शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

लासलगावचा कांदा घेऊन नाशिकचा शेतकरी अकोल्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 12:29 IST

व्यापाºयाकडून कांद्याला भाव मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरीच आता बाजारात उतरला आहे. लासलगावचा कांदा घेऊन नाशिकचा शेतकºयावर अकोल्यात येऊन कांद्याची विक्री करावी लागत आहे.

अकोला: पश्चिम महाराष्ट्रामध्ये कांद्याचे भाव पडल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. पिकवलेल्या मोत्यांना घामाचे दाम मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. व्यापाºयाकडून कांद्याला भाव मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरीच आता बाजारात उतरला आहे. लासलगावचा कांदा घेऊन नाशिकचा शेतकºयावर अकोल्यात येऊन कांद्याची विक्री करावी लागत आहे.कांद्याला पन्नास, एक रुपये किलोने दर मिळत असल्यामुळे शेतकºयाचा कांदा विक्रीचा खर्चही निघत नाही. त्यामुळे शेतकरी फुकटात कांदा देण्यासोबतच रस्त्यावर कांदा फेकून शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध नोंदवित आहेत. शेतमालाला भाव नाही. व्यापारी वाट्टेल त्या किमतीमध्ये कष्टाने पिकवलेला शेतमाल मागतो. शेतकºयाला नफा तर सोडाच, त्याने पिकवलेल्या शेतमाल लागवडीचा खर्चही निघत नसल्याने, शेतकरी हवालदिल झाला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये, व्यापाºयाला माल विकण्यापेक्षा त्याने आता स्वत:च मालाची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिक जिल्ह्यातील काही शेतकरी ट्रकने कांदा घेऊन अकोल्यात दाखल झाले आहेत. एक ते दोन रुपये किलो दराने कांदा विकण्यापेक्षा अकोल्यात ५0 ते ७0 रुपयांमध्ये दहा किलो कांद्यांची गोणी तयार करून हे शेतकरी विकत आहेत. बाजारामध्ये १५ रुपये किलो दराने कांदा मिळत असल्याने, नागरिकांनाही पाच ते सहा रुपये किलो दराने कांदा स्वस्त मिळत आहे. त्यामुळे या शेतकºयांना अकोल्यातील नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. बाजारपेठेतील भावापेक्षा स्वविक्रीतून शेतकºयांच्या कांद्याला चांगला दर मिळत नसल्यामुळे अकोल्यात दररोज दोन ते तीन ट्रक कांदा नाशिकवरून येत आहे. जिल्हा कारागृहासमोर ट्रक उभा करून हे शेतकरी कांद्याची विक्री करीत आहेत. या विक्रीतून शेतकºयांच्या कांद्याला ७00 ते ८00 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळत आहे. (प्रतिनिधी)

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरी