शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

कर्जमाफीपासून एकही पात्र शेतकरी वंचित राहता कामा नये - सहकार,पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 16:19 IST

अकोला:योजनेपासून एकही पात्र शेतकरी वंचित राहता कामा नये, अशी सूचना सहकार,पणन व वस्त्रोद्योग विभागाचे मंत्री सुभाष देशमुख यांनी शुक्रवारी येथे केली.

ठळक मुद्देसुभाष देशमुख यांनी अकोल्यात सहकार विभागाच्या विविध कामांचा सविस्तर आढावा घेतला.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात शुक्रवारी झालेल्या आढावा बैठकीत देशमुख बोलत होते.थकबाकीदार शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ शासन निर्णयानुसार मिळण्यासाठी अधिकाºयांनी दक्षता घ्यावी.

अकोला: छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत कर्जमाफीपासून वंचित राहिलेले सन २००९ नंतरच्या पात्र थकबाकीदार शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ शासन निर्णयानुसार मिळण्यासाठी अधिकाºयांनी दक्षता घ्यावी. या योजनेपासून एकही पात्र शेतकरी वंचित राहता कामा नये, अशी सूचना सहकार,पणन व वस्त्रोद्योग विभागाचे मंत्री सुभाष देशमुख यांनी शुक्रवारी येथे केली.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात शुक्रवारी झालेल्या आढावा बैठकीत देशमुख बोलत होते. यावेळी आमदार रणधीर सावरकर, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, मंत्री महोदयांचे खाजगी सचिव विद्याधर महाले, सहकारी संस्थांचे विभागीय सहनिबंधक आर.जे. दाभेराव, जिल्हा उपनिबंधक गोपाळ मावळे, जिल्हा विशेष लेखा परिक्षक श्री. उमाळे, लेखा परिक्षण विभागाचे विभागीय सहनिबंधक आर.जी. घुमरे, सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव, जिल्हा विपणन अधिकारी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच अधिकारी, खरेदी विक्री संघाचे सचिव उपस्थित होते.देशमुख यांनी सहकार विभागाच्या विविध कामांचा सविस्तर आढावा घेतला. सुरुवातीला जिल्हयात किती शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळाला, याची माहिती जाणून घेतली. अद्याप ज्या पात्र शेतकº्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही, त्या शेतकºयांना प्राधान्याने लाभ द्यावा, तसेच सन २००९ नंतर जे थकबाकीदार शेतकरी आहेत, त्यांची नोंद घ्या, त्यांचे आॅनलाईन अर्ज भरुन घ्या. एकही पात्र शेतकरी योजनेपासून वंचित ठेवू नका, असे निर्देश देशमुख यांनी संबंधित अधिकाºयांना दिले. शेतकºयांच्या प्रगतीसाठी विकास सहकारी संस्था सर्वच गावांमध्ये स्थापन करुन शेतकºयांना सभासद करुन घ्यावे. त्यांना वेळेवर लाभांश द्यावा. वंचित राहिलेल्या शेतकºयांचा खातेउतारा तलाठयांकडून घेऊन त्यांना सभासद करुन घ्यावे. या संस्था बळकट करण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेने त्यांना अन्य व्यवसायासाठी पतपुरवठा करावा, असेही देशमुख म्हणाले.अवैध सावकारीवर नियंत्रणासाठी अधिकाºयांनी दक्षता घ्यावी, तक्रार प्राप्त झाल्यास तातडीने कार्यवाई करावी, असे सांगून ते म्हणाले की, खरेदीसाठी नोंदणी झालेल्या उडिदाची खरेदी प्रक्रीया तातडीने पूर्ण करण्यात यावी. तसेच तूर खरेदीसाठी पातूर व पिंजर येथेही खरेदी केंद्र सुरु करण्याबाबतची सूचना त्यांनी यावेळी केली. 

टॅग्स :Akola cityअकोला शहरSubhash Deshmukhसुभाष देशमुख