शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

मुक्काम पोस्ट मेळघाट व्याघ्र प्रकल्प : पुनर्वसित गावकरी, अधिकार्‍यात चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 01:59 IST

अकोट : मेळघाटातील व्याघ्र प्रकल्पात जुन्या गावात पुनर्वसित गावकरी व आदिवासी बांधवांनी १५ दिवसांपासून मुक्काम ठोकला आहे. त्यांना जंगलाबाहेर आणण्याकरिता १0 जानेवारी रोजी दुपारपासून अमरावती व अकोला येथील वन, महसूल व पोलीस अधिकार्‍यांचा ताफा गेला आहे. या ठिकाणी पुनर्वसित गावकरी व अधिकार्‍यांमध्ये मॅरेथॉन चर्चा सुरु आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोट : मेळघाटातील व्याघ्र प्रकल्पात जुन्या गावात पुनर्वसित गावकरी व आदिवासी बांधवांनी १५ दिवसांपासून मुक्काम ठोकला आहे. त्यांना जंगलाबाहेर आणण्याकरिता १0 जानेवारी रोजी दुपारपासून अमरावती व अकोला येथील वन, महसूल व पोलीस अधिकार्‍यांचा ताफा गेला आहे. या ठिकाणी पुनर्वसित गावकरी व अधिकार्‍यांमध्ये मॅरेथॉन चर्चा सुरु आहे. परंतु, जमीन दिल्याशिवाय परतणार नाही, अशी भूमिका गावकर्‍यांनी घेतली आहे. दुसरीकडे त्यांना परत आणण्याकरिता खटकाली गेटवर एस.टी. महामंडळांच्या बसचा ताफा उभा असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. मेळघाटमधून केलपाणी, धारगड, गुल्लरघाट, सोमठाणा बु., सोमठाणा खु., अमोना, नागरतास, बारुखेडा या आठ गावांचे पुनर्वसन अकोट व तेल्हारा तालुक्यात करण्यात आले. शासन नियमाने मोबदला देऊन टप्प्याटप्प्याने २0११ ते २0१५ या पाच वर्षांत या गावांचे पुनर्वसन करण्यात आले. परंतु, या ठिकाणी त्यांना मूलभूत सुविधा मिळाल्या नाहीत. तसेच शेतजमीन न  मिळाल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित करीत पुनर्वसित गावकर्‍यांनी पुन्हा मेळघाटची वाट धरली. गत १५ दिवसांपूर्वी दुसर्‍यांदा पुनर्वसित गावकरी मेळघाटात गेले आहेत. या ठिकाणी राहुट्या उभारून कडक्याच्या थंडीत दिवस काढत आहेत. त्यांना जंगलाबाहेर आणण्याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार रवी राणा यांच्यासह अमरावती जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांना सूचना दिली होती. दोन दिवसांपूर्वीच अमरावतीचे अधिकारी जंगलात जाणार होते. परंतु, माजी आमदार राजकुमार पटेल हे येत नसल्याचे पाहून १0 जानेवारी रोजी अमरावतीचे अधिकारी व अकोला जिल्ह्यातील अधिकारी मेळघाटात दाखल झाले आहेत. या ठिकाणी अधिकारी व गावकर्‍यांत चर्चा सुरू आहे. गेल्या काही महिन्यांपासून पुनर्वसित गावकरी व अधिकार्‍यांमध्ये नुसत्या मॅरेथॉन चर्चा सुरू आहेत. परंतु, अद्यापही शेतजमिनीचा प्रश्न प्रत्यक्षात मार्गी न लागल्याने संतापलेले पुनर्वसित गावकरी व आदिवासी मेळघाटातच मुक्काम ठोकून आहेत. त्यांना आणण्याकरिता अकोट, तेल्हारा, परतवाडा आदी आगाराच्या बस मागविण्यात आल्या आहेत. खटकाली व पोपटखेड गेटवर या बस उभ्या आहेत. मात्र, आधी शेतजमीन द्या, मग जंगलाबाहेर काढा, या मागणीवर पुनर्वसित गावकरी व आदिवासी बांधव ठाम असून, सध्या  सुरू असलेल्या चर्चेतून उशिरा रात्रीपर्यंत यावर काय तोडगा निघतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

मागण्यांवर ठाम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ई-क्लासच्या जमिनी शोधून पुनर्वसित गावकर्‍यांना शेतजमिनी देण्याची प्रक्रिया राबविण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार अकोला व अमरावती जिल्हाधिकारी कामाला लागले आहेत. अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात ५00 एकर ई-क्लासची जमीन निघाल्याची माहिती आहे. या जमिनीचे मोजमाप करून देण्याकरिता भूमिअभिलेख कार्यालयालासुद्धा कळविण्यात आल्याचे कळते. त्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण करून पुनर्वसित गावकर्‍यांना जमिनी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, माजी आमदार संजय गावंडे यांनी दोन दिवसांपूर्वीच पुनर्वसित गावकर्‍यांची भेट घेतली असता, त्यांनी सातबारा द्या, मग जमिनी मोजून द्या. तोपर्यंत जंगलातच राहू द्या, जंगलाचे - वन्य प्राण्यांचे कुठलेही नुकसान हेाणार नाही, अशी बाजू मांडली होती. 

टॅग्स :akotअकोटMelghatमेळघाट