शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

राष्ट्रीयीकृत बँकाचा सावकारी अवतार शेतकऱ्यांच्या मुळावर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 13:47 IST

राष्ट्रीय कृत बँकाची मुजोरी वाढली असून त्यांनी ‘सावकारी अवतार’ धारण केला आहे. बँकाचा हा सावकारी अवतार शेतकऱ्यांच्या मुळावर येत असल्याने ऐन पेरणीच्या हंगामात शेतकरी हैराण झाला आहे.

ठळक मुद्देअकोला, यवतमाळ, अमरावतीमध्ये पीक कर्ज वाटपात बँकानी संथपणा केल्यामुळे तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी त्या बँकामधुन शासकीय ठेवी काढून घेत गुन्हे दाखल करण्याचा पवित्रा घेतला.पीक कर्ज मंजूर करण्यासाठी बँकांकडून शेतकºयांना अनावश्यक कागदपत्रांची मागणी करण्यात येत असल्याच्या तक्रारी आहेत.पीककर्ज वाटपासाठी बँकानी चालविलेल्या प्रकाराची गंभीर दखल घेणे गरजचे आहे. अन्यथा काळ सोकावण्यास वेळ लागणार नाही.

- राजेश शेगोकार

अकोला  : पीक कर्ज देण्यासाठी बुलडाणा जिल्ह्यातील सेंट्रल बँकेच्या शाखाधिकाऱ्याने महिलेला शरीरसुखाची मागणी केली, कर्ज मागणीसाठी गेलेल्या शेतकऱ्याला अपमानित केल्याने त्याने आत्महत्या केली. अकोला, यवतमाळ, अमरावतीमध्ये पीक कर्ज वाटपात बँकानी संथपणा केल्यामुळे तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी त्या बँकामधुन शासकीय ठेवी काढून घेत गुन्हे दाखल करण्याचा पवित्रा घेतला. या सर्व घटना वेगवेगळया ठिकाणी घडल्या असल्या तरी या घटनांमध्ये एक समान सुत्र आहे ते म्हणजे राष्ट्रीय कृत बँकाची मुजोरी वाढली असून त्यांनी ‘सावकारी अवतार’ धारण केला आहे. बँकाचा हा सावकारी अवतार शेतकऱ्यांच्या मुळावर येत असल्याने ऐन पेरणीच्या हंगामात शेतकरी हैराण झाला आहे.

कागदपत्रांसाठी ही होते पिळवणूकखरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्याचे काम बँकांमार्फत सुरू आहे; मात्र पीक कर्ज मंजूर करण्यासाठी बँकांकडून शेतकºयांना अनावश्यक कागदपत्रांची मागणी करण्यात येत असल्याच्या तक्रारी आहेत. प्रत्येक बँकाचे नियम वेगळे त्यामुळे अकोला जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनाच बँकाची समन्वय बैठक घेऊन कोणती कागदपत्रे घ्यावीत हे ठरवावे लागले.वाढत्या शेतकरी आत्महत्यांमागे कर्जबाजारीपणा हे महत्वाचे कारण नमुद केले होते. सावकारांचे व बँकाचे असे दोन्ही कर्ज शेतकºयांचे सारे आर्थिक गणीतच बिघडवून टाकत असल्याने शासनाने कर्जमाफीचे पॅकेज जाहिर केले. या पॅकेज मध्ये शेतकºयांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी मुख्यत: फायदा बँकाचाच झाला. अनेक बँकाचा एनपीए वाचला, डबाघाईस आलेल्या बँकानी बाळसे धरले, सहकारी बँकानी तर कातच टाकली. ज्या शेतकºयांच्या साठी कर्जमाफी दिली तो मात्र लगेचच आलेल्या हंगामात पुन्हा कर्जबाजारी झाला. निसर्गाने नेहमीप्रमाणे साथ न दिल्याने त्याचे कर्ज थकित झाले अन् पुन्हा एकदा आत्महत्यांचे चक्र वेगाने फिरू लागले. या पृष्ठभूमीवर युती सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने कर्जमाफी दिली त्याचे गुºहाळ अजून सुरूच असून आता पीक कर्ज वाटपाची संथ गती शेतकºयांसाठी संकट ठरत आहे. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी ९ जुन रोजी अकोल्यात पीक कर्ज वाटपाचा आढावा घेतला असता अमरावती विभागात राष्ट्रीयीकृत बँकानी केवळ २ टक्का पीक कर्ज वाटप केले होते. याचा चांगलाच समाचार खोतांनी घेतल्यावरही बँकानी हातपाय हलविले नाही अखेर अमरावती विभागातील जिल्हाधिकाºयांनी आक्रमकता दाखविल्याने हा पीक कर्ज वाटप १५ टक्यांपर्यंत आले. वास्तविक कर्जमाफीचा लाभ घेतलेले शेतकरी नवीन पीक कर्ज वाटपासाठी पात्र ठरले आहेत. त्यानुषंगाने कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या सर्व शेतकºयांना जुन महिन्याच्या आधीच तातडीने पीक कर्ज उपलब्ध करून दिले असते तर पेरणीची सोय लावता आली असती मात्र बँकाचा संथपणा पुन्हा एकदा शेतकºयांना सावकारी चक्र व्युहात अडकवित आहे. बँकाना सरकारकडून निधी वळता होत नसेल तर त्यांनी तसे सरकारला खडसावून सांगावे मात्र त्यासाठी थेट शेतकºयांच्या स्वाभिमानाशी अन् त्यांच्या अर्धांगिणीवर नजर ठेवण्यापर्यत मजल जात असले तर ही नवी सावकारी मोडून काढण्यासाठी सरकारने कठोर होणे गरजेचे आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे या बँकाना कुणाशीही स्पर्धा करावी लागत नाही त्यामुळेच ‘ग्राहक सेवा’ हे केवळ नावापुरतचे राहिले आहे. राष्ट्रीयीकृत बँकामध्ये ग्राहकांशी होणारा व्यवहार हा उद्दामपणाचा असल्याचे अनेक दाखले रोज मिळतात त्यामुळे बुलडाण्यात झालेल्या त्या गंभिर प्रकारासोबतच पीककर्ज वाटपासाठी बँकानी चालविलेल्या प्रकाराची गंभीर दखल घेणे गरजचे आहे. अन्यथा काळ सोकावण्यास वेळ लागणार नाही.

 

टॅग्स :Akolaअकोलाbankबँक