शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
2
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
5
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
6
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
7
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
8
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
9
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
10
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
11
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
12
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
13
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
14
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
15
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
16
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
17
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
18
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
19
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
20
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...

महावितरण ‘त्या’ वीज ग्राहकांना सेवा जोडणी शुल्काचा पर तावा देणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 01:46 IST

अकोला : महावितरणने २0 जानेवारी २00५ ते ३0 एप्रिल  २00७ या कालावधीत वीज ग्राहकांकडून सेवा जोडणी आकार  (सर्व्हिस लाइन चार्ज) व मीटर आकारापोटी वसूल केलेली र क्कम संबंधित ग्राहकांना सव्याज परत करण्याची प्रक्रिया सुरू  केली आहे. ग्राहकांना ही रक्कम वीज देयकात समायोजित  करून मिळणार असल्याचे महावितरणने जारी केलेल्या पत्रकात  म्हटले आहे.

ठळक मुद्देदेयकात होणार समायोजन सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर काढले परिपत्रक

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महावितरणने २0 जानेवारी २00५ ते ३0 एप्रिल  २00७ या कालावधीत वीज ग्राहकांकडून सेवा जोडणी आकार  (सर्व्हिस लाइन चार्ज) व मीटर आकारापोटी वसूल केलेली र क्कम संबंधित ग्राहकांना सव्याज परत करण्याची प्रक्रिया सुरू  केली आहे. ग्राहकांना ही रक्कम वीज देयकात समायोजित  करून मिळणार असल्याचे महावितरणने जारी केलेल्या पत्रकात  म्हटले आहे.नवीन वीज जोडणी देताना महावितरण कंपनीने खांब व नवीन  तारा टाकण्यासाठी तसेच खांबापासून मीटरपयर्ंत तारा जोडणे  आणि मीटर देणे, यासाठी वीज ग्राहकांकडून घेतले होते. या  वीज ग्राहकांना व्याजासह त्यांची रक्कम परत करण्याचा आदेश  सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यानंतर महावितरणने परतावा  देण्याचे परिपत्रक जारी केले आहे. नवीन जोडणी देण्यासाठी विजेचे खांब व तारा टाकावयाच्या  असतील, तर त्याचा खर्च ओआरसी किंवा ओआरसीपी या  नावाखाली संबंधित वीज ग्राहकांकडून जानेवारी २00५ पासून  आकारला जात असे. तसेच सप्टेंबर २00६ नंतर नवीन जोडणी  देण्यासाठी खांबापासून मीटरपयर्ंत तार टाकण्यासाठी (सर्व्हिस  लाइन चार्ज) व मीटरची किंमत महावितरणने घेतली होती.  याच्याविरोधात वीज कायद्यान्वये ऊर्जा नियामक आयोगाकडे  तक्रार दाखल करण्यात आली होती. महाराष्ट्र वीज ग्राहक  संघटनेने दाखल केलेल्या या तक्रारीवर सुनावणी होऊन १७ मे  २00७ व २१ ऑगस्ट २00७ रोजीच्या निकालाप्रमाणे सर्व  वीज ग्राहकांना व्याजासह पूर्ण रक्कम परत करावी, असे आदेश  ऊर्जा नियामक आयोगाने महावितरणला दिले होते. मात्र,  महावितरणने याच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागि तली. सर्वोच्च न्यायालयातसुद्धा वीज ग्राहकांच्याच बाजूने निर्णय  दिला. म्हणजे ऊर्जा नियामक आयोगाचा निकाल कायम ठेवला.  ही न्यायालयीन लढाई वीज ग्राहक संघटनेने तब्बल दहा वर्षे  लढली.आता महावितरण कंपनीने एक परिपत्रक जारी केले आहे. २0  जानेवारी २00५ ते ३0 एप्रिल २00७ या कालावधीमध्ये  नव्याने जोडणी दिलेल्या ज्या ग्राहकांकडून ओआरसी किंवा  ओआरसीपी, तसेच एसएलसी व मीटरची किंमत घेतली आहे,  त्या ग्राहकांना हा परतावा द्यावा, असे या पत्रकात नमूद केले  आहे. राज्यातील अशा वीज ग्राहकांना सुमारे ९00 कोटी रुपये  परतावा मिळणार आहे.

टॅग्स :Power Shutdownभारनियमन