शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
2
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
3
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
4
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
5
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
6
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
7
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
8
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
9
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?
10
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
11
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
12
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
13
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?
14
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! 'ही' आहेत ३ मोठी कारणे; घसरणीतही 'या' शेअर्सने मारली बाजी
15
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाच्या मूर्तीवर शिवलिंग का आहे? अनेकांना माहीत नाही कारण!
16
"डच्चू दिला, अहंकार, चॅनेलने बाहेर काढलं...", राशीचक्रकार शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेनं सोडलं मौन, म्हणाला...
17
दोन भाऊ का एकत्र येऊ शकत नाहीत? महेश मांजरेकर म्हणाले, "आपल्याकडे महाभारतापासून..."
18
इंग्लंडच्या बालेकिल्ल्यात जड्डूची 'तलवारबाजी'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय
19
"मराठी विरुद्ध कितीही मोर्चे काढा, आमचं..."; मनसे विरोधात आंदोलन करणाऱ्यांना राजू पाटलांचा इशारा
20
Himachal Flood : हिमाचलमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस! ६३ जणांचा मृत्यू, १०९ जखमी; ४०७ कोटींचं नुकसान

मुंडेंच्या सर्मथनार्थ वर्‍हाडातील शेकडो कार्यकर्त्यांनी दिले होते राजीनामे!

By admin | Updated: June 4, 2014 19:19 IST

भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी सहा वर्षांपूर्वी दिलेल्या राजीनाम्याचे पडसाद पश्‍चिम वर्‍हाडातही उमटले होते.

अजय डांगे / अकोला

मुंबई येथील पक्ष पदाधिकार्‍यांच्या काही नियुक्त्यांवरून नाराज झालेले भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी सहा वर्षांपूर्वी दिलेल्या राजीनाम्याचे पडसाद पश्‍चिम वर्‍हाडातही उमटले होते. मुंडे यांच्या सर्मथनार्थ अकोला, बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यातील शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले होते. चार ते पाच दिवस हे राजीनामा सत्र सुरूच होते. प्रत्येक कार्यकर्त्याला ते नावाने ओळखत होते. कार्यकर्त्यांवर त्यांचा प्रचंड विश्‍वास होता, अशा शब्दात त्यांच्या वर्‍हाडातील सर्मथकांनी स्मृतींना उजाळा दिला. भाजपमधील बहुजन चेहरा, लोकनेता म्हणून ओळख असलेल्या गोपीनाथ मुंडे यांनी वर्‍हाडातील अकोला, बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यात कार्यकर्त्यांची फौजच तयार केली होती. प्रत्येक कार्यकर्त्याला ते जवळून ओळखत. त्यांचा वर्‍हाडातील प्रत्येक गावात दांडगा जनसंपर्क होता. त्यामुळे मुंडे यांचा प्रत्येक निर्णय, आदेश पदाधिकारी आणि कार्यकर्ते शीर्षस्थ मानत. काही वर्षांपूर्वी पक्षाच्या मुंबई येथील पदाधिकार्‍यांच्या नियुक्तीवरून मुंडे नाराज झाले होते. त्यांनी पक्षनेतृत्वाजवळ आपली नाराजी व्यक्त केली होती; मात्र अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर मुंडे यांच्या सर्मथनार्थ अकोला, वाशिम आणि बुलडाणा जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राजीनाम्याचे अस्त्रच उगारले होते. वर्‍हाडातील जवळपास ९५0 पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी राजीनामे दिल्याने, पक्षनेतृत्वामध्ये अस्वस्थता निर्माण होऊन त्यांना मुंडे यांची नाराजी दूर करणे भाग पडले होते. मुंडे यांचे सर्मथक या आठवणी आज जड अंत:करणाने सांगत आहेत.