शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीहून किसान रेल्वे सुरू करण्यासाठी हालचाली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 12:08 IST

अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ जिल्ह्यांनाही किसान विशेष रेल्वेचा लाभ व्हावा, याकरिता पश्चिम विकास समिती सरसावली आहे.

अकोला : शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालास जलद गतीने परराज्यात विक्रीसाठी पाठविता यावे, या उद्देशाने देशातील पहिली किसान विशेष रेल्वे नाशिक येथून सुरू झाल्यानंतर, आता अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ जिल्ह्यांनाही या रेल्वेचा लाभ व्हावा, याकरिता पश्चिम विकास समिती सरसावली आहे. अमरावती येथून किसान रेल्वे सुरू करावी, या मागणीसाठी पश्चिम विकास समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन रेल्वे सुरू करण्यामागची भूमिका विषद केल्याची माहिती अध्यक्ष दिनेश सूर्यवंशी यांनी शुक्रवारी येथील पत्रकार परिषदेत दिली.अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये संत्री, केळी, सीताफळ, पपई या फळांसह कापूस, हरभरा, सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. याशिवाय गोड पाण्यातील मासे, दूध, पालेभाज्या, रानभाज्या, पान या नाशवंत मालांचेही मोठे उत्पादन होते. शेतकºयांनी उत्पादित केलेल्या या मालाची वाहतूक जलद गतीने बाजारपेठेपर्यंत व्हावी, यासाठी विभागातून किसान रेल्वे सुरू करावी, अशी मागणी जोर धरत आहे. सुलभ व स्वस्त वाहतुकीची सुविधा नसल्यामुळे शेतकरी नाशवंत मालाचे उत्पादन करण्यास धजावत नाहीत. रेल्वेद्वारे वाहतुकीची सुविधा उपलब्ध झाल्यास शेतकरी मोठ्या प्रमाणात या मालाचे उत्पादन घेतील. पर्यायाने पश्चिम विदर्भातील शेतकºयांचे जीवनमान उंचावेल, यासाठी अमरावती विभागाचे मुख्यालय असलेल्या अमरावती येथून किसान रेल्वे सुरू करण्याच्या मागणीसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली असता, त्यांनी सकारात्मक भूमिका घेऊन रेल्वेराज्यमंत्री हरसिमरत कौर बादल यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली, असे दिनेश सूर्यवंशी यांनी सांगितले. गडकरी यांच्या निर्देशानुसार ही रेल्वे सुरू करण्यासाठी अमरावती विभागातील सर्व संबंधित घटकांसोबत चर्चा करण्याच्या उद्देशाने विदर्भ विकास समितीचे पदाधिकारी पाचही जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. सर्व काही सुरळीत झाले, तर आगामी प्रजासत्ताकदिनी अमरावती येथून किसान रेल्वे सुरू होईल, अशी आशा सूर्यवंशी यांनी व्यक्त केली. पत्रकार परिषदेला समितीचे संयोजक नितीन भुतडा व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

 

टॅग्स :railwayरेल्वेAkolaअकोलाAmravatiअमरावती