शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

मूर्तिजापूरची पाणीटंचाई; ७.४८ कोटींचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 02:03 IST

मूर्तिजापूर शहरातील पाणीटंचाई निवारणासाठी घुंगशी बॅरेजमधून पाणी पुरवठा करण्याकरिता ७ कोटी ४८ लाख ४२ हजार रुपयांच्या योजनेचा प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांनी मंगळवारी अमरावती विभागीय आयुक्तांकडे पाठविला आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकार्‍यांनी योजनेचा प्रस्ताव पाठविला विभागीय आयुक्तांकडेमहानपासून उन्नई बंधार्‍यापर्यंंत जलवाहिनीसाठी निविदा प्रक्रिया पूर्ण!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : मूर्तिजापूर शहरातील पाणीटंचाई निवारणासाठी घुंगशी बॅरेजमधून पाणी पुरवठा करण्याकरिता ७ कोटी ४८ लाख ४२ हजार रुपयांच्या योजनेचा प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांनी मंगळवारी अमरावती विभागीय आयुक्तांकडे पाठविला आहे.यावर्षीच्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाला नसल्याने, अकोला शहर आणि मूर्तिजापूर शहराला पाणी पुरवठा करणार्‍या महान येथील काटेपूर्णा धरणात अत्यल्प जलसाठा उपलब्ध आहे. धरणातील उपलब्ध जलसाठा अकोला शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी प्रस्तावित असल्याने, मूर्तिजापूर शहराला काटेपूर्णा धरणातून पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. त्यानुषंगाने सद्यस्थितीत मूर्तिजापूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी घुंगशी बॅरेज हाच एकमेव स्रोत असल्याच्या पृष्ठभूमीवर मूर्तिजापूर शहरातील पाणी टंचाई निवारणासाठी शहराला घुंगशी बॅरेजमधून पाणी पुरवठा करण्याची योजना प्रस्तावित आहे. घुंगशी बॅरेज प्रकल्पाची साठवण क्षमता १७.४४४ दशलक्ष घनमीटर असून, पिण्याच्या पाण्यासाठी २.६२ दशलक्ष घनमीटर साठा आरक्षित आहे. मूर्तिजापूर शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी १.५0 दशलक्ष घनमीटर पाण्याची मागणी आहे. त्यानुषंगाने मूर्तिजापूर शहराला घुंगशी बॅरेजमधून पाणी पुरवठा करण्यासाठी ७ कोटी ४८ लाख ४२ हजार रुपयांच्या आकस्मिक पाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी १0 ऑक्टोबर रोजी विभागीय आयुक्तांकडे पाठविला आहे. अंदाजपत्रकासह पाठविलेल्या या पाणीपुरवठा योजनेच्या प्रस्तावास महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या मुख्य अभियंत्यांकडून मान्यता प्राप्त झाली आहे.

महानपासून उन्नई बंधार्‍यापर्यंंत जलवाहिनीसाठी निविदा प्रक्रिया पूर्ण!जिल्ह्यातील खारपाणपट्टय़ातल्या खांबोरा प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना महान येथील काटेपूर्णा धरणातून जलवाहिनीद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी महान येथील काटेपूर्णा धरणापासून  खांबोरा जवळील उन्नई बंधार्‍यापर्यंंत जलवाहिनी टाकण्याकरिता १९ कोटी ९१ लाख ६५ हजार रुपयांच्या योजनेला शासनामार्फत मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार जलवाहिनी टाकण्याच्या योजनेंतर्गत निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून, दर मंजुरीचा प्रस्ताव महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत सदस्य-सचिवांकडे सादर करण्यात आला आहे.