शहरं
Join us  
Trending Stories
1
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
2
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
3
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
4
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
5
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
6
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
7
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
8
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
9
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
10
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
11
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
12
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
13
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
14
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
15
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
16
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
17
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
18
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
19
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
20
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन

पश्‍चिम विदर्भात ७५ हजार हेक्टरपेक्षा अधिक पिकाचे नुकसान !

By admin | Updated: March 15, 2015 00:02 IST

फळे गळाली,भाजीपाला लोळला, शेतकरी हवालदिल.

अकोला : मागील आठवडयापासून सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे पश्‍चिम विदर्भातील गहू, हरभरा या पिकांसह भाजीपाला, फळपिकांचे जवळपास ७५ हजार हेक्टरच्यावर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, शुक्रवारी रात्री अकोला जिल्ह्यात पाऊण तास वादळी पाऊस झाला. पश्‍चिम विदर्भातील अकोला, वाशिम, बुलडाणा, यवतमाळ आणि अमरावती याच पाच जिल्हय़ात गेल्या पावसाळ्य़ात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने सर्वच खरीप पिकांचे उत्पादन घटले होते. रब्बी पिकावर आस लावून बसलेल्या शेतकर्‍यांना या पावसाने पीक एन काढणीच्यावेळी फटका दिल्याने रब्बी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. १ मार्चपर्यंत यवतमाळ १७,४४६ हेक्टर, अमरावती जिल्हय़ात ७ हजार तर अकोला जिल्ह्यात १,८३0 हेक्टर क्षेत्रावरील पिकांना या पावसाचा फटका बसला आहे. यामध्ये १३,२00 हेक्टर हरभर्‍याचे क्षेत्र असून, गव्हाचे क्षेत्र १२,६00 आहे. १८१ हेक्टरवरील फळ पिकांचे नुकसान झाले होते तर २0८ हेक्टर क्षेत्रावरील भाजीपाला व इतर पिकांचे नुकसान झाले होते.पण हा पाऊस ूउसंतच देत नसून , वादळीवार्‍यासह गारपीट होत असल्याने सर्वच पिकांचे नुकसान होत आहे. गत आठ दिवसात पश्‍चिम विदर्भातील पीक नुकसानाचा आकडा हा पन्नास हजार हेक्टरच्यावर गेला आहे. विभागीय कृषी सहसंचालक एस.आर. सरदार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अवकाळी पावसाने पश्‍चिम विदर्भातील गहू, हरभरा पिकांचे नुकसान झाले असल्याचे सांगीतले. मात्र पाऊस सुरू च असल्याने सर्वेक्षण व नुकसानाचे आकडे बदलत असल्याचे स्पष्ट केले. *पिकांची काढणी रखडली रब्बी हंगामातील गहू, हरभरा आणि खरीपातील तूर काढणी सध्या सुरू आहे. पण हा पाऊस उसंत देत नसल्याने आणि पिके शेतात अक्षरश: आडवी झाल्याने शेतकर्‍यांनी हवालदिल झाला आहे. पावसामुळे काढणी रखडली आहे.