शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
3
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
4
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
5
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
7
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
8
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
9
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

नववी-दहावीतील व्याकरण कमी केल्याने मराठी भाषेवर घाला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 14:03 IST

व्याकरणात वृत्त व अलंकार हा प्रकार नसेल तर भाषा प्रभावी होणार तरी कशी, असा सवाल मराठी विषयाच्या शिक्षकांनी उपस्थित केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: शासनाच्या मूल्यमापन आढावा समितीच्या शिफारशींनुसार इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा २0 गुणांचे अंतर्गत मूल्यमापन सुरू करण्यात आले; मात्र हे करताना गत शैक्षणिक वर्षात बदल करण्यात आलेल्या शैक्षणिक संकल्पनांना बाजूला सारत मराठी विषयाचे व्याकरण कमी करण्यात आले. हा मराठी भाषेवर घाला असून, व्याकरणात वृत्त व अलंकार हा प्रकार नसेल तर भाषा प्रभावी होणार तरी कशी, असा सवाल मराठी विषयाच्या शिक्षकांनी उपस्थित केला आहे.शैक्षणिक वर्ष २0१९-२0 पासून इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना मराठी व समाजशास्त्र विषयात अंतर्गत मूल्यमापन सुरू केले आहे. यात प्रथम भाषा मराठीमधील व्याकरणाचे महत्त्व कमी केले आहे. २0 गुणांचे व्याकरण १६ गुणांचे केले आहे.चार गुणांचे वृत्त आणि अलंकार हे व्याकरणातून वगळले. मराठी भाषेचे सौंदर्य कमी करण्याचा हा प्रकार आहे. विद्यार्थ्यांना कठीण जाते म्हणून व्याकरणातून वृत्त व अलंकार वगळणे योग्य नाही.आठवीच्या विद्यार्थ्यांना वृत्त व अलंकार शिकविला जातो; परंतु नववी व दहावीच्या मराठी व्याकरणातून हे वगळून, विद्यार्थ्यांना व्याकरणाच्या ज्ञानापासून अनभिज्ञ ठेवण्याचा प्रकार शासनाचा शिक्षण विभाग करीत आहे. एकीकडे आम्ही मराठी भाषा जतन करण्याच्या गप्पा करतो आणि दुसरीकडे मराठी भाषेवरच घाला घालण्याचाही प्रयत्न करतो, अशी प्रतिक्रिया मराठी विषयाच्या शिक्षकांनी व्यक्त केली आहे.

व्याकरणातून अलंकार व वृत्त वगळण्याची काही गरज नव्हती. व्याकरण हे मराठी भाषेचे सौंदर्य आहे. ते विद्यार्थ्यांना कळले पाहिजे. स्पर्धा परीक्षांमध्येसुद्धा व्याकरणावर प्रश्न विचारल्या जातात. विद्यार्थ्यांना व्याकरणच नसेल तर मराठी भाषा ते कशी शिकणार? आठवीच्या विद्यार्थ्यांना अलंकार व वृत्त शिकविल्या जाते; परंतु नववी-दहावीत विद्यार्थ्यांना ते कठीण जाते म्हणून वगळणे योग्य नाही. चुकीचा निर्णय आहे.- रक्षा जाधव, मराठी विषय शिक्षिकबाबासाहेब धाबेकर विद्यालय

मराठी भाषेचे सौंदर्य हे वृत्त व अलंकारामुळे वाढते. वृत्तानुसार कवितेला चाल लावू शकतो आणि नेमके हेच व्याकरणातून वगळल्याने विद्यार्थी व्याकरणापासून अनभिज्ञ राहतील. त्यांची भाषा प्रभावी होणार नाही. लिखाणाचे सौंदर्य वाढविण्यासाठी वृत्त व अलंकार महत्त्वाचे आहे. मराठी निबंध लिहिताना अलंकार नसेल तर ते अडचणीचे ठरेल.- स्वाती बापट, मराठी विषय शिक्षिकाबाल शिवाजी माध्य. शाळा

अलंकार हा भाषेचा आत्मा आहे. तोच वगळला तर विद्यार्थ्यांना भाषेचे सौंदर्य कसे कळणार? व्याकरणात अलंकार व वृत्त दोन्ही महत्त्वाचे आहेत. नववी-दहावीचा पेपर पॅटर्न सोपा केला. हे ठीक आहे; परंतु व्याकरणातून चार गुणांचे अलंकार व वृत्त वगळून विद्यार्थ्यांना व्याकरणापासून अनभिज्ञ ठेवण्याचा हा प्रकार आहे. गद्य विभागात ६-७ गुणांचे उतारे ठेवले आहे. १८ गुणांचे गद्य विचारणार आहेत. यातून काही वगळले असते तर चालले असते.- नंदकिशोर बरिंगे,मराठी विषय शिक्षक, जागृती विद्यालय

मराठी भाषा जतन करायची असेल तर व्याकरण महत्त्वाचे आहे. सध्याच्या इंग्रजी युगात विद्यार्थ्यांना मराठी व्याकरण शिकविण्याची गरज आहे. त्यांना व्याकरणापासून दूर करण्याचा हा प्रकार चुकीचा आहे. व्याकरण कठीण जाते म्हणून ते वगळणे चुकीचे आहे. विद्यार्थ्यांना अलंकार व वृत्तच माहीत नसेल तर त्यांची मराठी भाषा प्रभावी होणार नाही. आत्माच काढून शिक्षण विभागाला काय साधायचे आहे?- सोनाली पाटील,मराठी विषय शिक्षिकाधाबेकर विद्यालय, बार्शीटाकळी

टॅग्स :AkolaअकोलाEducationशिक्षणTeacherशिक्षक