शहरं
Join us  
Trending Stories
1
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
2
“महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
3
Asia Cup Final : सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
4
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
5
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
6
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
7
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
8
कोण आहे Jolly LLB 2 मधील इक्बाल कादरी? पाकिस्तानी समजून नाकारले गेले चित्रपट, ओळख पटवण्यासाठी मागितला व्हिसा
9
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
10
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
11
डिजिटल अश्वमेध! STच्या मोबाईल अ‍ॅपला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; युजर्सची संख्या १० लाखांपार
12
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
13
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
14
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर
15
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
16
IND vs WI: टेस्टच्या नव्या पर्वात 'ओल्ड इज गोल्ड फॉर्म्युला'! जड्डू टीम इंडियाचा 'पार्ट टाइम डेप्युटी'
17
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
18
खऱ्या आयुष्यातला राया..! सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांबद्दल विचारताच लाजली पूजा बिरारी
19
शेअरचा धमाका...! या ₹3.90 च्या स्टॉकनं दिला छप्परफाड परतावा, ₹1 लाखाचे केले ₹2.09 कोटी; तुमच्याकडे आहे का?
20
ठरलं!! अश्विन भारताबाहेर पाकिस्तानी खेळाडूसोबत एकाच संघात, 'या' नंबरची जर्सी घालणार!

नववीत अनुत्तीर्ण विध्यार्थ्यांची होणार फेर परीक्षा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 15:39 IST

अकोला: इयत्ता दहावीमध्ये अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेला बसण्याची संधी दिली जाते. त्याच पृष्ठभूमीवर इयत्ता नववीमध्ये अनुत्तीर्ण होणाºया विद्यार्थ्यांनासुद्धा पुनर्परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे.

ठळक मुद्देनववीमध्ये नापास झाल्यानंतर पुन्हा आणखी एक वर्ष त्याच वर्गात घालविल्यानंतरच दहावीत जाण्याची संधी मिळत असे.नववी व दहावीमधील विद्यार्थ्यांच्या गणित, विज्ञान, इंग्रजी या विषयांच्या नैदानिक चाचण्या जुलै महिन्यात घेण्यात येणार आहेत. असा निर्णयच शासनाने घेतल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी दिली.

अकोला: इयत्ता दहावीमध्ये अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेला बसण्याची संधी दिली जाते. त्याच पृष्ठभूमीवर इयत्ता नववीमध्ये अनुत्तीर्ण होणाºया विद्यार्थ्यांनासुद्धा पुनर्परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे. या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा जून महिन्यातील पहिल्या आठवड्यात शाळास्तरावर घेण्याचा निर्णय शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने घेतल्याची माहिती शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी दिली.दहावीतील नापास विद्यार्थ्यांना आॅक्टोबर किंवा फेब्रुवारीत परीक्षेला बसण्याची संधी मिळते; परंतु तशी संधी नववीमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांना नव्हती. त्यांना नववीमध्ये नापास झाल्यानंतर पुन्हा आणखी एक वर्ष त्याच वर्गात घालविल्यानंतरच दहावीत जाण्याची संधी मिळत असे. त्यात विद्यार्थ्यांचे एक वर्ष वाया जायचे. त्यामुळे हा विषय शिक्षण विभागाच्या विचाराधीन होता. आता त्याला शासनाने परवानगी दिली आहे. तसेच शैक्षणिक वर्ष २0१७ व १८ पासून नववी व दहावीमधील विद्यार्थ्यांच्या गणित, विज्ञान, इंग्रजी या विषयांच्या नैदानिक चाचण्या जुलै महिन्यात घेण्यात येणार आहेत. नैदानिक चाचण्यांच्या निकालावरून ज्या विद्यार्थ्यांना इयत्ता नववी व दहावीमध्ये उत्तीर्ण होण्यास काही अडचणी असतील, अशा विद्यार्थ्यांसाठी जलद गतीने शिक्षण पद्धतीचा वापर करून त्यांना उत्तीर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून शिक्षकांनी प्रयत्न करणे आवश्यक आहेत. त्यासाठी राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान, राज्य मंडळ व विद्या प्राधिकरणामार्फत प्रशिक्षण घेण्यात येईल. यासोबतच २0१७ व १८ मध्ये माध्यमिक शाळांमध्ये शिकणाºया इयत्ता नववीमधील गरजू विद्यार्थ्यांना जलद गतीने शिक्षण पद्धतीची अंमलबजावणी केल्यानंतरही अपयश येत असेल तर त्या विद्यार्थ्यांना पुनर्परीक्षेची संधी उपलब्ध करून द्यावी, असा निर्णयच शासनाने घेतल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी दिली. (प्रतिनिधी)

 

टॅग्स :Akolaअकोलाexamपरीक्षाeducationशैक्षणिक