शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

लासलगावचा कांदा घेऊन नाशिकचा शेतकरी अकोल्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 12:29 IST

व्यापाºयाकडून कांद्याला भाव मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरीच आता बाजारात उतरला आहे. लासलगावचा कांदा घेऊन नाशिकचा शेतकºयावर अकोल्यात येऊन कांद्याची विक्री करावी लागत आहे.

अकोला: पश्चिम महाराष्ट्रामध्ये कांद्याचे भाव पडल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. पिकवलेल्या मोत्यांना घामाचे दाम मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. व्यापाºयाकडून कांद्याला भाव मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरीच आता बाजारात उतरला आहे. लासलगावचा कांदा घेऊन नाशिकचा शेतकºयावर अकोल्यात येऊन कांद्याची विक्री करावी लागत आहे.कांद्याला पन्नास, एक रुपये किलोने दर मिळत असल्यामुळे शेतकºयाचा कांदा विक्रीचा खर्चही निघत नाही. त्यामुळे शेतकरी फुकटात कांदा देण्यासोबतच रस्त्यावर कांदा फेकून शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध नोंदवित आहेत. शेतमालाला भाव नाही. व्यापारी वाट्टेल त्या किमतीमध्ये कष्टाने पिकवलेला शेतमाल मागतो. शेतकºयाला नफा तर सोडाच, त्याने पिकवलेल्या शेतमाल लागवडीचा खर्चही निघत नसल्याने, शेतकरी हवालदिल झाला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये, व्यापाºयाला माल विकण्यापेक्षा त्याने आता स्वत:च मालाची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिक जिल्ह्यातील काही शेतकरी ट्रकने कांदा घेऊन अकोल्यात दाखल झाले आहेत. एक ते दोन रुपये किलो दराने कांदा विकण्यापेक्षा अकोल्यात ५0 ते ७0 रुपयांमध्ये दहा किलो कांद्यांची गोणी तयार करून हे शेतकरी विकत आहेत. बाजारामध्ये १५ रुपये किलो दराने कांदा मिळत असल्याने, नागरिकांनाही पाच ते सहा रुपये किलो दराने कांदा स्वस्त मिळत आहे. त्यामुळे या शेतकºयांना अकोल्यातील नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. बाजारपेठेतील भावापेक्षा स्वविक्रीतून शेतकºयांच्या कांद्याला चांगला दर मिळत नसल्यामुळे अकोल्यात दररोज दोन ते तीन ट्रक कांदा नाशिकवरून येत आहे. जिल्हा कारागृहासमोर ट्रक उभा करून हे शेतकरी कांद्याची विक्री करीत आहेत. या विक्रीतून शेतकºयांच्या कांद्याला ७00 ते ८00 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळत आहे. (प्रतिनिधी)

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरी