शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

वीज बचतीला ठेंगा; एलईडीच्या झगमगाटावर उधळपट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 14:52 IST

शहरात अवघ्या १५ ते २० फूट अंतरावर चक्क तीन-तीन एलईडी लाइट उभारण्याचा प्रताप ‘ईईएसएल’कंपनीकडून होत असताना ही अनावश्यक उधळपट्टी कशासाठी, असा सवाल सुज्ञ अकोलेकर विचारू लागले आहेत.

- आशिष गावंडे

अकोला : एकीकडे एलईडीच्या लखलखाटात शहर न्हाऊन निघत असतानाच दुसरीकडे वीज बचतीच्या मूळ उद्देशाला खुद्द महापालिका प्रशासनाकडूनच बाजूला सारल्या जात असल्याचे दिसून येत आहे. शहरात अवघ्या १५ ते २० फूट अंतरावर चक्क तीन-तीन एलईडी लाइट उभारण्याचा प्रताप ‘ईईएसएल’कंपनीकडून होत असताना ही अनावश्यक उधळपट्टी कशासाठी, असा सवाल सुज्ञ अकोलेकर विचारू लागले आहेत. भरमसाट वीज देयकाच्या माध्यमातून हा प्रकार भविष्यात प्रशासनाच्या अंगलट येण्याची चिन्हे आहेत.एलईडीचा लख्ख उजेड व त्यामुळे विजेची होणारी बचत ध्यानात घेता महापालिका स्तरावर एलईडी पथदिवे लावण्यासाठी नगर विकास विभागाने केंद्र शासन प्रमाणित ‘ईईएसएल’ (एनर्जी एफिसीएन्सी सर्व्हिसेस लिमिटेड) कंपनीची नियुक्ती केली. राज्यातील सर्वच महापालिकांमध्ये ईईएसएल कंपनीला पथदिवे उभारणीचा कंत्राट देण्यात आला आहे. मनपा क्षेत्रातील पथदिव्यांची एकूण संख्या, त्यापासून मिळणारा उजेड, त्यावर खर्च होणारी वीज व त्या बदल्यात मनपाला प्राप्त होणारे वीज देयक आदी मुद्दे लक्षात घेता कंपनीसोबत करार करण्यात आला. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी करारनामा मंजूर करण्याची सत्ताधाऱ्यांना घाई होती. त्यानुषंगाने ६ मार्च रोजी महापौर विजय अग्रवाल यांच्या दालनात महापालिका आयुक्त संजय कापडणीस व कंपनीच्या प्रतिनिधींनी करारनाम्यावर स्वाक्षºया केल्या. त्यानंतर शहराच्या विविध भागात कंपनीच्यावतीने एलईडी लाइट उभारण्याचे काम सुरू झाले. वीज बचतीच्या अनुषंगाने कमी वॅटच्या बदल्यात जास्त उजेड देण्यासाठी एलईडी लाइटची ख्याती असल्याने मनपाच्या वाढीव वीज देयकात नक्कीच घसरण होईल,अशी अपेक्षा होती. या ठिकाणी नेमका उलटा प्रकार पाहावयास मिळत आहे. अवघ्या १५ ते २० फूट अंतरावर चक्क तीन-तीन एलईडी लाइट उभारण्याचा सपाटा कंपनीने लावला आहे. गरज नसताना अनावश्यक वीज लाइट उभारल्या जात असल्याने सुज्ञ अकोलेकर मनपा प्रशासन व सत्ताधाऱ्यांच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहेत.‘ईईएसएल’सोबत १९ कोटींचा करारमनपाने ‘ईईएसएल’ कंपनीसोबत १९ कोटी ९० लक्ष रुपयांचा करार केला आहे. यामध्ये लाइट उभारणीसाठी १३ कोटी ९० लक्ष रुपये व देखभाल दुरुस्तीपोटी ६ कोटी रुपये चौदाव्या वित्त आयोगातून अदा केले जातील. एकूणच, आजरोजी शहरात ४० कोटींतून एलईडी लाइट उभारणीचे काम होत असताना अनावश्यक ठिकाणी लाइट लावल्या जात असल्याने सत्तापक्षासह प्रशासनाच्या धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.२० कोटींची कामे अंतिम टप्प्यातशहरात रॉयल इलेक्ट्रॉनिक कंपनीकडून पथदिवे लावण्याचे काम सुरू आहे. यामध्ये मुख्य ५० रस्त्यांसह ११० प्रमुख चौकांचा समावेश असून, पथदिवे उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. यासाठी राज्य शासनाकडून १० कोटी रुपये व मनपाने चौदाव्या वित्त आयोगातून १० कोटींची तरतूद केली होती.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका