शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीपासून एकही पात्र शेतकरी वंचित राहता कामा नये - सहकार,पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 16:19 IST

अकोला:योजनेपासून एकही पात्र शेतकरी वंचित राहता कामा नये, अशी सूचना सहकार,पणन व वस्त्रोद्योग विभागाचे मंत्री सुभाष देशमुख यांनी शुक्रवारी येथे केली.

ठळक मुद्देसुभाष देशमुख यांनी अकोल्यात सहकार विभागाच्या विविध कामांचा सविस्तर आढावा घेतला.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात शुक्रवारी झालेल्या आढावा बैठकीत देशमुख बोलत होते.थकबाकीदार शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ शासन निर्णयानुसार मिळण्यासाठी अधिकाºयांनी दक्षता घ्यावी.

अकोला: छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत कर्जमाफीपासून वंचित राहिलेले सन २००९ नंतरच्या पात्र थकबाकीदार शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ शासन निर्णयानुसार मिळण्यासाठी अधिकाºयांनी दक्षता घ्यावी. या योजनेपासून एकही पात्र शेतकरी वंचित राहता कामा नये, अशी सूचना सहकार,पणन व वस्त्रोद्योग विभागाचे मंत्री सुभाष देशमुख यांनी शुक्रवारी येथे केली.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात शुक्रवारी झालेल्या आढावा बैठकीत देशमुख बोलत होते. यावेळी आमदार रणधीर सावरकर, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, मंत्री महोदयांचे खाजगी सचिव विद्याधर महाले, सहकारी संस्थांचे विभागीय सहनिबंधक आर.जे. दाभेराव, जिल्हा उपनिबंधक गोपाळ मावळे, जिल्हा विशेष लेखा परिक्षक श्री. उमाळे, लेखा परिक्षण विभागाचे विभागीय सहनिबंधक आर.जी. घुमरे, सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव, जिल्हा विपणन अधिकारी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच अधिकारी, खरेदी विक्री संघाचे सचिव उपस्थित होते.देशमुख यांनी सहकार विभागाच्या विविध कामांचा सविस्तर आढावा घेतला. सुरुवातीला जिल्हयात किती शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळाला, याची माहिती जाणून घेतली. अद्याप ज्या पात्र शेतकº्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही, त्या शेतकºयांना प्राधान्याने लाभ द्यावा, तसेच सन २००९ नंतर जे थकबाकीदार शेतकरी आहेत, त्यांची नोंद घ्या, त्यांचे आॅनलाईन अर्ज भरुन घ्या. एकही पात्र शेतकरी योजनेपासून वंचित ठेवू नका, असे निर्देश देशमुख यांनी संबंधित अधिकाºयांना दिले. शेतकºयांच्या प्रगतीसाठी विकास सहकारी संस्था सर्वच गावांमध्ये स्थापन करुन शेतकºयांना सभासद करुन घ्यावे. त्यांना वेळेवर लाभांश द्यावा. वंचित राहिलेल्या शेतकºयांचा खातेउतारा तलाठयांकडून घेऊन त्यांना सभासद करुन घ्यावे. या संस्था बळकट करण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेने त्यांना अन्य व्यवसायासाठी पतपुरवठा करावा, असेही देशमुख म्हणाले.अवैध सावकारीवर नियंत्रणासाठी अधिकाºयांनी दक्षता घ्यावी, तक्रार प्राप्त झाल्यास तातडीने कार्यवाई करावी, असे सांगून ते म्हणाले की, खरेदीसाठी नोंदणी झालेल्या उडिदाची खरेदी प्रक्रीया तातडीने पूर्ण करण्यात यावी. तसेच तूर खरेदीसाठी पातूर व पिंजर येथेही खरेदी केंद्र सुरु करण्याबाबतची सूचना त्यांनी यावेळी केली. 

टॅग्स :Akola cityअकोला शहरSubhash Deshmukhसुभाष देशमुख