शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

मिस्टर परफेक्शनिस्ट आमिरचा वावर म्हणजे ‘तारे जमीपर ’ !

By admin | Updated: May 10, 2017 07:42 IST

जलसंधारणाच्या केलेल्या कामाचे कौतुक करण्यासाठी सिनेसृष्टीतील मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानला साक्षात यावे लागले.

अकोला : पातूर तालुका हा अकोल्यातील आदिवासीबहुल तालुका. सर्वच बाबतीत दुर्लक्षित असा परिसर; मात्र या तालुक्याचा सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभाग झाला अन् या भागातील गावकऱ्यांनी संधीचं सोनं करीत अवघ्या राज्यात श्रमदानातून जलसंधारणाचा आदर्श निर्माण केला. चारमोळी, शिर्ला ही या तालुक्यातील प्रातिनिधीक गावे. येथील ग्रामस्थांनी जलसंधारणाच्या केलेल्या कामाचे कौतुक करण्यासाठी सिनेसृष्टीतील मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानला साक्षात यावे लागले. नेहमी पडद्यावर दिसणारा हा हीरो प्रत्यक्षात सामान्य व्यक्तीसारखा वावरला. ग्रामस्थांशी बोलला, प्रेमाने खांद्यावर हात ठेवला. हा साधेपणा ग्रामस्थांना भारावून टाकणारा होताच, सोबतच आमिरसारखा सुपरस्टार जमिनीवर असल्याचा प्रत्यय देणारा ठरला. सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या निमित्ताने चित्रपट अभिनेता आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव मंगळवारी अकोल्यात येणार, यावर अनेकांचा विश्वासही बसत नव्हता; मात्र आमिरला घेऊन येणारे विमान सकाळी ८.५३ वाजता विमानतळावर उतरले अन् विनम्रपणे हात जोडत आमिर खान विमानाच्या बाहेर आला. त्याचे यथोचित स्वागत करण्यात आले. त्यानंतर ते थेट चारमोळी गावाकडे निघाले. त्या ठिकाणी आमिरला पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. जो तो आमिरला जवळून बघता यावे म्हणून धडपडताना दिसत होते. यात प्रशासनाचे अधिकारी आणि सुरक्षा व्यवस्था सांभाळणाऱ्या पोलिसांचाही समावेश होता. आमिर खान व त्यांच्या पत्नी किरण राव या सहजतेने वावरत होत्या. सुरक्षेचा बडेजाव नाही. वैशाखातील उन्हाच्या चटक्यांची तक्रार नाही. चारमोळी व शिर्ला या दोन्ही गावात बोलताना आमिर म्हणाले की, जलसंधारणाचे काम पाहून मला आणि किरणला मोठा आनंद झाला आहे. हे काम मला जगण्याची ऊर्जा देते. ही एकमेव स्पर्धा आहे की, ज्यामध्ये कुणीही हरत नाही. आमिर यांच्या वागण्यातील सहजताच गावकऱ्यांची मने जिंकत जलसंधारणाचा संदेश देऊन गेली.