शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: अमृतसरमध्ये वीज पुरवठा पूर्ववत; अद्यापही रेड अलर्ट कायम
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

छंद माझा वेगळा!

By admin | Updated: December 10, 2014 01:47 IST

जयश्री बंड यांनी साकारल्या खडूपासून विविध शिल्पाकृती.

अकोला : छंद आपले आयुष्य आनंदी आणि सुखकर करतात. म्हणून आयुष्यात प्रत्येकानं एक तरी छंद जोपासावा, असे म्हटले जाते. येथील राधादेवी गोयनका महिला महाविद्यालयात गृहविज्ञानासह संगीत आणि राज्यशास्त्र हे विषय शिकविणार्‍या प्राध्यापिका जयश्री प्रमोद बंड यांनी खडूपासून विविध शिल्पाकृती निर्माण करण्याचा छंद जोपासला आहे. उपजतच कलेची आणि संगीताची आवड असलेल्या जयश्रीने या कला जोपासण्याची प्रेरणा वडील महादेवराव भुईभार व मामा विठ्ठल वाघ यांच्यामुळे मिळाली. शालेय जीवनात गायनाचे धडे घेत असतानाच विविध पारंपरिक कलाकृती तयार करण्याची आवड त्यांच्यात निर्माण झाली होती. १९९२ मध्ये श्रीमती राधादेवी गोयनका महिला महाविद्यालयात प्राध्यापिकेची नोकरी स्वीकारल्यानंतरदेखील जयश्रीने आपली कला जिवंत ठेवली. लहानशा खडूवर अत्यंत बारीक कलाकुसर करीत त्यांनी विविध महापुरुष, देवी-देवता आणि इतर कलाकृती साकारल्या आहेत. आकाराने लहान असल्या तरी अत्यंत सुबक व व्यक्तिरेखा ठळकपणे व्यक्त होणार्‍या या कलाकृतींमध्ये महात्मा गांधी, भगतसिंग, लोकमान्य टिळक, स्वामी विवेकानंद, विनोबा भावे, सावित्रीबाई फुले, पेशवेकालीन स्त्रीया, विविध आकार आणि प्रकारचे गणपती, साईबाबा, तुळशी वृंदावन, महादेवाची पिंड, विविध काटरून, प्राणी, विविध प्रकारचे मासे, एवढेच नव्हे तर विविध प्रकारचे चेहरे यांचा समावेश आहे. १९८५ मध्ये शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागप्रमुख प्रमोद बंड यांच्याशी विवाहबद्ध झाल्यानंतर केवळ पतीचे नव्हे, तर सासू-सासरे वत्सला आणि माधवराव बंड यांचेदेखील प्रोत्साहन आपल्या छंदाला लाभल्याचे त्या सांगतात. महाविद्यालयाच्या प्राचार्य वीणा मोहोड यांचेदेखील मार्गदर्शन लाभते. जोपासलेल्या छंदाचे वटवृक्षात रूपांतर व्हावे, अशी जयश्री बंड यांची मनीषा आहे.