शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
2
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
3
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
4
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
5
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
6
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
7
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
8
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
9
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
10
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
11
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
12
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
14
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
15
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
16
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
17
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
18
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
19
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
20
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू

आता प्रत्येक गावाचा कृषी विकास आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:17 IST

खरीप हंगामाचा ग्राम कृषी आराखडा तयार करताना पाण्याचा ताळेबंद विचारात घेऊन येत्या हंगामात पीक रचना व पीक पद्धतीमध्ये बदल ...

खरीप हंगामाचा ग्राम कृषी आराखडा तयार करताना पाण्याचा ताळेबंद विचारात घेऊन येत्या हंगामात पीक रचना व पीक पद्धतीमध्ये बदल करण्याबाबत विचार करून त्यानुसार नियोजनबद्ध कार्यक्रमाची आखणी करण्यात येणार आहे. जिल्ह्यात ग्रामपंचायतस्तरावर जमिनीचा सुपीकता निर्देशांक लावण्यात आला आहे. शेतकऱ्यांना फलक समजावून सांगून त्यानुसार खतांच्या संतुलित वापरास प्रोत्साहन व किमान १० टक्के रासायनिक खतांची बचत करणे व शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करणे, मागील खरीप हंगामातील गावनिहाय, पीकनिहाय क्षेत्र उत्पादन उत्पादकता कृषी समितीच्या निदर्शनास आणून उत्पादकता वाढीसाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.

गावाच्या गरजेनुसार प्रमुख पिकांच्या सरळ वाणाचे बीजोत्पादन केले जाणार असून, मूलस्थानी जलसंधारण करण्यासाठी जनजागृती करून रुंद सरी व वरंभा पद्धती सोयाबीन पेरणी करणे, गावाच्या गरजेनुसार कार्यशाळा आयोजित करून माती नमुना काढणे, बीजप्रक्रिया करणे, बियाणे उगवणक्षमता तपासणे इत्यादी मोहिमा राबविण्यात येणार आहेत. गावाच्या गरजेनुसार किमान एक कृषी प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी प्रयत्न करणे, शेततळे केले जाणार आहे. पाण्याच्या फळबागांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. ‘विकेल ते पिकेल’ या अभियानाचा उद्देश लक्षात घेऊन बाजारात मागणी असलेल्या व नवीन पिकांची लागवड क्षेत्र वाढ करून मूल्यसाखळी विकसित केली जाणार आहे.

--बॉक्स--

समितीमध्ये यांचा सहभाग

राज्यात प्रथमच ग्राम कृषी विकास समिती स्थापन केली जाणार आहे. त्या समितीमध्ये लोकप्रतिनिधी, गावातील प्रगतिशील शेतकरी व कर्मचाऱ्यांचा समावेश राहणार आहे. त्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून आपल्या गावाचा विकास आराखडा तयार करून कृषी क्षेत्राचा विकास घडवावा, असे आवाहन कृषी विभागाकडून केले जाणार आहे.

--बॉक्स--

मोबाईलवरून भरता येईल माहिती

प्रत्येक गावाचा कृषी विस्तार आराखडा तयार करताना सर्व माहिती ही मोबाईलव्दारे भरता येणार आहे, त्याप्रकारची सुविधा सुद्धा संबंधित कर्मचाऱ्याच्या मोबाईलमध्ये करण्यात येणार आहे.