शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पावसाचा हाहाकार, दार्जिलिंगमध्ये पूल कोसळला, 6 जणांचा मृत्यू; बघा Video 
2
पुण्यात NCP शरद पवार गटाच्या आमदाराला मारहाण; सत्ताधारी अजित पवारांच्या समर्थकांसोबत वाद
3
गेल्या ७ वर्षात किती वाढला भारतीयांचा पगार?; सरकारी रिपोर्टमधील आकडेवारी पाहून व्हाल हैराण
4
Napal Landslide: निसर्ग कोपला! नेपाळमध्ये ढगफुटी, भूस्खलनामुळे २२ जणांचा मृत्यू, विमानतळं महामार्ग बंद
5
केजरीवालांनी खासदार होणं टाळलं! उद्योगपती राजिंदर गुप्तांना राज्यसभेचे तिकीट, गुप्तांबद्दल जाणून घ्या
6
विषारी 'Coldrif' कफ सिरपने घेतला 14 बालकांचा जीव; महाराष्ट्रासह 6 राज्यांमध्ये तपास सुरू
7
नकाशावरून भारताचा इशारा, आता पाकिस्तानी सैन्यानं दिली पोकळ धमकी: "यापुढे युद्ध झालं तर..."
8
३० वर्षांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त; फक्त 'इतकी' SIP सुरू करा आणि व्याजापेक्षा जास्त पैसे कमवा
9
अमेरिकन कंपनीनं अचानक नोकरीवरून काढलं; युवकाचं ६ महिन्यातच नशीब पालटलं, महिन्याला ४४ लाख कमाई
10
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
11
स्वामी चैतन्यानंदचे सोशल मीडियावरही 'चाळे'; मुलींच्या फोटोंवर कमेंट्स, स्क्रीनशॉट्स व्हायरल
12
४४ वर्षांपूर्वी 'या' बँकेने जारी केलं होतं पहिलं क्रेडिट कार्ड! आता देशभरात किती लोक वापरतात?
13
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
14
6 लाखांपेक्षाही खाली आली Maruti Baleno ची किंमत, GST कपातीशिवायही मिळतोय ढासू डिस्काउंट 
15
इतकी मोठी झाली उर्मिला-आदिनाथ कोठारेची लेक जिजा, दिसायला आहे आईची कार्बन कॉपी
16
राधाकिशन दमानींच्या DMart चा दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढीचा धमाका; शेअरवर 'फोकस' वाढणार?
17
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
18
IND W vs PAK W Live Streaming: भारतीय 'रन'रागिणींचा दबदबा; पाक महिला संघ कधीच नाही जिंकला!
19
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
20
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल

नववी-दहावीतील व्याकरण कमी केल्याने मराठी भाषेवर घाला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 14:03 IST

व्याकरणात वृत्त व अलंकार हा प्रकार नसेल तर भाषा प्रभावी होणार तरी कशी, असा सवाल मराठी विषयाच्या शिक्षकांनी उपस्थित केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: शासनाच्या मूल्यमापन आढावा समितीच्या शिफारशींनुसार इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा २0 गुणांचे अंतर्गत मूल्यमापन सुरू करण्यात आले; मात्र हे करताना गत शैक्षणिक वर्षात बदल करण्यात आलेल्या शैक्षणिक संकल्पनांना बाजूला सारत मराठी विषयाचे व्याकरण कमी करण्यात आले. हा मराठी भाषेवर घाला असून, व्याकरणात वृत्त व अलंकार हा प्रकार नसेल तर भाषा प्रभावी होणार तरी कशी, असा सवाल मराठी विषयाच्या शिक्षकांनी उपस्थित केला आहे.शैक्षणिक वर्ष २0१९-२0 पासून इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना मराठी व समाजशास्त्र विषयात अंतर्गत मूल्यमापन सुरू केले आहे. यात प्रथम भाषा मराठीमधील व्याकरणाचे महत्त्व कमी केले आहे. २0 गुणांचे व्याकरण १६ गुणांचे केले आहे.चार गुणांचे वृत्त आणि अलंकार हे व्याकरणातून वगळले. मराठी भाषेचे सौंदर्य कमी करण्याचा हा प्रकार आहे. विद्यार्थ्यांना कठीण जाते म्हणून व्याकरणातून वृत्त व अलंकार वगळणे योग्य नाही.आठवीच्या विद्यार्थ्यांना वृत्त व अलंकार शिकविला जातो; परंतु नववी व दहावीच्या मराठी व्याकरणातून हे वगळून, विद्यार्थ्यांना व्याकरणाच्या ज्ञानापासून अनभिज्ञ ठेवण्याचा प्रकार शासनाचा शिक्षण विभाग करीत आहे. एकीकडे आम्ही मराठी भाषा जतन करण्याच्या गप्पा करतो आणि दुसरीकडे मराठी भाषेवरच घाला घालण्याचाही प्रयत्न करतो, अशी प्रतिक्रिया मराठी विषयाच्या शिक्षकांनी व्यक्त केली आहे.

व्याकरणातून अलंकार व वृत्त वगळण्याची काही गरज नव्हती. व्याकरण हे मराठी भाषेचे सौंदर्य आहे. ते विद्यार्थ्यांना कळले पाहिजे. स्पर्धा परीक्षांमध्येसुद्धा व्याकरणावर प्रश्न विचारल्या जातात. विद्यार्थ्यांना व्याकरणच नसेल तर मराठी भाषा ते कशी शिकणार? आठवीच्या विद्यार्थ्यांना अलंकार व वृत्त शिकविल्या जाते; परंतु नववी-दहावीत विद्यार्थ्यांना ते कठीण जाते म्हणून वगळणे योग्य नाही. चुकीचा निर्णय आहे.- रक्षा जाधव, मराठी विषय शिक्षिकबाबासाहेब धाबेकर विद्यालय

मराठी भाषेचे सौंदर्य हे वृत्त व अलंकारामुळे वाढते. वृत्तानुसार कवितेला चाल लावू शकतो आणि नेमके हेच व्याकरणातून वगळल्याने विद्यार्थी व्याकरणापासून अनभिज्ञ राहतील. त्यांची भाषा प्रभावी होणार नाही. लिखाणाचे सौंदर्य वाढविण्यासाठी वृत्त व अलंकार महत्त्वाचे आहे. मराठी निबंध लिहिताना अलंकार नसेल तर ते अडचणीचे ठरेल.- स्वाती बापट, मराठी विषय शिक्षिकाबाल शिवाजी माध्य. शाळा

अलंकार हा भाषेचा आत्मा आहे. तोच वगळला तर विद्यार्थ्यांना भाषेचे सौंदर्य कसे कळणार? व्याकरणात अलंकार व वृत्त दोन्ही महत्त्वाचे आहेत. नववी-दहावीचा पेपर पॅटर्न सोपा केला. हे ठीक आहे; परंतु व्याकरणातून चार गुणांचे अलंकार व वृत्त वगळून विद्यार्थ्यांना व्याकरणापासून अनभिज्ञ ठेवण्याचा हा प्रकार आहे. गद्य विभागात ६-७ गुणांचे उतारे ठेवले आहे. १८ गुणांचे गद्य विचारणार आहेत. यातून काही वगळले असते तर चालले असते.- नंदकिशोर बरिंगे,मराठी विषय शिक्षक, जागृती विद्यालय

मराठी भाषा जतन करायची असेल तर व्याकरण महत्त्वाचे आहे. सध्याच्या इंग्रजी युगात विद्यार्थ्यांना मराठी व्याकरण शिकविण्याची गरज आहे. त्यांना व्याकरणापासून दूर करण्याचा हा प्रकार चुकीचा आहे. व्याकरण कठीण जाते म्हणून ते वगळणे चुकीचे आहे. विद्यार्थ्यांना अलंकार व वृत्तच माहीत नसेल तर त्यांची मराठी भाषा प्रभावी होणार नाही. आत्माच काढून शिक्षण विभागाला काय साधायचे आहे?- सोनाली पाटील,मराठी विषय शिक्षिकाधाबेकर विद्यालय, बार्शीटाकळी

टॅग्स :AkolaअकोलाEducationशिक्षणTeacherशिक्षक