शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडियावर 'वाईट'वॉशची नामुष्की, सर्वात मोठा पराभव; द. आफ्रिकेचा २५ वर्षांनंतर मालिका विजयाचा पराक्रम
2
विकसित भारताचा संकल्प निश्चितच पूर्ण होईल: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
3
Delhi Blast: आत्मघाती हल्ला करणाऱ्या उमर नबीला आश्रय देणारा सापडला, एनआयएने फरिदाबामध्ये केली अटक
4
कमला पसंद, राजश्री पान मसाला कंपनीच्या मालकाच्या सुनेने आयुष्य संपवले; दोन लग्न, एक पत्नी अभिनेत्री... चिठ्ठीत काय?
5
एकाच गावातील ३ तरुणी एकत्र गायब, पण तिघींची कहाणी वेगवेगळी; २४ तासांत पोलिसांनी काढले शोधून!
6
धक्कादायक! बास्केटबॉलचा सराव करताना छातीवर पोल पडला; खेळाडूचा जागीच मृत्यू, व्हिडीओ व्हायरल
7
स्मृती मानधना की पलाश मुच्छल दोघांमध्ये कोण जास्त श्रीमंत? कमाईत कोण आघाडीवर जाणून घ्या
8
भाकरी खाता की नोटा? नांदेडचं लंडन झालेलं दिसलं नाही म्हणत शिरसाटांचा अशोक चव्हाणांवर थेट हल्ला
9
"माझी काय चूक?, उलट मी तिला वाचवलंय...", आधी पलाश मुच्छलसोबतचे 'ते' चॅट्स अन् आता कोरिओग्राफरचं नवं स्टेटस
10
STचा शालेय विद्यार्थी-विद्यार्थीनींसाठी हेल्पलाइन क्रमांक सुरू: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
11
IND vs SA: "भारतानं अक्षरशः आमच्यासमोर लोटांगण..." द. आफ्रिकेच्या प्रशिक्षकाची जीभ घसरली!
12
पाकिस्तानने पुन्हा गरळ ओकली; श्रीराम मंदिराच्या धार्मिक ध्वजावरुन संयुक्त राष्ट्रांना केलं आवाहन
13
Swiggy, Zomato आणि ओला-उबर महागणार? नवीन कायद्यामुळे ग्राहकांना सोसावा लागणार भुर्दंड!
14
"मुंबईच्या बाबतीत काहीतरी डाव नक्कीच शिजतोय..."; राज ठाकरेंचे 'बॉम्बे' वादावर रोखठोक मत
15
Tata Sierra : २२ वर्षांनंतर 'लेजेंड इज बॅक'... Tata नं लाँच केली मोस्ट अवेटेड Sierra; कोणते मिळणार फीचर्स, किंमत किती?
16
इथिओपियातून दिल्लीत आली ज्वालामुखीची राख; तब्बल १२ वर्षांनंतर हेली गुब्बी ज्वालामुखीचा उद्रेक 
17
"…तर मी अनंत गर्जेच्या दोन कानाखाली लावल्या असत्या"; पंकजा मुंडेंनी गौरी पालवेंच्या आईवडिलांना काय सांगितलं?
18
मार्गशीर्ष गुरुवार २०२५: मार्गशीर्षातले ४ गुरुवार 'अशी' करा स्वामी उपासना; दुप्पट लाभ होईल!
19
Sheikh Hasina: नऊ किलो सोनं, महागड्या आणि मौल्यवान वस्तू; शेख हसीना यांच्या लॉकरमध्ये सापडलं मोठं घबाड!
20
'नॅशनल क्रश' गिरीजा ओकला येतायेत विचित्र मेसेज; म्हणाली, "मला रेट विचारला जात आहे..."
Daily Top 2Weekly Top 5

नववीत अनुत्तीर्ण विध्यार्थ्यांची होणार फेर परीक्षा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 15:39 IST

अकोला: इयत्ता दहावीमध्ये अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेला बसण्याची संधी दिली जाते. त्याच पृष्ठभूमीवर इयत्ता नववीमध्ये अनुत्तीर्ण होणाºया विद्यार्थ्यांनासुद्धा पुनर्परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे.

ठळक मुद्देनववीमध्ये नापास झाल्यानंतर पुन्हा आणखी एक वर्ष त्याच वर्गात घालविल्यानंतरच दहावीत जाण्याची संधी मिळत असे.नववी व दहावीमधील विद्यार्थ्यांच्या गणित, विज्ञान, इंग्रजी या विषयांच्या नैदानिक चाचण्या जुलै महिन्यात घेण्यात येणार आहेत. असा निर्णयच शासनाने घेतल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी दिली.

अकोला: इयत्ता दहावीमध्ये अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेला बसण्याची संधी दिली जाते. त्याच पृष्ठभूमीवर इयत्ता नववीमध्ये अनुत्तीर्ण होणाºया विद्यार्थ्यांनासुद्धा पुनर्परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे. या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा जून महिन्यातील पहिल्या आठवड्यात शाळास्तरावर घेण्याचा निर्णय शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने घेतल्याची माहिती शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी दिली.दहावीतील नापास विद्यार्थ्यांना आॅक्टोबर किंवा फेब्रुवारीत परीक्षेला बसण्याची संधी मिळते; परंतु तशी संधी नववीमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांना नव्हती. त्यांना नववीमध्ये नापास झाल्यानंतर पुन्हा आणखी एक वर्ष त्याच वर्गात घालविल्यानंतरच दहावीत जाण्याची संधी मिळत असे. त्यात विद्यार्थ्यांचे एक वर्ष वाया जायचे. त्यामुळे हा विषय शिक्षण विभागाच्या विचाराधीन होता. आता त्याला शासनाने परवानगी दिली आहे. तसेच शैक्षणिक वर्ष २0१७ व १८ पासून नववी व दहावीमधील विद्यार्थ्यांच्या गणित, विज्ञान, इंग्रजी या विषयांच्या नैदानिक चाचण्या जुलै महिन्यात घेण्यात येणार आहेत. नैदानिक चाचण्यांच्या निकालावरून ज्या विद्यार्थ्यांना इयत्ता नववी व दहावीमध्ये उत्तीर्ण होण्यास काही अडचणी असतील, अशा विद्यार्थ्यांसाठी जलद गतीने शिक्षण पद्धतीचा वापर करून त्यांना उत्तीर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून शिक्षकांनी प्रयत्न करणे आवश्यक आहेत. त्यासाठी राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान, राज्य मंडळ व विद्या प्राधिकरणामार्फत प्रशिक्षण घेण्यात येईल. यासोबतच २0१७ व १८ मध्ये माध्यमिक शाळांमध्ये शिकणाºया इयत्ता नववीमधील गरजू विद्यार्थ्यांना जलद गतीने शिक्षण पद्धतीची अंमलबजावणी केल्यानंतरही अपयश येत असेल तर त्या विद्यार्थ्यांना पुनर्परीक्षेची संधी उपलब्ध करून द्यावी, असा निर्णयच शासनाने घेतल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी दिली. (प्रतिनिधी)

 

टॅग्स :Akolaअकोलाexamपरीक्षाeducationशैक्षणिक