शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीयीकृत बँकाचा सावकारी अवतार शेतकऱ्यांच्या मुळावर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 13:47 IST

राष्ट्रीय कृत बँकाची मुजोरी वाढली असून त्यांनी ‘सावकारी अवतार’ धारण केला आहे. बँकाचा हा सावकारी अवतार शेतकऱ्यांच्या मुळावर येत असल्याने ऐन पेरणीच्या हंगामात शेतकरी हैराण झाला आहे.

ठळक मुद्देअकोला, यवतमाळ, अमरावतीमध्ये पीक कर्ज वाटपात बँकानी संथपणा केल्यामुळे तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी त्या बँकामधुन शासकीय ठेवी काढून घेत गुन्हे दाखल करण्याचा पवित्रा घेतला.पीक कर्ज मंजूर करण्यासाठी बँकांकडून शेतकºयांना अनावश्यक कागदपत्रांची मागणी करण्यात येत असल्याच्या तक्रारी आहेत.पीककर्ज वाटपासाठी बँकानी चालविलेल्या प्रकाराची गंभीर दखल घेणे गरजचे आहे. अन्यथा काळ सोकावण्यास वेळ लागणार नाही.

- राजेश शेगोकार

अकोला  : पीक कर्ज देण्यासाठी बुलडाणा जिल्ह्यातील सेंट्रल बँकेच्या शाखाधिकाऱ्याने महिलेला शरीरसुखाची मागणी केली, कर्ज मागणीसाठी गेलेल्या शेतकऱ्याला अपमानित केल्याने त्याने आत्महत्या केली. अकोला, यवतमाळ, अमरावतीमध्ये पीक कर्ज वाटपात बँकानी संथपणा केल्यामुळे तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी त्या बँकामधुन शासकीय ठेवी काढून घेत गुन्हे दाखल करण्याचा पवित्रा घेतला. या सर्व घटना वेगवेगळया ठिकाणी घडल्या असल्या तरी या घटनांमध्ये एक समान सुत्र आहे ते म्हणजे राष्ट्रीय कृत बँकाची मुजोरी वाढली असून त्यांनी ‘सावकारी अवतार’ धारण केला आहे. बँकाचा हा सावकारी अवतार शेतकऱ्यांच्या मुळावर येत असल्याने ऐन पेरणीच्या हंगामात शेतकरी हैराण झाला आहे.

कागदपत्रांसाठी ही होते पिळवणूकखरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्याचे काम बँकांमार्फत सुरू आहे; मात्र पीक कर्ज मंजूर करण्यासाठी बँकांकडून शेतकºयांना अनावश्यक कागदपत्रांची मागणी करण्यात येत असल्याच्या तक्रारी आहेत. प्रत्येक बँकाचे नियम वेगळे त्यामुळे अकोला जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनाच बँकाची समन्वय बैठक घेऊन कोणती कागदपत्रे घ्यावीत हे ठरवावे लागले.वाढत्या शेतकरी आत्महत्यांमागे कर्जबाजारीपणा हे महत्वाचे कारण नमुद केले होते. सावकारांचे व बँकाचे असे दोन्ही कर्ज शेतकºयांचे सारे आर्थिक गणीतच बिघडवून टाकत असल्याने शासनाने कर्जमाफीचे पॅकेज जाहिर केले. या पॅकेज मध्ये शेतकºयांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी मुख्यत: फायदा बँकाचाच झाला. अनेक बँकाचा एनपीए वाचला, डबाघाईस आलेल्या बँकानी बाळसे धरले, सहकारी बँकानी तर कातच टाकली. ज्या शेतकºयांच्या साठी कर्जमाफी दिली तो मात्र लगेचच आलेल्या हंगामात पुन्हा कर्जबाजारी झाला. निसर्गाने नेहमीप्रमाणे साथ न दिल्याने त्याचे कर्ज थकित झाले अन् पुन्हा एकदा आत्महत्यांचे चक्र वेगाने फिरू लागले. या पृष्ठभूमीवर युती सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने कर्जमाफी दिली त्याचे गुºहाळ अजून सुरूच असून आता पीक कर्ज वाटपाची संथ गती शेतकºयांसाठी संकट ठरत आहे. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी ९ जुन रोजी अकोल्यात पीक कर्ज वाटपाचा आढावा घेतला असता अमरावती विभागात राष्ट्रीयीकृत बँकानी केवळ २ टक्का पीक कर्ज वाटप केले होते. याचा चांगलाच समाचार खोतांनी घेतल्यावरही बँकानी हातपाय हलविले नाही अखेर अमरावती विभागातील जिल्हाधिकाºयांनी आक्रमकता दाखविल्याने हा पीक कर्ज वाटप १५ टक्यांपर्यंत आले. वास्तविक कर्जमाफीचा लाभ घेतलेले शेतकरी नवीन पीक कर्ज वाटपासाठी पात्र ठरले आहेत. त्यानुषंगाने कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या सर्व शेतकºयांना जुन महिन्याच्या आधीच तातडीने पीक कर्ज उपलब्ध करून दिले असते तर पेरणीची सोय लावता आली असती मात्र बँकाचा संथपणा पुन्हा एकदा शेतकºयांना सावकारी चक्र व्युहात अडकवित आहे. बँकाना सरकारकडून निधी वळता होत नसेल तर त्यांनी तसे सरकारला खडसावून सांगावे मात्र त्यासाठी थेट शेतकºयांच्या स्वाभिमानाशी अन् त्यांच्या अर्धांगिणीवर नजर ठेवण्यापर्यत मजल जात असले तर ही नवी सावकारी मोडून काढण्यासाठी सरकारने कठोर होणे गरजेचे आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे या बँकाना कुणाशीही स्पर्धा करावी लागत नाही त्यामुळेच ‘ग्राहक सेवा’ हे केवळ नावापुरतचे राहिले आहे. राष्ट्रीयीकृत बँकामध्ये ग्राहकांशी होणारा व्यवहार हा उद्दामपणाचा असल्याचे अनेक दाखले रोज मिळतात त्यामुळे बुलडाण्यात झालेल्या त्या गंभिर प्रकारासोबतच पीककर्ज वाटपासाठी बँकानी चालविलेल्या प्रकाराची गंभीर दखल घेणे गरजचे आहे. अन्यथा काळ सोकावण्यास वेळ लागणार नाही.

 

टॅग्स :Akolaअकोलाbankबँक