शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
मुंबईतील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप
4
इराणसाठी इस्लामिक देश बनले काळ, अमेरिकेने रचला चक्रव्यूह; ४० हजार जवान अलर्टवर
5
IND vs ENG : आम्ही बुमराहला घाबरत नाही! तो सर्वोत्तम गोलंदाज असला तरी... मॅच आधी काय म्हणाला बेन स्टोक्स?
6
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
7
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...
8
'देशात लवकरच इंग्रजीत बोलणाऱ्यांना लाज वाटायला लागेल'; अमित शाह यांचे विधान, काय म्हणाले?
9
इराणचे सर्वेसर्वा खामेनेई मुळचे भारतातील...; पणजोबा इराणला गेले, वडिलांनी क्रांती घडविली अन्...
10
अमेरिकेच्या एन्ट्रीची शक्यता! इराण-इस्रायल युद्धाने जगाची चिंता वाढवली, पेट्रोल-डिझेल महागणार?
11
सोन्याची झळाळी झाली कमी; चांदी एका झटक्यात ₹२०६९ नं स्वस्त, पाहा काय आहेत नवे दर
12
इस्रायलविरोधात एकही मुस्लिम देश इराणच्या बाजूने नाही; आता खमेनी सरकारपुढे कोणता मार्ग?
13
ज्येष्ठ योगिनी एकादशी: ‘असे’ करा व्रतपूजन, समस्यांतून व्हाल मुक्त; अपार यश-प्रगती लाभेल!
14
४० जणांच्या जमावाकडून घरावर हल्ला, दगडविटांचा केला वर्षाव, महिला, लहान मुले कुणालाच सोडलं नाही  
15
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
16
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
17
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
18
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
19
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
20
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?

एमपीएससीचे विद्यार्थी गोंधळात; परीक्षांच्या तारखांचा लागला घोर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:23 IST

अकोला: कोरोनाचा प्रादुर्भाव, तसेच अन्य तांत्रिक कारणांमुळे राज्य लोकसेवा आयोगाद्वारे करण्यात येणारी पदभरती, घेण्यात येणाऱ्या परीक्षा, नियुक्त्या रखडलेल्या आहेत. ...

अकोला: कोरोनाचा प्रादुर्भाव, तसेच अन्य तांत्रिक कारणांमुळे राज्य लोकसेवा आयोगाद्वारे करण्यात येणारी पदभरती, घेण्यात येणाऱ्या परीक्षा, नियुक्त्या रखडलेल्या आहेत. परीक्षांच्या तारखाच जाहीर झाल्या नसल्याने विद्यार्थी स्पर्धा परीक्षांच्या प्रतीक्षेत आहेत.

शेतकरी, शेतमजूर, कामगारांची मुले एमपीएससीची तयारी करीत आहेत. कोरोनामुळे गरीब सामान्य वर्गातील कुटुंबाची आर्थिक घडी विस्कटलेली आहे. अशातच मागील दीड ते दोन वर्षांपासून परीक्षा लांबणीवर जाणे, नियुक्त्या रखडणे, नवीन पदभरती न होणे हे विद्यार्थ्यांसाठी भयावह आहे. परिणामी विद्यार्थ्यांचे शारीरिक, आर्थिक तसेच मानसिक खच्चीकरण होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये रोष व्यक्त होत आहे.

एमपीएससीमार्फत घेण्यात येणाऱ्या आरटीओची पूर्व परीक्षा होऊन दीड वर्ष झाले, तरीही निकाल लागलेला नाही. सहा. वन संरक्षकाच्या परीक्षेचा अंतिम निकाल गेल्या वर्षभरापासून लागलेला नाही. वर्ग-क च्या मंत्रालयीन पदांकरिता दोन वर्षांपासून जाहिरात नाही. तसेच कृषी विभागातील पदभरती रखडलेली आहे. पीएसआय पदासाठी, शारीरिक चाचणी दीड वर्षापासून झालेली नाही.

-----------------------------------

विद्यार्थ्यांचे वय निघून चालले!

कोरोना परिस्थितीत पुढे ढकललेल्या परीक्षांमुळे उमेदवारांच्या वयाचा प्रश्न आहे. दोन वर्षांपासून तर एकही जाहिरात नाही. अशा परिस्थितीतही परीक्षार्थी आर्थिक संकटाचा सामना करून परीक्षांच्या तारखा जाहीर नसतानाही तयारी करत आहे. राज्य सरकारने अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच आयोगाच्या सर्व जागा भरण्याचे आश्वासन दिले आहे. नव्या कमिटीने विद्यार्थ्यांचे सर्व प्रलंबित प्रश्न त्वरित सोडवावेत अशी अपेक्षा आहे. वय वाढत असल्याने समस्या वाढत चालल्या आहेत.

- शिवाजी विष्णू गरड, विद्यार्थी.

---------------------------------

परीक्षा होत नसल्याने मुलांचे वय निघून जात आहे. परीक्षेच्या तयारीसाठी ते दुसरे जॉब करीत नाही. मुलींचे सामाजिक प्रश्न निर्माण झाले आहे. यासाठी सरकार आणि एमपीएससीही जबाबदार आहे. एमपीएससी आपल्या निर्णयावर ठाम नाही. सरकारचा हस्तक्षेप वाढला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

- सचिन मुंडे, विद्यार्थी.

---------------------------------

यावर्षीच्या परीक्षांच्या तारखा कधी जाहीर होणार?

- गत दोन वर्षांपासून कोरोनाचे संकट असल्याने परीक्षा कधी जाहीर होणार याबाबत संभ्रम आहे.

- एमपीएससीच्या परीक्षांच्या तारखा त्वरित जाहीर केल्यास विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी सोईस्कर होणार आहे.

------------------------------------------

ऑनलाईन क्लास किती दिवस चालणार?

१) कोरोनाला रोखण्यासाठी फिजिकल डिस्टन्सिंग आवश्यक असल्याने सध्या क्लास हे ऑनलाईन पद्धतीने सुरू आहेत.

२) ऑनलाईन क्लास घेताना तांत्रिक अडचणी येत असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होते. तसेच मोबाईलवरच क्लास होत असल्याने डोळ्यांचे आजार वाढण्याची भीती आहे.

३) कोचिंग क्लासला परवानगी मिळाल्यास विद्यार्थ्यांसह क्लास चालकालाही दिलासा मिळणार आहे; मात्र कोरोनाचे संकट कायम असल्याने ऑनलाईन क्लास किती दिवस चालणार, याबाबत संभ्रम आहे.

-----------------------------------

क्लास चालकही अडचणीत !

क्लास बंद असल्याने शिक्षक व विद्यार्थ्यांचे नाते दुरावले आहे. विद्यार्थी एकट्यात अभ्यास करीत असल्याने नैराश्य निर्माण झाले असून, स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू होणे गरजेचे आहे. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गत दीड वर्षांपासून क्लास बंद असल्याने क्लास चालकांवरही उपासमारीची वेळ आली आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी हे समजूतदार असतात. त्यामुळे ते कोरोना नियमांचे पालन करतीलच. अनलॉक प्रक्रियेत सर्व सुरू होत आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करण्याची परवानगी देऊन क्लास चालकांना दिलासा द्यावा.

- दीपक रामकृष्ण पठाडे, अध्यक्ष, विदर्भ स्पर्धा परीक्षा शिक्षक व विद्यार्थी संघटना.

------------------------------------

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्पर्धा परीक्षा केंद्र बंद असल्याने क्लास चालक अडचणीत आहेत. कोरोनाचे संकट कधी जाणार हे निश्चित नाही, तसेच दीड ते दोन वर्षांपासून परीक्षा लांबणीवर जाणे, नियुक्त्या रखडणे, नवीन पदभरती न होणे यामुळे विद्यार्थ्यांचा कल कमी होत चालला आहे. शासनाने स्पर्धा परीक्षांच्या तारखा व अंदाजे वेळापत्रक जाहीर करावे, तसेच अटी व शर्तीवर क्लास सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी.

अजित राऊत, क्लास चालक.