीदेखील लोन दिले जात आहे. त्यासाठी करार केला जातो. आयआरसीटीसीतून रेल्वे तिकीट बुक करण्यासाठी प्रवाशाला कितीची क्रेडिट दिली गेली पाहिजे हे त्या व्यक्तीच्या क्रेडिट हिस्ट्री, डिजिटल फुटप्रिंट, डिवाइस इन्फर्मेशन आणि आॅनलाइन विक्री व्यवहारावर ठरणार आहे. असे करता येईल आरक्षणया सेवेसाठी आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर जाऊन आधी अधिकृत रजिस्ट्रेशन करावे लागेल. त्यानंतर व्यक्तिगत आवश्यक असलेली माहिती त्यावर द्यावी लागेल. त्यानंतर पर्याय दिले जातात. त्याची निवड केल्यानंतर ई-पे-लेटर खात्यात लॉगीन करावे लागते. त्यात तिकिट बुकिंगची रक्कम निश्चित होते.

 

टॅग्स :AkolaअकोलाIRCTCआयआरसीटीसीrailwayरेल्वे