शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात ‘तुरखेड’ची मतमोजणीच नाही - 'वंचित'चा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 13:04 IST

२१० मतांची मोजणी न करताच प्रशासनाने मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचा निकाल जाहीर करून भाजपाचे उमेदवार हरीश पिंपळे यांना विजयी घोषित केल्याचा आरोप पत्रकार परिषदेत त्यांनी केला.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये तुरखेड मतदान केंद्र क्रमांक १९० वरील मतदान न मोजताच निकाल जाहीर केल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते राजेंद्र पातोडे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला. या प्रकरणी त्यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असून, निकाल रद्द न झाल्यास न्यायालयात याचिका टाकणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.मूर्तिजापूर विधानसभा निवडणुकीत मतमोजणीमध्ये झालेल्या गैरप्रकारासंदर्भात सोमवारी शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पातोडे म्हणाले की, २१ आॅक्टोबर रोजी मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातील ३८१ मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया पार पडली. मतदानाच्या दिवशी १ लाख ७४ हजार ७९९ मतदान झाल्याचा आकडा प्रशासनाने दिला होता. त्यामध्ये तुरखेड येथील जिल्हा परिषद शाळा मतदान केंद्र क्रमांक १९० येथे एकूण २१० म्हणजेच ५२.२४ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याचे स्पष्ट केले होते; परंतु २४ आॅक्टोबर रोजी मत मोजणीमध्ये १ लाख ७४ हजार ५८९ मतांचा आकडा जाहीर करण्यात आला. एकूण झालेले मतदान आणि मोजण्यात आलेल्या मतदानात २१० मतांची तफावत आहे.मतमोजणीनंतर प्रशासनाकडून मिळालेल्या कागदपत्रांमध्ये केंद्र क्रमांक १९० चा ‘फॉर्म क्रमांक १७ सी’ नव्हता, तर मतमोजणीच्या दिवशी तयार करण्यात आलेल्या फॉर्म क्रमांक २० मध्ये तुरखेड येथील मतदान केंद्र क्र. १९० वरील आकडेवारी शून्य दाखविण्यात आल्याने हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. म्हणजेच तुरखेड मतदान केंद्रावर झालेल्या २१० मतांची मोजणी न करताच प्रशासनाने मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचा निकाल जाहीर करून भाजपाचे उमेदवार हरीश पिंपळे यांना विजयी घोषित केल्याचा आरोप पत्रकार परिषदेत त्यांनी केला.मतमोजणीची पूर्ण प्रक्रिया न करताच निकाल जाहीर केल्याने संपूर्ण निवडणूक प्रक्रिया अर्धवट असल्याचे त्यांनी म्हटले. त्यामुळे मूर्तिजापूर विधानसभा निवडणुकीचा निकाल रद्द करून नव्याने निवडणूक घ्यावी. तसेच दोषपूर्ण प्रक्रिया राबविणाºया जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांना तत्काळ बडतर्फ करावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार प्रतिभा अवचार यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाºयांकडे केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पातोडे, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष प्रभा शिरसाट उपस्थित होते.‘एसडीओ’ म्हणतात...!मूर्तिजापूरचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते यांनी सदर आरोप खोडून काढला. ते म्हणाले की, विजयी उमेदवार व पराभूत उमेदवार यांच्या विजयादरम्यानच्या मतांमध्ये १,९१० मतांचा फरक आहे. तुरखेड येथील मतदान केंद्र क्रमांक १९० मध्ये मतदान पार्टीने सीआरसी केली नाही. तेथील मतदान मशीनमध्ये २६१ मते निघाली. अर्थात तेथे २१0 असे प्रत्यक्ष मतदान झाले आणि मॉकपोलचे ५१ असे एकूण २६१ मतदान करण्यात आले. दोन उमेदवाराच्या १,९१० मतांचा फरक असल्याने त्या केंद्रावरील मतमोजणी करणे आवश्यक नाही, असा निवडणूक आयोगाचा नियम आहे. जर १००-२०० मतांचा फरक असता तर ती मते ग्राह्य धरल्या गेली असती. २१० मते कुठल्याही उमेदवाराकडे वळविली तरी निकालावर फरक पडणार नाही. आम्ही त्यावेळी जी भूमिका घेतली ती निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार व नियमानुसार घेतली आहे. ज्या मतदान पार्टीने सीआरसी केली नाही त्यांच्यावर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू असून, या संदर्भात त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

 

 

टॅग्स :AkolaअकोलाVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीmurtizapur-acमूर्तिजापूर