शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
5
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
6
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
7
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
8
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
9
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
10
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
11
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
12
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
13
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
14
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
15
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
16
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
17
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
18
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
19
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
20
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही

मूर्तिजापूरची पाणीटंचाई; ७.४८ कोटींचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 02:03 IST

मूर्तिजापूर शहरातील पाणीटंचाई निवारणासाठी घुंगशी बॅरेजमधून पाणी पुरवठा करण्याकरिता ७ कोटी ४८ लाख ४२ हजार रुपयांच्या योजनेचा प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांनी मंगळवारी अमरावती विभागीय आयुक्तांकडे पाठविला आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकार्‍यांनी योजनेचा प्रस्ताव पाठविला विभागीय आयुक्तांकडेमहानपासून उन्नई बंधार्‍यापर्यंंत जलवाहिनीसाठी निविदा प्रक्रिया पूर्ण!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : मूर्तिजापूर शहरातील पाणीटंचाई निवारणासाठी घुंगशी बॅरेजमधून पाणी पुरवठा करण्याकरिता ७ कोटी ४८ लाख ४२ हजार रुपयांच्या योजनेचा प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांनी मंगळवारी अमरावती विभागीय आयुक्तांकडे पाठविला आहे.यावर्षीच्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाला नसल्याने, अकोला शहर आणि मूर्तिजापूर शहराला पाणी पुरवठा करणार्‍या महान येथील काटेपूर्णा धरणात अत्यल्प जलसाठा उपलब्ध आहे. धरणातील उपलब्ध जलसाठा अकोला शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी प्रस्तावित असल्याने, मूर्तिजापूर शहराला काटेपूर्णा धरणातून पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. त्यानुषंगाने सद्यस्थितीत मूर्तिजापूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी घुंगशी बॅरेज हाच एकमेव स्रोत असल्याच्या पृष्ठभूमीवर मूर्तिजापूर शहरातील पाणी टंचाई निवारणासाठी शहराला घुंगशी बॅरेजमधून पाणी पुरवठा करण्याची योजना प्रस्तावित आहे. घुंगशी बॅरेज प्रकल्पाची साठवण क्षमता १७.४४४ दशलक्ष घनमीटर असून, पिण्याच्या पाण्यासाठी २.६२ दशलक्ष घनमीटर साठा आरक्षित आहे. मूर्तिजापूर शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी १.५0 दशलक्ष घनमीटर पाण्याची मागणी आहे. त्यानुषंगाने मूर्तिजापूर शहराला घुंगशी बॅरेजमधून पाणी पुरवठा करण्यासाठी ७ कोटी ४८ लाख ४२ हजार रुपयांच्या आकस्मिक पाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी १0 ऑक्टोबर रोजी विभागीय आयुक्तांकडे पाठविला आहे. अंदाजपत्रकासह पाठविलेल्या या पाणीपुरवठा योजनेच्या प्रस्तावास महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या मुख्य अभियंत्यांकडून मान्यता प्राप्त झाली आहे.

महानपासून उन्नई बंधार्‍यापर्यंंत जलवाहिनीसाठी निविदा प्रक्रिया पूर्ण!जिल्ह्यातील खारपाणपट्टय़ातल्या खांबोरा प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना महान येथील काटेपूर्णा धरणातून जलवाहिनीद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी महान येथील काटेपूर्णा धरणापासून  खांबोरा जवळील उन्नई बंधार्‍यापर्यंंत जलवाहिनी टाकण्याकरिता १९ कोटी ९१ लाख ६५ हजार रुपयांच्या योजनेला शासनामार्फत मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार जलवाहिनी टाकण्याच्या योजनेंतर्गत निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून, दर मंजुरीचा प्रस्ताव महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत सदस्य-सचिवांकडे सादर करण्यात आला आहे.