शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
5
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
6
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
7
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
8
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
9
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
10
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
11
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
12
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
13
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
14
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
15
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
16
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
17
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
18
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
19
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
20
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा

सांगा कसं जगायचं... खारपाणपट्ट्यात भीषण परिस्थिती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 2:41 PM

आता पाऊस येऊनही फायद्याचा नाही. त्यामुळे सांगा कसं जगायचं...,असा सवाल शेतकºयांनी शासनाला केला आहे.

- नितीन गव्हाळेअकोला: दोन वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती, कर्जाचा डोंगर काही केल्या कमी होईना. यंदाचे साल तरी सुखाचे जाईल, अशी अपेक्षा असताना निसर्गाने शेतकºयांचा घात केला. हजारो रुपयांची बी-बियाणे, खते घेतली; परंतु पाऊस आलाच नाही. खरेदी केलेले बी-बियाणे, खते घरातच पडून आहेत. जमीन पेरण्याचेही काम पडले नाही. ज्या शेतकºयांनी शेतात पेरणी केली, त्यांचेही पीक हातून निसटून गेले. आता पाऊस येऊनही फायद्याचा नाही. त्यामुळे सांगा कसं जगायचं...,असा सवाल शेतकºयांनी शासनाला केला आहे.‘लोकमत’ चमूने मंगळवारी खारपाणपट्ट्यातील गावांमधील पीक परिस्थितीचा आढावा घेतला असता, वेदनादायी वास्तव पुढे आले. खारपाणपट्ट्यातील गावांमध्ये पावसाचा एक टिपूसदेखील नसल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. या भागातील गावांमध्ये स्मशान शांतता पसरली असून, शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. पेरणीच नसल्यामुळे शेतकरी, शेतमजुराच्या हाताला कामच उरले नाही. पाऊस नाही. पेरणी नाही तर जगायचं कसं, मुलांचे शिक्षण कसे करायचे, दैनंदिन व्यवहारासाठी लागणारा पैसा कुठून आणायचा, घरखर्च कसा चालवायचा, आदी प्रश्न शेतकºयांच्या डोक्यात थैमान घालत आहेत. दोन वर्षांपासून खारपाणपट्ट्यातील शेतकºयांना दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. यंदासुद्धा शेतकºयांवर दुष्काळसदृश स्थिती ओढवली आहे. आपातापा, एकलारा, बंधुगोटा, कपिलेश्वर, वडद, काटी-पाटी, दोनवाडा, एकलारा, अंबिकापूर, गोणापूर, दापुरा, मजलापूर, कट्यार, म्हैसांग आदी गावांमध्ये पावसाचा एकही थेंब पडला नसल्यामुळे शेतकºयांनी जमीनच पेरली नसल्याचे चित्र दिसून येते. काही भागात पेरणी आटोपली असून, पावसाअभावी मूग, सोयाबीन, तूर, कपाशीच्या पिकांवर नांगर फिरविण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे. पाऊस नसल्यामुळे शेतातील पिकांची वाढ खुंटली असून, तीव्र उन्हामुळे पिके सुकत आहेत. यंदा तर शेतकºयांवर अस्मानी संकट कोसळले असून, या संकटातून शेतकºयांना बाहेर काढण्यासाठी शासनाने सर्वेक्षण करून शेतकºयांना आर्थिक मदत देण्याची मागणी जोर धरत आहे.

मूग, सोयाबीन गेले, तूर, कपाशीचे पीकही जाणार!आपातापा, अंबिकापूर, दापूर, गोणापूर, मजलापूर, कट्यार, म्हैसांग आदी भागात पाऊसच न पडल्याने शेतकऱ्यांनी शेतात पेरणीच केली नाही. काही शेतकऱ्यांनी पेरणी केली; परंतु पावसाअभावी मूग, सोयाबीनचे पीक गेले. आता तूर, कपाशीचे पीकही जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पीक जगविण्यासाठी ‘स्प्रिंकलर’ने पाणी!ज्या शेतकºयांनी मूग, सोयाबीन, तूर, कपाशीची लागवड केली, ते शेतकरी पीक जगविण्यासाठी धडपड करताना दिसत आहेत. पावसाची चिन्हे दिसत नसल्याने, पीक जगविण्यासाठी शेतकरी पूर्णा नदीतून, बोअरचे स्प्रिंकलर पाइपने पाणी देत आहेत. आज, उद्या पाऊस येईलच, अशी आशा असल्याने, अनेक शेतकºयांनी स्प्रिंकलरने शेतात पाणी देणे सुरू केले आहे.

खारपाणपट्ट्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीखारपाणपट्ट्यातील अनेक गावांमध्ये पाऊस झाला नसल्यामुळे शेतांमध्ये पेरणीच केली नसल्याचे विदारक चित्र आहे. काळेभोर शेत दृष्टीत पडत असून, शेतकºयांचे बी-बियाणे, खतेसुद्धा वाया गेले आहेत. ज्यांनी पेरणी केली, त्या शेतकºयांच्या पेरण्या उलटल्या आहेत. त्यामुळे शासनाने या गावांमधील सर्व्हे करून दुष्काळ जाहीर करावा आणि दुष्काळ निवारण करण्यासाठी उपाययोजना करून आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकºयांकडून होत आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी