शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

राष्ट्रवादी युवक काँग्रेसद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयावर युवा आक्रोश मोर्चाचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 16:19 IST

अकोला - निष्क्रीय सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसव्दारे पश्चिम विदर्भात तीन दिवस युवा आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे विदर्भ समन्वयक संग्रामभैय्या गावंडे यांनी बुधवारी येथे आयोजीत पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देराष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांच्या मार्गदर्शनात १२ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर हा बेरोजगार युवकांचा मोर्चा धडकणार आहे.कौशल्य विकास योजना कार्यान्वीत केली मात्र अद्याप एकाही बेरोजगार युवकाला नोकरी देण्यात आली नसल्याचा आरोप संग्राम गावंडे यांनी केला. एक नव्हे तर शेकडो समस्या या सरकारने उभ्या केल्या असून या विरोधात युवा आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती संग्राम गावंडे यांनी दिली.

अकोला - केंद्रामध्ये भाजपाची सत्ता आल्यानंतर वर्षाला दोन कोटी बेरोजगार युवकांना नोकरी देण्याचे आश्वासन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिले होते, प्रधानमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार चार वर्षात तब्बल ८ कोटी बेरोजगारांना नोकरी देणे अपेक्षित होते मात्र केवळ पाच लाख नोकºया देण्यात आलेल्या आहे. त्यामूळे या निष्क्रीय सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसव्दारे पश्चिम विदर्भात तीन दिवस युवा आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे विदर्भ समन्वयक संग्रामभैय्या गावंडे यांनी बुधवारी येथे आयोजीत पत्रकार परिषदेत दिली.राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांच्या मार्गदर्शनात १२ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर हा बेरोजगार युवकांचा मोर्चा धडकणार आहे. देशातील केवळ पाच लाख युवकांना नोकºया देण्यात आल्याचे अर्थमंत्र्यांनी कबुल केले आहे. यासोबतच नोटबंदीमुळे हजारो युवकांचे रोजगार गेले असून छोटे उद्योग व व्यवसाय बंद पडले आहेत. कौशल्य विकास योजना कार्यान्वीत केली मात्र अद्याप एकाही बेरोजगार युवकाला नोकरी देण्यात आली नसल्याचा आरोप संग्राम गावंडे यांनी केला. या योजनेत राज्यात सात हजार २५२ प्रशिक्षण संस्थाना सरकारने एक छदामही दिला नाही. त्यामूळे या ठिकाणी काम करणारे तब्बल ५५ हजार नोकरदार बेरोजगार झाले आहेत. डी. एड. बी. एड झालेल्या उमेदवारांना नोकरी नाही. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या दरवर्षी ४५० ते ५०० जागा भरल्या जायचा मात्र यावर्षी केवळ ५९ जागांची जाहीरात काढण्यात आली. ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद पडल्यात जमा आहे. मॅनेजमेंट कोटयामध्ये प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद करण्यात आली आहे. एक नव्हे तर शेकडो समस्या या सरकारने उभ्या केल्या असून या विरोधात युवा आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती संग्राम गावंडे यांनी दिली. पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश सरप पाटील, पंकज गावंडे, मनोज तिवारी, विजय ताले, विपुल घोगरे, बुढन गाडेकर, अमर डिकाव, देवेंद्र शिरसाट, शैलेष बोदडे, डॉ. अनंत मानकर, गोपाल चतरकर उपस्थित होते. 

टॅग्स :AkolaअकोलाNCPराष्ट्रवादी काँग्रेसAkola District Collector officeअकोला जिल्हाधिकारी कार्यालय