शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
2
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
3
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
4
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
5
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
6
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
7
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
8
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
9
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
10
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
11
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
12
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
13
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
14
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
15
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
16
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
17
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
18
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
19
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
20
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
Daily Top 2Weekly Top 5

मूर्तिजापूर : एसटीच्या संपामुळे प्रवाशांची तारांबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 19:31 IST

‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे ब्रीद असलेल्या एसटी कर्मचारी संघटानांनी धनत्रयोदशीपासून सुरू केलेल्या संपामुळे प्रवाशांची तारांबळ उडाली. खासगी प्रवासी वाहतूक करणार्‍यांनी या संधीचा फायदा घेऊन दिवाळी साजरी केल्याचे म्हटल्या जात आहे.

ठळक मुद्देधनतेरसच्या दिवशी एसटीच्या तिजोरीत खडखडाटखासगी वाहतूकदारांनी उचलला संपाचा फायदा

लोकमत न्यूज नेटवर्कमूर्तिजापूर : दीपावलीच्या पर्वावर आपल्या गावाकडे परतणार्‍या चाकरमान्यांसह सासरहून माहेरी जाणार्‍या नवविवाहिता, विवाहितांसह मामाच्या गावाला जाण्याची ओढ असलेल्या बच्चे कंपनीमुळे बसस्थानके गर्दीने फुलून जातात. एसटी विभागाच्या उत्पन्नातील घट भरून काढण्यास दीपावली सणानिमित्त प्रवास करणार्‍या प्रवाशांच्या वाढणार्‍या गर्दीचा मोठा हातभार लागतो. प्रवासी सर्वात पहिली पसंती एसटी प्रवासालाच देतात. त्यामुळे एसटीने आपले स्थान प्रवासी वर्गात टिकवून ठेवले आहे. ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे ब्रीद असलेल्या एसटी कर्मचारी संघटानांनी धनत्रयोदशीपासून सुरू केलेल्या संपामुळे प्रवाशांची तारांबळ उडाली. खासगी प्रवासी वाहतूक करणार्‍यांनी या संधीचा फायदा घेऊन दिवाळी साजरी केल्याचे म्हटल्या जात आहे.एसटी कर्मचार्‍यांचा संप सुरू असल्याने स्थानिक बसस्थानकावरून सुटणार्‍या बसफेर्‍या सकाळपासून बंद होत्या. मूर्तिजापूर येथे मुंबई-हावडा लोहमार्गाचे जंक्शन रेल्वे स्टेशन आहे. त्यामुळे कारंजा, दारव्हा, यवतमाळ, दर्यापूर, अंजनगावसह तालुक्यातील ग्रामीण क्षेत्रातील प्रवाशांची येथे मोठी गर्दी झाली होती. एसटीचा संप असल्याने या प्रवाशांची तारांबळ उडाली व मनस्ताप सहन करावा लागला. खासगी वाहनाने घर गाठण्याकरिता दुप्पट तिकीट द्यावे लागले. संपामुळे बसस्थानकावर शुकशुकाट होता. खासगी वाहतूकदारांनी या संधीचा फायदा करून घेतला. कारंजा, दर्यापूर या ठिकाणी जाण्यासाठी दुप्पट पैसे मोजावे लागल्याचे प्रवाशांनी सांगितले. संपूर्ण कुटुंबासह गावाकडे जाणार्‍या प्रवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. सदर संपामुळे मूर्तिजापूर आगाराच्या ६0 पेक्षा अधिक बसफेर्‍या रद्द झाल्या. दररोज विविध ठिकाणांवरून येणार्‍या-जाणार्‍या २00 पेक्षा अधिक बसफेर्‍या रद्द झाल्या. दीपावलीच्या सणानिमित्त ग्रामीण भागातून खरेदीकरिता येणारे गावकरी, शाळकरी, विद्यार्थी यांची कुचंबणा झाली. आगाराचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. एसटी कर्मचार्‍यांच्या वेतनात वाढ झाली पाहिजे, त्यांच्या समस्यांचा निपटारा झाला पाहिजे; परंतु दीपावली या महत्त्वपूर्ण सणाच्या काळात संप करणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न प्रवासी वर्गात चर्चिल्या जात होता. 

दिवाळीचा सण गावावरून मुलगा, मुलगी, नातू, भाऊ, बहीण, आत्या, मावशी, काका-काकू अशी नात्यातील माणसे येणार म्हणून सर्वत्र उत्साह आणि आनंदाचे वातावरण आहे; परंतु ऐनवेळी एसटीचा बेमुदत संप सुरू झाल्याने सणासाठी नात्यातील माणसे वेळेवर पाोहोचतात की नाही, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. एसटीच्या संपामुळे खासगी वाहतूकदारांचा फायदा होत आहे.- श्रीकृ ष्ण रा. गवई, प्रवासी, खापरवाडा.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळ