शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
2
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
3
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
4
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
5
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
6
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
7
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
8
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
9
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
10
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
11
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
12
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
13
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
14
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
15
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
16
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
17
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
18
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
19
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
20
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...

मुस्लीम बांधव करणार गणेश विसर्जन मिरवणुकीचे स्वागत

By admin | Updated: September 6, 2014 02:33 IST

अकोला येथील गणेश विर्सजन मिरवणुकीदरम्यान ६ जनरेटर व १ हजार दिव्यांची व्यवस्था

अकोला : अनेक वर्षांपासून शहरामध्ये गणेशोत्सव उत्साहात आणि शांततेने पार पाडल्या जातो. हिंदू, मुस्लिमांनी एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा केला. आम्ही अतिसंवेदनशील शहराची ओळख पुसून टाकली आहे. यंदाचाही उत्सव शांततेत पार पडणार, अशी अपेक्षा व्यक्त करीत यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीचे मुस्लीम बांधवही स्वागत करतील, असे अभिवचन शांतता समितीतील मुस्लीम सदस्यांनी दिले. जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी सकाळी ११.३0 वाजताच्या सुमारास शांतता समितीची सभा पार पडली. सभेला आ. गोवर्धन शर्मा, आ. गोपीकिसन बाजोरिया, पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा, अतिरिक्त पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, निवासी उ पजिल्हाधिकारी अनिल खंडागळे, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी उन्हाळे, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, शहराचे सहायक पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, उपायुक्त दयानंद चिंचोलीकर, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्याध्यक्ष अँड. मोतीसिंह मोहता उपस्थित होते. सभेमध्ये शांतता समितीच्या सदस्यांनी अनेक प्रश्न जिल्हाधिकार्‍यांसमोर मांडले.गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सर्वच शांतता समितीचे सदस्य प्रयत्न करतील. उत्सवाला कुठेही गालबोट लागू नये, याची खबरदारी घेतली. प्रशासनानेही रस्त्यांवरील खड्डे, पथदिव्यांची समस्या मार्गी लावण्याची मागणी शांतता समिती सदस्यांनी केली. गेल्या अनेक वर्षांपासून शहरात हिंदू, मुस्लीम बांधव एकत्र येऊन शांततेत गणेशोत्सव पार पडतात. यंदाही आम्ही उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी प्रयत्न करू, असेही सदस्यांनी स्पष्ट केले. * विसर्जन मार्गावर ६ जनरेटर, हजार पथदिवेगणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान गोंधळ उडू नये, यासाठी जिल्हा प्रशासन खबरदारी घेत आहेत. विसर्जन मार्गावर मनपाच्यावतीने ६ जनरेटर व १ हजार पथदिव्यांची व्यवस्था करण्यात येत आहे. दरम्यान भारनियमन होणार नाही, याची काळजी आम्ही घेत आहोत. तसेच गणेश मंडळांनी विना डिजे मिरवणुकीत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी केले. * मिरवणुकीवर २३ सीसी कॅमेर्‍यांचे लक्षगणेश विसर्जन मिरवणूक मार्गावर २३ सीसी कॅमेरे लावण्यात आले आहेत. या कॅमेर्‍यांमार्फत मिरवणुकीतील प्रत्येक हालचालींवर लक्ष राहणार आहे. सीसी कॅमेर्‍यांचे नियंत्रण ताजनापेठ पोलिस चौकी आणि पोलिस नियंत्रण कक्षातून होणार आहे. * विकासावर चिंतन व्हावेपोलिस अधीक्षकांनी, हे करू नका, ते करा यावर बोलण्यापेक्षा शहरातील रस्त्यांवर खड्डे का आहेत? शहराचा विकास का झाला नाही? अशा प्रश्नांवर चिंतन होणे गरजेचे आहे आणि त्यासाठी मानसिकता बदलण्याची गरज आहे. कायदा व नियम महत्त्वाचे आहेत. ते कोणी पाळणार नसेल तर त्यांच्याविरुद्ध कारवाई होईल. डिजे व वाद्ये वाजविण्यास मनाई नाही; परंतु आवाजाच्या र्मयादेचे भान जरूर असावे. ६५ टक्के लोकांना ध्वनी प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागतो. त्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा गुन्हा दाखल न करता, थेट कारवाईचे आदेश दिलेले आहेत, अशी माहि ती दिली. * देश तो हमारा है..सभेदरम्यान अँड. मोतीसिंह मोहता यांनी, पोलिस गणेश भक्तांवर जाणीवपूवर्क कारवाई करतात. गुन्हे दाखल करतात. डिजे, वाद्ये वाजविण्यास मनाई केली जाते. हे शहर आमचे आहे, तुमचे नाही. वरिष्ठ अधिकारी येथे बदलून येतात आणि जातात; परंतु त्याचे परिणाम गणेश भक्तांना भोगावे लागता त, असा मुद्दा मांडला. यावर उत्तर देताना, पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी, शहर आपका है, लेकिन देश तो हमारा है..सर्वांनी एकत्र येऊन उत्सव साजरा करावा. कायदा व नियमांचे पालनही महत्त्वाचे आहे. असे सांगितल्यावर सभागृहातील उपस्थितांनी टाळय़ांचा कडकडाट केला. * ही तर अशांतता समितीशुक्रवारी झालेल्या सभेमध्ये शांतता समितीच्या सदस्यांनी गोंधळ घालीत, ते शांतता समितीमध्ये नव्हे तर अशांतता समितीचे सदस्य असल्याचा परिचय दिला. सभेदरम्यान शांतता समितीचे सदस्य विषय मांडण्यासाठी उभे राहत आणि अर्धा तासपर्यंत बोलत. त्यामुळे इतरांना बोलण्याची संधी मिळत नसल्याने, काही सदस्यांनी वारंवार बोलणार्‍यांविरुद्ध आक्षेप घेतला आणि सभेमध्ये गोंधळ निर्माण केला. पाच ते सहा सदस्य तर व्यासपीठापर्यंत येऊन, त्या सदस्याचे भाषण बंद करण्याचे सांगत होते.