शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
3
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
4
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
5
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
6
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
7
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
8
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
9
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...
10
Smartphones: २४ जीबी रॅम, ७५०० mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; जबरदस्त फोन लॉन्च!
11
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
12
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
13
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
14
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
15
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
16
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
17
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
18
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
19
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
20
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  

शेतमालाच्या भावासाठी प्रयत्नांची गरज - माजी कुलगुरू डॉ. पुरी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 01:40 IST

अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख यांचे कृषी क्षेत्रात मोठे योगदान आहे. शेती आणि शेतकर्‍यांसाठी त्यांचे उदात्त धोरण होते; परंतु सध्याचे धोरण कृषिक्षेत्राला मारक आहे. चार कृषी विद्यापीठ व एक मापसू असूनही शेतकर्‍यांच्या समस्यांवर समाधान सापडत नाही. शेतकरी आत्महत्या करतोय. महाराष्ट्र तर शेतकर्‍यांच्या आत्महत्यांसाठी देशात ओळखला जात आहे. ही भूषणावह बाब नाही. त्यामुळे कृषी विद्यापीठांनी शेतकर्‍यांच्या मालास भाववाढ मिळवून देण्यासाठी काम करण्याची गरज असल्याचे मत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन. पुरी यांनी व्यक्त केले. 

ठळक मुद्देराज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचा समारोप

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : डॉ. पंजाबराव देशमुख यांचे कृषी क्षेत्रात मोठे योगदान आहे. शेती आणि शेतकर्‍यांसाठी त्यांचे उदात्त धोरण होते; परंतु सध्याचे धोरण कृषिक्षेत्राला मारक आहे. चार कृषी विद्यापीठ व एक मापसू असूनही शेतकर्‍यांच्या समस्यांवर समाधान सापडत नाही. शेतकरी आत्महत्या करतोय. महाराष्ट्र तर शेतकर्‍यांच्या आत्महत्यांसाठी देशात ओळखला जात आहे. ही भूषणावह बाब नाही. त्यामुळे कृषी विद्यापीठांनी शेतकर्‍यांच्या मालास भाववाढ मिळवून देण्यासाठी काम करण्याची गरज असल्याचे मत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन. पुरी यांनी व्यक्त केले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्यावतीने तीन दिवसांपासून सुरू असलेल्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाच्या समारोपीय कार्यक्रमात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले होते. अतिथी म्हणून कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य आ. अमित झनक, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम, डॉ. डी.एम. मानकर, डॉ. महेंद्र नागदेवे, प्रा. डॉ. डी.बी. उंदीरवाडे, नियंत्रक विद्या पवार, डॉ. प्रमोद वाकडे, कुलसचिव डॉ. प्रकाश कडू, प्रगतिशील शेतकरी आप्पाजी गुंजकर, कमलकिशोर धीर आदी होते. माजी कुलगुरू डॉ. पुरी म्हणाले, डॉ. पंजाबराव देशमुख यांनी देशाला दोन मोठय़ा देणग्या दिल्या. स्वतंत्र विद्यापीठ निर्मितीची संकल्पना त्यांनी मांडली आणि पहिलं जागतिक कृषी प्रदर्शन दिल्ली येथे घेतलं. शेतकर्‍यांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली. शेतकर्‍यांच्या विकासासाठी ते झटले; परंतु सध्या परिस्थिती बदलली आहे. राज्यात चार कृषी विद्यापीठे असूनही शेतकर्‍यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. यावर समाधान शोधण्याची गरज आहे. प्रगल्भ तंत्रज्ञान, सोईसुविधा आहेत. उत्पादनवाढीसाठी लागणारं तंत्रज्ञान उपलब्ध आहे; परंतु शेतमालाला भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी प्रगती करू शकत नाही. यासाठी कृषी विद्यापीठांनी प्रयत्न करून शेतमालाला भाव कसा मिळेल, यासाठी प्रयत्न करावा, असे सांगत, डॉ. पुरी म्हणाले, बीटी कॉटन आल्यावर बघण्याचा दृष्टिकोन बदलला; परंतु येथेच आमची फसवणूक झाली. याविषयीचे चिंतन कृषी विद्यापीठांनी करायला हवे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. डी.एम. मानकर यांनी केले. संचालन प्रा. डॉ. प्रदीप बोरकर, जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे यांनी केले. 

पीक संरक्षण, यांत्रिकीकरणावर भर - डॉ. भालेशेतकर्‍यांचा विकास हा कृषी विद्यापीठाचा ध्यास आहे. कृषी विद्यापीठाने पीक संरक्षण, सेंद्रिय शेती आणि यांत्रिकीकरणावर अधिक भर दिला आहे. शेतकर्‍यांना फायदेशीर ठरेल, असे नवनवीन कृषी तंत्रज्ञान, बी-बियाणे उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस असल्याचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी सांगितले.

टॅग्स :Agrotech 2017 Akolaअ‍ॅग्रोटेक २0१७ अकोलाDr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ