शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात ‘तुरखेड’ची मतमोजणीच नाही - 'वंचित'चा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 13:04 IST

२१० मतांची मोजणी न करताच प्रशासनाने मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचा निकाल जाहीर करून भाजपाचे उमेदवार हरीश पिंपळे यांना विजयी घोषित केल्याचा आरोप पत्रकार परिषदेत त्यांनी केला.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये तुरखेड मतदान केंद्र क्रमांक १९० वरील मतदान न मोजताच निकाल जाहीर केल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते राजेंद्र पातोडे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला. या प्रकरणी त्यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असून, निकाल रद्द न झाल्यास न्यायालयात याचिका टाकणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.मूर्तिजापूर विधानसभा निवडणुकीत मतमोजणीमध्ये झालेल्या गैरप्रकारासंदर्भात सोमवारी शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पातोडे म्हणाले की, २१ आॅक्टोबर रोजी मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातील ३८१ मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया पार पडली. मतदानाच्या दिवशी १ लाख ७४ हजार ७९९ मतदान झाल्याचा आकडा प्रशासनाने दिला होता. त्यामध्ये तुरखेड येथील जिल्हा परिषद शाळा मतदान केंद्र क्रमांक १९० येथे एकूण २१० म्हणजेच ५२.२४ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याचे स्पष्ट केले होते; परंतु २४ आॅक्टोबर रोजी मत मोजणीमध्ये १ लाख ७४ हजार ५८९ मतांचा आकडा जाहीर करण्यात आला. एकूण झालेले मतदान आणि मोजण्यात आलेल्या मतदानात २१० मतांची तफावत आहे.मतमोजणीनंतर प्रशासनाकडून मिळालेल्या कागदपत्रांमध्ये केंद्र क्रमांक १९० चा ‘फॉर्म क्रमांक १७ सी’ नव्हता, तर मतमोजणीच्या दिवशी तयार करण्यात आलेल्या फॉर्म क्रमांक २० मध्ये तुरखेड येथील मतदान केंद्र क्र. १९० वरील आकडेवारी शून्य दाखविण्यात आल्याने हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. म्हणजेच तुरखेड मतदान केंद्रावर झालेल्या २१० मतांची मोजणी न करताच प्रशासनाने मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचा निकाल जाहीर करून भाजपाचे उमेदवार हरीश पिंपळे यांना विजयी घोषित केल्याचा आरोप पत्रकार परिषदेत त्यांनी केला.मतमोजणीची पूर्ण प्रक्रिया न करताच निकाल जाहीर केल्याने संपूर्ण निवडणूक प्रक्रिया अर्धवट असल्याचे त्यांनी म्हटले. त्यामुळे मूर्तिजापूर विधानसभा निवडणुकीचा निकाल रद्द करून नव्याने निवडणूक घ्यावी. तसेच दोषपूर्ण प्रक्रिया राबविणाºया जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांना तत्काळ बडतर्फ करावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार प्रतिभा अवचार यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाºयांकडे केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पातोडे, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष प्रभा शिरसाट उपस्थित होते.‘एसडीओ’ म्हणतात...!मूर्तिजापूरचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते यांनी सदर आरोप खोडून काढला. ते म्हणाले की, विजयी उमेदवार व पराभूत उमेदवार यांच्या विजयादरम्यानच्या मतांमध्ये १,९१० मतांचा फरक आहे. तुरखेड येथील मतदान केंद्र क्रमांक १९० मध्ये मतदान पार्टीने सीआरसी केली नाही. तेथील मतदान मशीनमध्ये २६१ मते निघाली. अर्थात तेथे २१0 असे प्रत्यक्ष मतदान झाले आणि मॉकपोलचे ५१ असे एकूण २६१ मतदान करण्यात आले. दोन उमेदवाराच्या १,९१० मतांचा फरक असल्याने त्या केंद्रावरील मतमोजणी करणे आवश्यक नाही, असा निवडणूक आयोगाचा नियम आहे. जर १००-२०० मतांचा फरक असता तर ती मते ग्राह्य धरल्या गेली असती. २१० मते कुठल्याही उमेदवाराकडे वळविली तरी निकालावर फरक पडणार नाही. आम्ही त्यावेळी जी भूमिका घेतली ती निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार व नियमानुसार घेतली आहे. ज्या मतदान पार्टीने सीआरसी केली नाही त्यांच्यावर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू असून, या संदर्भात त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

 

 

टॅग्स :AkolaअकोलाVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीmurtizapur-acमूर्तिजापूर