शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

ना शाळा, ना परीक्षा, तरीही अडीच लाख विद्यार्थी पास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 10:40 IST

Educaton Sector News : अकोला जिल्ह्यातील दोन लाख ३५ हजार २१३ विद्यार्थ्यांना ना शाळा, ना परीक्षा देता, पास करण्यात आले.

- नितीन गव्हाळे

 अकोला : कोरोना विषाणूचा सातत्याने प्रादुर्भाव वाढत आहे. दररोज कोरोना बाधित रूग्णांची संख्या वाढत आहे. दररोज कोरोनामुळे मृत्यू होत आहे. त्यामुळे राज्य शासनाने पहिली ते नववीच्या परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना परीक्षेविना पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे अकोला जिल्ह्यातील दोन लाख ३५ हजार २१३ विद्यार्थ्यांना ना शाळा, ना परीक्षा देता, पास करण्यात आले. त्यासाठी विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करून त्यांना पुढील वर्गात ढकलण्यात आले.

राज्यात कोरोनाचे संकट अधिकच गतीने वाढत आहे. रूग्ण वाढत आहे. राज्य शासनाने संचारबंदी लागू केली होती. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना शाळेत पाठवून परीक्षा घेणे, आरोग्याच्या दृष्टिकोनातून धोक्याचे आहे. त्यामुळे शासनाने इयत्ता पहिली ते नववी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेविना पुढील वर्गात पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे पालकांसोबतच शिक्षकांना सुद्धा दिलासा मिळाला. परीक्षा झाली असती तर विद्यार्थ्यांनी दररोज पेपरसाठी शाळेत सोडून देण्याचे काम पालकांना करावे लागले असते. तसेच मुख्याध्यापक, शिक्षकांनाही मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना कराव्या लागणार होत्या. शिक्षकांनाही विषयनिहाय पेपर तपासावे लागणार होते. परंतु आता परीक्षाच रद्द करण्यात पेपर तपासण्याच्या त्रासातून शिक्षकांची मुक्तताच झाली.

पहिली ते आठवीची तालुकानिहाय विद्यार्थी

अकोला पं.स.- ९१६७४

अकोट- ३४४५५

बाळापूर- २५५२४

बार्शीटाकळी- १७०११

मूर्तिजापूर- २००६३

पातूर- १७१६५

तेल्हारा- २१८४२

मनपा क्षेत्र- ७४७९

.....................................

एकूण- २३५२१३

 

जिल्ह्यातील शाळा- १८६८

जि. प. शाळा- ९१२

 

अनुदानित शाळा- ६७४

विनाअनुदानित शाळा- २८२

ऑनलाइन शिक्षण....

फायदे

कोरोनाचा प्रादुर्भावामुळे परीक्षा रद्द केल्यामुळे विद्यार्थी कोरोनाच्या संसर्गापासून सुरक्षित राहिले. ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न केले. परीक्षा न घेतल्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर फारसा परिणाम झालेला नाही.

विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून परीक्षा न घेणे योग्यच ठरले. विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाची गोडी लागली. परीक्षा घेतल्या असत्या तर विद्यार्थ्यांना पेपर देण्यासाठी शाळेत यावे लागले. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने, विद्यार्थ्यांच्या जीवितालाही धोका होता. परीक्षा न घेतल्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम झाला नाही. ऑनलाईन शिक्षण घेताना, अनेक तांत्रिक अडचणींना सामना करावा लागला.

ग्रामीण भागात अनेक शैक्षणिक संस्था, युवक, युवती मुलांच्या शिक्षणासाठी पुढे सरसावले

तोटे....

ऑनलाइन शिक्षणामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले. ग्रामीण भागासह डोंगराळ भागात इंटरनेट चालत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घेता आले. शाळा बंद, शिक्षकांचे मार्गदर्शन नाही. अशा परिस्थितीत त्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागले.

नेटची सुविधा, अनेक विद्यार्थ्यांकडे पालकांकडे स्मार्ट फोन नसल्यामुळे दैनंदिन अभ्यास विद्यार्थ्यांना करता आला नाही. एकंदरित ग्रामीण विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाल्याचे दिसून आले.

शहरात मात्र, विद्यार्थ्यांच्या पालकांकडे स्मार्ट फोन, टॅब, लॅपटॉप आदी सुविधा असल्यामुळे त्यांना ऑनलाइन शिक्षणाचा लाभ घेता आला. शहरात नेटचा फारसा त्रास झाला नाही. शाळांकडून विद्यार्थ्यांना दररोज गृहपाठ, पेपर देण्यात येत होते. यात अडचणी आल्या असल्या तरी शहरी भागातील विद्यार्थ्यांचे ग्रामीण विद्यार्थ्यांच्या तुलनेने फारसे शैक्षणिक नुकसान झाले नाही.

टॅग्स :AkolaअकोलाEducation Sectorशिक्षण क्षेत्रexamपरीक्षा