शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
4
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
5
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
6
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
7
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
8
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
9
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
10
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
11
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
12
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
13
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
14
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
15
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
16
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
17
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
18
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
19
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
20
शरीफ उस्मान हादीचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

शेतमालाच्या भावासाठी प्रयत्नांची गरज - माजी कुलगुरू डॉ. पुरी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 01:40 IST

अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख यांचे कृषी क्षेत्रात मोठे योगदान आहे. शेती आणि शेतकर्‍यांसाठी त्यांचे उदात्त धोरण होते; परंतु सध्याचे धोरण कृषिक्षेत्राला मारक आहे. चार कृषी विद्यापीठ व एक मापसू असूनही शेतकर्‍यांच्या समस्यांवर समाधान सापडत नाही. शेतकरी आत्महत्या करतोय. महाराष्ट्र तर शेतकर्‍यांच्या आत्महत्यांसाठी देशात ओळखला जात आहे. ही भूषणावह बाब नाही. त्यामुळे कृषी विद्यापीठांनी शेतकर्‍यांच्या मालास भाववाढ मिळवून देण्यासाठी काम करण्याची गरज असल्याचे मत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन. पुरी यांनी व्यक्त केले. 

ठळक मुद्देराज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचा समारोप

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : डॉ. पंजाबराव देशमुख यांचे कृषी क्षेत्रात मोठे योगदान आहे. शेती आणि शेतकर्‍यांसाठी त्यांचे उदात्त धोरण होते; परंतु सध्याचे धोरण कृषिक्षेत्राला मारक आहे. चार कृषी विद्यापीठ व एक मापसू असूनही शेतकर्‍यांच्या समस्यांवर समाधान सापडत नाही. शेतकरी आत्महत्या करतोय. महाराष्ट्र तर शेतकर्‍यांच्या आत्महत्यांसाठी देशात ओळखला जात आहे. ही भूषणावह बाब नाही. त्यामुळे कृषी विद्यापीठांनी शेतकर्‍यांच्या मालास भाववाढ मिळवून देण्यासाठी काम करण्याची गरज असल्याचे मत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन. पुरी यांनी व्यक्त केले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्यावतीने तीन दिवसांपासून सुरू असलेल्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाच्या समारोपीय कार्यक्रमात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले होते. अतिथी म्हणून कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य आ. अमित झनक, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम, डॉ. डी.एम. मानकर, डॉ. महेंद्र नागदेवे, प्रा. डॉ. डी.बी. उंदीरवाडे, नियंत्रक विद्या पवार, डॉ. प्रमोद वाकडे, कुलसचिव डॉ. प्रकाश कडू, प्रगतिशील शेतकरी आप्पाजी गुंजकर, कमलकिशोर धीर आदी होते. माजी कुलगुरू डॉ. पुरी म्हणाले, डॉ. पंजाबराव देशमुख यांनी देशाला दोन मोठय़ा देणग्या दिल्या. स्वतंत्र विद्यापीठ निर्मितीची संकल्पना त्यांनी मांडली आणि पहिलं जागतिक कृषी प्रदर्शन दिल्ली येथे घेतलं. शेतकर्‍यांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली. शेतकर्‍यांच्या विकासासाठी ते झटले; परंतु सध्या परिस्थिती बदलली आहे. राज्यात चार कृषी विद्यापीठे असूनही शेतकर्‍यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. यावर समाधान शोधण्याची गरज आहे. प्रगल्भ तंत्रज्ञान, सोईसुविधा आहेत. उत्पादनवाढीसाठी लागणारं तंत्रज्ञान उपलब्ध आहे; परंतु शेतमालाला भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी प्रगती करू शकत नाही. यासाठी कृषी विद्यापीठांनी प्रयत्न करून शेतमालाला भाव कसा मिळेल, यासाठी प्रयत्न करावा, असे सांगत, डॉ. पुरी म्हणाले, बीटी कॉटन आल्यावर बघण्याचा दृष्टिकोन बदलला; परंतु येथेच आमची फसवणूक झाली. याविषयीचे चिंतन कृषी विद्यापीठांनी करायला हवे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. डी.एम. मानकर यांनी केले. संचालन प्रा. डॉ. प्रदीप बोरकर, जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे यांनी केले. 

पीक संरक्षण, यांत्रिकीकरणावर भर - डॉ. भालेशेतकर्‍यांचा विकास हा कृषी विद्यापीठाचा ध्यास आहे. कृषी विद्यापीठाने पीक संरक्षण, सेंद्रिय शेती आणि यांत्रिकीकरणावर अधिक भर दिला आहे. शेतकर्‍यांना फायदेशीर ठरेल, असे नवनवीन कृषी तंत्रज्ञान, बी-बियाणे उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस असल्याचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी सांगितले.

टॅग्स :Agrotech 2017 Akolaअ‍ॅग्रोटेक २0१७ अकोलाDr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ