शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

आता १४ दिवसांच्या उधारीवर रेल्वे प्रवास शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 17:43 IST

 अकोला: आयआरसीटीसीच्या नवीन योजनेमुळे आता १४ दिवसांच्या उधारीवर रेल्वे प्रवास करणे शक्य झाले आहे.

- संजय खांडेकर

 अकोला: आयआरसीटीसीच्या नवीन योजनेमुळे आता १४ दिवसांच्या उधारीवर रेल्वे प्रवास करणे शक्य झाले आहे. यासाठी प्रवाशाला ३.५ टक्के सर्व्हिस चार्ज मोजावे लागणार आहे. या प्रणालीमुळे आता रेल्वे तिकिटाचे आरक्षण करणे सोपे झाले आहे.जर आपण उन्हाळी सुट्ट्यांचे नियोजन करीत असाल आणि बजेटची समस्या असेल तर घाबरण्याचे काही कारण कारण नाही. आयआरसीटीसीने अभिनव अशी योजना आणली आहे. त्यात १४ दिवसांच्या उधारीवर तुम्हाला तिकीट बुक करता येते. भारतीय रेल्वेच्या वेबसाइटवरील प्रवाशांना ही क्रेडिट सुविधा दिली जात आहे. या योजनेअंतर्गत प्रवास करण्याच्या केवळ पाच दिवस आधी तिकीट बुक करणे गरजेचे आहे. तिकीट बुक केल्यानंतर १४ दिवसांत ही रक्कम भरावी लागणार आहे. त्यावर ३.५ टक्के सर्व्हिस चार्ज देणे सक्तीचे आहे. या व्यवस्थेसाठी आयआरसीटीसीने मुंबईच्या एका कंपनी ईपेलेटरसोबत करार केला आहे. जर १४ दिवसांत प्रवाशाने तिकिटाची रक्कम भरली नाही तर आयआरसीटीसी त्या प्रवाशाविरुद्ध कायदेशीर कारवाई करीत दंड वसूल करू शकते. जर दुसऱ्यांदादेखील प्रवाशाने हीच वागणूक ठेवली तर त्याला या योजनेपासून वंचित केले जाऊ शकते.बँक लोनप्रमाणे सुविधाएखादी वस्तू विकत घेण्यासाठी ग्राहकास लोन दिले जाते. यासाठी बँक क्षेत्रात स्पर्धा सुरू झाली आहे. त्याचप्रमाणे आता प्रवासासाठीदेखील लोन दिले जात आहे. त्यासाठी करार केला जातो. आयआरसीटीसीतून रेल्वे तिकीट बुक करण्यासाठी प्रवाशाला कितीची क्रेडिट दिली गेली पाहिजे हे त्या व्यक्तीच्या क्रेडिट हिस्ट्री, डिजिटल फुटप्रिंट, डिवाइस इन्फर्मेशन आणि आॅनलाइन विक्री व्यवहारावर ठरणार आहे. असे करता येईल आरक्षणया सेवेसाठी आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर जाऊन आधी अधिकृत रजिस्ट्रेशन करावे लागेल. त्यानंतर व्यक्तिगत आवश्यक असलेली माहिती त्यावर द्यावी लागेल. त्यानंतर पर्याय दिले जातात. त्याची निवड केल्यानंतर ई-पे-लेटर खात्यात लॉगीन करावे लागते. त्यात तिकिट बुकिंगची रक्कम निश्चित होते.

 

टॅग्स :AkolaअकोलाIRCTCआयआरसीटीसीrailwayरेल्वे