शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

असंसर्गजन्य आजार जाताहेत नियंत्रणापलीकडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 15:11 IST

राज्यात एनसीडी केंद्रांतर्गत २ लाख ५० हजार ८७५ रुग्णांची तपासणी करण्यात आली.

- प्रवीण खेतेअकोला : बदलती जीवनशैली अन् वाढत्या तणावामुळे मधुमेह, कर्करोग, उच्च रक्तदाब यासारख्या असंसर्गजन्य आजारांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. या आजारांच्या यादीत कर्करोगापाठोपाठ रक्तदाबाच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून, नॅशनल हेल्थ प्रोफाइल-२०१९ च्या अहवालानुसार देशात ४० लाखांपेक्षा जास्त रुग्ण उच्च रक्तदाबाचे आढळले असून, राज्यात एनसीडी केंद्रांतर्गत २ लाख ५० हजार ८७५ रुग्णांची तपासणी करण्यात आली.चुकीच्या जीवनशैलीमुळे असंसर्गजन्य आजारांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे; परंतु धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाचे आरोग्याकडे दुर्लक्ष विषाणूजन्य आजारांपेक्षा जास्त उच्च रक्तदाब, हृदयरोग, स्ट्रोक, मधुमेह आणि कर्करोगासारखे असंसर्गजन्य आजारांत लक्षणीय वाढ होत आहे. या असंसर्गजन्य आजारांनी देशभरात डोके वर काढले असून, कर्करोगापाठोपाठ मधुमेह अन् उच्च रक्तदाबाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. असंसर्गजन्य आजारांची वाढती संख्या ही धोक्याची पातळी आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी नॅशनल हेल्थ प्रोफाइल-२०१९ प्रकाशित केले. त्यानुसार, देशभरात एनसीडी केंद्रांतर्गत देशभरातील ६.५१ कोटी रुग्णांची तपासणी करण्यात आली. यामध्ये देशभरात तब्बल ४० लाख उच्च रक्तदाबाचे रुग्ण आढळून आले. महाराष्ट्रात एनसीडी केंद्रांतर्गत तब्बल २ लाख ५० हजार ८७५ रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे.‘एनसीडी’ अंतर्गत राज्यात तपासणीराज्यभरात जिल्हा स्तरावर शासकीय रुग्णालयांसह प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एनसीडी केंदे्र सुरू करण्यात आली आहेत. या केंद्रांतर्गत असंसर्गजन्य आजारांची तपासणी करण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या नॅशनल हेल्थ प्रोफाइल-२०१९ च्या अहवालानुसार, राज्यात ५८ लाख ८३ हजार ९१५ लोकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, कर्करोग आणि स्ट्रोकसह इतर असंसर्गजन्य आजारांच्या रुग्णांची तपासणी करण्यात आली.

असे आहे रुग्णांचे प्रमाण...आजार - तपासणी केलेल्या रुग्णांची संख्यामधुमेह - १,५५,६२८उच्च रक्तदाब - २,५०,८७५कर्करोग - १४,१०३स्ट्रोक - ४,०१५बदलत्या जीवनशैलीमुळे असंसर्गजन्य आजारांचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. या आजारांच्या निदानासाठी राज्यात जिल्हा व प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर एनसीडी केंद्र कार्यरत आहेत. याच माध्यमातून अशा रुग्णांचे निदान करणे शक्य झाले आहे. केंद्र शासनाचा नॅशनल हेल्थ प्रोफाइल-२०१९ अहवालातून समोर आलेली बाब चिंताजनक आहे. त्यामुळे नागरिकांनी संतुलित जीवनशैलीचा अवलंब करून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची गरज आहे.- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाHealthआरोग्य