शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
2
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
3
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
4
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
5
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
6
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
7
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
8
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
9
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
10
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
11
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
12
दोन पतींना सोडले, तिसऱ्यासोबत लिव्ह इन; रात्री एकत्र मद्यपान केले, त्यानंतर घडलं भयंकर...  
13
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
14
जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांमध्ये अंबानी कोणत्या स्थानावर? जाणून घ्या कोणाकडे किती पैसे?
15
Crime: नेमबाजी स्पर्धेसाठी गेलेल्या महिला खेळाडूवर बलात्कार; पीडितेच्या मैत्रिणीसह तिघांना अटक
16
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
17
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
18
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
19
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
20
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांना नव्हे, तर विद्यापीठाची जमीन खासगी कंपन्यांना!

By admin | Updated: May 29, 2015 01:59 IST

बीजोत्पादनासाठी जमीन मूळ मालकांना देण्याची शेतक-यांची मागणी.

विवेक चांदूरकर /अकोला: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत अधिग्रहण केलेल्या जमिनी बीजोत्पादनासाठी मूळ जमीनधारकांना न देता खासगी कंपन्यांना देण्यात आल्या आहेत. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने संपूर्ण विदर्भात हजारो हेक्टर जमीन अधिग्रहित केली आहे. या विद्यापीठाने शेतकर्‍यांच्या सुपीक जमिनी अत्यंत कमी भावात घेतल्या. ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांना ना नोकरी मिळाली ना दुसरीकडे जमिनी मिळाल्या. त्यामुळे त्या शेतकर्‍यांच्या वारसांवर रिक्षा चालविण्याची किंवा मजुरी करण्याची पाळी आली आहे. कृषी विद्यापीठाने अधिग्रहित केलेल्या जमिनीपैकी शेकडो हेक्टर जमीन सध्या पडीक आहे. ही जमीन बीजोत्पादनासाठी मूळ मालक शेतकर्‍यांना देण्यात यावी, अशी मागणी या शेतकर्‍यांची आहे; मात्र विद्यापीठ सदर जमीन खासगी कंपन्यांना देत आहे. कृषी विद्यापीठाच्या अधिग्रहित जमिनीवर शैक्षणिक, प्रायोगिक, प्रात्यक्षिक संशोधन करून शेतकर्‍यांसाठी बीजोत्पादन करण्याचा उद्देश होता. त्याकाळी विद्यापीठाने आवश्यकतेपेक्षा जास्त शेतकर्‍यांची सुपीक जमीन अधिग्रहित केली. त्यामुळे शिल्लक असलेल्या जमिनीवर विद्यापीठ सध्या दिखाऊ व व्यावसायिक पिके घेत आहे. महामार्गालगतच्या भागात विद्यापीठ पीक घेते, त्या मागील शेती मात्र पडीक आहे. विद्यापीठाने अधिग्रहित केलेल्या जमिनीवर झाडे व जंगल वाढले आहे. यामध्ये जंगली डुकरे, नीलगाय, हरीण, सांबर यांचा सतत वावर असतो. हे प्राणी या जंगलांमध्ये वास्तव्यास राहून, शेतकर्‍यांची पिके फस्त करतात. विद्यापीठ व्यावसायिक पिके घेण्याचा केवळ आव आणत आहे, त्यांचे उत्पादन नगण्य आहे. *ग्रामपंचायतींनी घेतला ठराव अमरावती विभागातील पाचही जिल्हय़ातील शेकडो गावातील शेतकर्‍यांच्या जमिनी विद्यापीठाने अधिग्रहित केल्या आहेत. ज्या गावातील शेतकर्‍यांच्या जमिनी विद्यापीठाकडे आहेत, त्या गावातील शेतकर्‍यांच्या जमिनी त्यांच्याकडेच बीजोत्पादनासाठी भाड्याने देण्याचा ठराव ग्रामपंचायतींनी घेतला आहे.

*कृती आराखडा तयार

       सवरेदय शेतकरी समस्या निवारण समितीने विद्यापीठाकडे असलेल्या जमिनी मूळ शेतमालकांना कशाप्रकारे द्यायची याचा कृती आराखडा तयार केला आहे. यामध्ये त्यांनी ती जमीन कुणाची होती, त्याचे वारसदार सध्या गावामध्ये कोण वास्तव्यास आहेत, त्यापैकी कोण शेती करतो, त्यालाच सदर जमीन देण्याची मागणी करण्यात आली आहे.