शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

असंसर्गजन्य आजार जाताहेत नियंत्रणापलीकडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 15:11 IST

राज्यात एनसीडी केंद्रांतर्गत २ लाख ५० हजार ८७५ रुग्णांची तपासणी करण्यात आली.

- प्रवीण खेतेअकोला : बदलती जीवनशैली अन् वाढत्या तणावामुळे मधुमेह, कर्करोग, उच्च रक्तदाब यासारख्या असंसर्गजन्य आजारांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. या आजारांच्या यादीत कर्करोगापाठोपाठ रक्तदाबाच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून, नॅशनल हेल्थ प्रोफाइल-२०१९ च्या अहवालानुसार देशात ४० लाखांपेक्षा जास्त रुग्ण उच्च रक्तदाबाचे आढळले असून, राज्यात एनसीडी केंद्रांतर्गत २ लाख ५० हजार ८७५ रुग्णांची तपासणी करण्यात आली.चुकीच्या जीवनशैलीमुळे असंसर्गजन्य आजारांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे; परंतु धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाचे आरोग्याकडे दुर्लक्ष विषाणूजन्य आजारांपेक्षा जास्त उच्च रक्तदाब, हृदयरोग, स्ट्रोक, मधुमेह आणि कर्करोगासारखे असंसर्गजन्य आजारांत लक्षणीय वाढ होत आहे. या असंसर्गजन्य आजारांनी देशभरात डोके वर काढले असून, कर्करोगापाठोपाठ मधुमेह अन् उच्च रक्तदाबाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. असंसर्गजन्य आजारांची वाढती संख्या ही धोक्याची पातळी आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी नॅशनल हेल्थ प्रोफाइल-२०१९ प्रकाशित केले. त्यानुसार, देशभरात एनसीडी केंद्रांतर्गत देशभरातील ६.५१ कोटी रुग्णांची तपासणी करण्यात आली. यामध्ये देशभरात तब्बल ४० लाख उच्च रक्तदाबाचे रुग्ण आढळून आले. महाराष्ट्रात एनसीडी केंद्रांतर्गत तब्बल २ लाख ५० हजार ८७५ रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे.‘एनसीडी’ अंतर्गत राज्यात तपासणीराज्यभरात जिल्हा स्तरावर शासकीय रुग्णालयांसह प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एनसीडी केंदे्र सुरू करण्यात आली आहेत. या केंद्रांतर्गत असंसर्गजन्य आजारांची तपासणी करण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या नॅशनल हेल्थ प्रोफाइल-२०१९ च्या अहवालानुसार, राज्यात ५८ लाख ८३ हजार ९१५ लोकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, कर्करोग आणि स्ट्रोकसह इतर असंसर्गजन्य आजारांच्या रुग्णांची तपासणी करण्यात आली.

असे आहे रुग्णांचे प्रमाण...आजार - तपासणी केलेल्या रुग्णांची संख्यामधुमेह - १,५५,६२८उच्च रक्तदाब - २,५०,८७५कर्करोग - १४,१०३स्ट्रोक - ४,०१५बदलत्या जीवनशैलीमुळे असंसर्गजन्य आजारांचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. या आजारांच्या निदानासाठी राज्यात जिल्हा व प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर एनसीडी केंद्र कार्यरत आहेत. याच माध्यमातून अशा रुग्णांचे निदान करणे शक्य झाले आहे. केंद्र शासनाचा नॅशनल हेल्थ प्रोफाइल-२०१९ अहवालातून समोर आलेली बाब चिंताजनक आहे. त्यामुळे नागरिकांनी संतुलित जीवनशैलीचा अवलंब करून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची गरज आहे.- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाHealthआरोग्य