शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

अमरावतीहून किसान रेल्वे सुरू करण्यासाठी हालचाली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 12:08 IST

अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ जिल्ह्यांनाही किसान विशेष रेल्वेचा लाभ व्हावा, याकरिता पश्चिम विकास समिती सरसावली आहे.

अकोला : शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालास जलद गतीने परराज्यात विक्रीसाठी पाठविता यावे, या उद्देशाने देशातील पहिली किसान विशेष रेल्वे नाशिक येथून सुरू झाल्यानंतर, आता अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ जिल्ह्यांनाही या रेल्वेचा लाभ व्हावा, याकरिता पश्चिम विकास समिती सरसावली आहे. अमरावती येथून किसान रेल्वे सुरू करावी, या मागणीसाठी पश्चिम विकास समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन रेल्वे सुरू करण्यामागची भूमिका विषद केल्याची माहिती अध्यक्ष दिनेश सूर्यवंशी यांनी शुक्रवारी येथील पत्रकार परिषदेत दिली.अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये संत्री, केळी, सीताफळ, पपई या फळांसह कापूस, हरभरा, सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. याशिवाय गोड पाण्यातील मासे, दूध, पालेभाज्या, रानभाज्या, पान या नाशवंत मालांचेही मोठे उत्पादन होते. शेतकºयांनी उत्पादित केलेल्या या मालाची वाहतूक जलद गतीने बाजारपेठेपर्यंत व्हावी, यासाठी विभागातून किसान रेल्वे सुरू करावी, अशी मागणी जोर धरत आहे. सुलभ व स्वस्त वाहतुकीची सुविधा नसल्यामुळे शेतकरी नाशवंत मालाचे उत्पादन करण्यास धजावत नाहीत. रेल्वेद्वारे वाहतुकीची सुविधा उपलब्ध झाल्यास शेतकरी मोठ्या प्रमाणात या मालाचे उत्पादन घेतील. पर्यायाने पश्चिम विदर्भातील शेतकºयांचे जीवनमान उंचावेल, यासाठी अमरावती विभागाचे मुख्यालय असलेल्या अमरावती येथून किसान रेल्वे सुरू करण्याच्या मागणीसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली असता, त्यांनी सकारात्मक भूमिका घेऊन रेल्वेराज्यमंत्री हरसिमरत कौर बादल यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली, असे दिनेश सूर्यवंशी यांनी सांगितले. गडकरी यांच्या निर्देशानुसार ही रेल्वे सुरू करण्यासाठी अमरावती विभागातील सर्व संबंधित घटकांसोबत चर्चा करण्याच्या उद्देशाने विदर्भ विकास समितीचे पदाधिकारी पाचही जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. सर्व काही सुरळीत झाले, तर आगामी प्रजासत्ताकदिनी अमरावती येथून किसान रेल्वे सुरू होईल, अशी आशा सूर्यवंशी यांनी व्यक्त केली. पत्रकार परिषदेला समितीचे संयोजक नितीन भुतडा व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

 

टॅग्स :railwayरेल्वेAkolaअकोलाAmravatiअमरावती