शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
5
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
6
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
7
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
8
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
9
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
11
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
12
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
13
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
14
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
15
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
16
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
17
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
18
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
19
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
20
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे

राष्ट्रवादी युवक काँग्रेसद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयावर युवा आक्रोश मोर्चाचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 16:19 IST

अकोला - निष्क्रीय सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसव्दारे पश्चिम विदर्भात तीन दिवस युवा आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे विदर्भ समन्वयक संग्रामभैय्या गावंडे यांनी बुधवारी येथे आयोजीत पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देराष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांच्या मार्गदर्शनात १२ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर हा बेरोजगार युवकांचा मोर्चा धडकणार आहे.कौशल्य विकास योजना कार्यान्वीत केली मात्र अद्याप एकाही बेरोजगार युवकाला नोकरी देण्यात आली नसल्याचा आरोप संग्राम गावंडे यांनी केला. एक नव्हे तर शेकडो समस्या या सरकारने उभ्या केल्या असून या विरोधात युवा आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती संग्राम गावंडे यांनी दिली.

अकोला - केंद्रामध्ये भाजपाची सत्ता आल्यानंतर वर्षाला दोन कोटी बेरोजगार युवकांना नोकरी देण्याचे आश्वासन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिले होते, प्रधानमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार चार वर्षात तब्बल ८ कोटी बेरोजगारांना नोकरी देणे अपेक्षित होते मात्र केवळ पाच लाख नोकºया देण्यात आलेल्या आहे. त्यामूळे या निष्क्रीय सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसव्दारे पश्चिम विदर्भात तीन दिवस युवा आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे विदर्भ समन्वयक संग्रामभैय्या गावंडे यांनी बुधवारी येथे आयोजीत पत्रकार परिषदेत दिली.राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांच्या मार्गदर्शनात १२ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर हा बेरोजगार युवकांचा मोर्चा धडकणार आहे. देशातील केवळ पाच लाख युवकांना नोकºया देण्यात आल्याचे अर्थमंत्र्यांनी कबुल केले आहे. यासोबतच नोटबंदीमुळे हजारो युवकांचे रोजगार गेले असून छोटे उद्योग व व्यवसाय बंद पडले आहेत. कौशल्य विकास योजना कार्यान्वीत केली मात्र अद्याप एकाही बेरोजगार युवकाला नोकरी देण्यात आली नसल्याचा आरोप संग्राम गावंडे यांनी केला. या योजनेत राज्यात सात हजार २५२ प्रशिक्षण संस्थाना सरकारने एक छदामही दिला नाही. त्यामूळे या ठिकाणी काम करणारे तब्बल ५५ हजार नोकरदार बेरोजगार झाले आहेत. डी. एड. बी. एड झालेल्या उमेदवारांना नोकरी नाही. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या दरवर्षी ४५० ते ५०० जागा भरल्या जायचा मात्र यावर्षी केवळ ५९ जागांची जाहीरात काढण्यात आली. ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद पडल्यात जमा आहे. मॅनेजमेंट कोटयामध्ये प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद करण्यात आली आहे. एक नव्हे तर शेकडो समस्या या सरकारने उभ्या केल्या असून या विरोधात युवा आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती संग्राम गावंडे यांनी दिली. पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश सरप पाटील, पंकज गावंडे, मनोज तिवारी, विजय ताले, विपुल घोगरे, बुढन गाडेकर, अमर डिकाव, देवेंद्र शिरसाट, शैलेष बोदडे, डॉ. अनंत मानकर, गोपाल चतरकर उपस्थित होते. 

टॅग्स :AkolaअकोलाNCPराष्ट्रवादी काँग्रेसAkola District Collector officeअकोला जिल्हाधिकारी कार्यालय