शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
3
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी सर्वात कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
5
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
7
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
8
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
9
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
10
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
11
सोन्याच्या दरात २७०० रुपयांची मोठी घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर
12
"तिथून परत आलेच नसते तर...", काश्मीरला फिरायला गेलेली मराठी अभिनेत्री, दहशतवादी हल्ल्यानंतर केली पोस्ट
13
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
14
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!
15
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
16
Pahalgam Attack Update : वाढदिवसानिमित्त काश्मीर ट्रिप...; दहशतवाद्यांनी पत्नी आणि मुलांसमोरच केली शैलेशची हत्या
17
यंदा इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
18
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
19
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल

कर्जमाफीपासून एकही पात्र शेतकरी वंचित राहता कामा नये - सहकार,पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 16:19 IST

अकोला:योजनेपासून एकही पात्र शेतकरी वंचित राहता कामा नये, अशी सूचना सहकार,पणन व वस्त्रोद्योग विभागाचे मंत्री सुभाष देशमुख यांनी शुक्रवारी येथे केली.

ठळक मुद्देसुभाष देशमुख यांनी अकोल्यात सहकार विभागाच्या विविध कामांचा सविस्तर आढावा घेतला.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात शुक्रवारी झालेल्या आढावा बैठकीत देशमुख बोलत होते.थकबाकीदार शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ शासन निर्णयानुसार मिळण्यासाठी अधिकाºयांनी दक्षता घ्यावी.

अकोला: छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत कर्जमाफीपासून वंचित राहिलेले सन २००९ नंतरच्या पात्र थकबाकीदार शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ शासन निर्णयानुसार मिळण्यासाठी अधिकाºयांनी दक्षता घ्यावी. या योजनेपासून एकही पात्र शेतकरी वंचित राहता कामा नये, अशी सूचना सहकार,पणन व वस्त्रोद्योग विभागाचे मंत्री सुभाष देशमुख यांनी शुक्रवारी येथे केली.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात शुक्रवारी झालेल्या आढावा बैठकीत देशमुख बोलत होते. यावेळी आमदार रणधीर सावरकर, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, मंत्री महोदयांचे खाजगी सचिव विद्याधर महाले, सहकारी संस्थांचे विभागीय सहनिबंधक आर.जे. दाभेराव, जिल्हा उपनिबंधक गोपाळ मावळे, जिल्हा विशेष लेखा परिक्षक श्री. उमाळे, लेखा परिक्षण विभागाचे विभागीय सहनिबंधक आर.जी. घुमरे, सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव, जिल्हा विपणन अधिकारी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच अधिकारी, खरेदी विक्री संघाचे सचिव उपस्थित होते.देशमुख यांनी सहकार विभागाच्या विविध कामांचा सविस्तर आढावा घेतला. सुरुवातीला जिल्हयात किती शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळाला, याची माहिती जाणून घेतली. अद्याप ज्या पात्र शेतकº्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही, त्या शेतकºयांना प्राधान्याने लाभ द्यावा, तसेच सन २००९ नंतर जे थकबाकीदार शेतकरी आहेत, त्यांची नोंद घ्या, त्यांचे आॅनलाईन अर्ज भरुन घ्या. एकही पात्र शेतकरी योजनेपासून वंचित ठेवू नका, असे निर्देश देशमुख यांनी संबंधित अधिकाºयांना दिले. शेतकºयांच्या प्रगतीसाठी विकास सहकारी संस्था सर्वच गावांमध्ये स्थापन करुन शेतकºयांना सभासद करुन घ्यावे. त्यांना वेळेवर लाभांश द्यावा. वंचित राहिलेल्या शेतकºयांचा खातेउतारा तलाठयांकडून घेऊन त्यांना सभासद करुन घ्यावे. या संस्था बळकट करण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेने त्यांना अन्य व्यवसायासाठी पतपुरवठा करावा, असेही देशमुख म्हणाले.अवैध सावकारीवर नियंत्रणासाठी अधिकाºयांनी दक्षता घ्यावी, तक्रार प्राप्त झाल्यास तातडीने कार्यवाई करावी, असे सांगून ते म्हणाले की, खरेदीसाठी नोंदणी झालेल्या उडिदाची खरेदी प्रक्रीया तातडीने पूर्ण करण्यात यावी. तसेच तूर खरेदीसाठी पातूर व पिंजर येथेही खरेदी केंद्र सुरु करण्याबाबतची सूचना त्यांनी यावेळी केली. 

टॅग्स :Akola cityअकोला शहरSubhash Deshmukhसुभाष देशमुख