शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

पश्‍चिम विदर्भात ७५ हजार हेक्टरपेक्षा अधिक पिकाचे नुकसान !

By admin | Updated: March 15, 2015 00:02 IST

फळे गळाली,भाजीपाला लोळला, शेतकरी हवालदिल.

अकोला : मागील आठवडयापासून सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे पश्‍चिम विदर्भातील गहू, हरभरा या पिकांसह भाजीपाला, फळपिकांचे जवळपास ७५ हजार हेक्टरच्यावर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, शुक्रवारी रात्री अकोला जिल्ह्यात पाऊण तास वादळी पाऊस झाला. पश्‍चिम विदर्भातील अकोला, वाशिम, बुलडाणा, यवतमाळ आणि अमरावती याच पाच जिल्हय़ात गेल्या पावसाळ्य़ात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने सर्वच खरीप पिकांचे उत्पादन घटले होते. रब्बी पिकावर आस लावून बसलेल्या शेतकर्‍यांना या पावसाने पीक एन काढणीच्यावेळी फटका दिल्याने रब्बी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. १ मार्चपर्यंत यवतमाळ १७,४४६ हेक्टर, अमरावती जिल्हय़ात ७ हजार तर अकोला जिल्ह्यात १,८३0 हेक्टर क्षेत्रावरील पिकांना या पावसाचा फटका बसला आहे. यामध्ये १३,२00 हेक्टर हरभर्‍याचे क्षेत्र असून, गव्हाचे क्षेत्र १२,६00 आहे. १८१ हेक्टरवरील फळ पिकांचे नुकसान झाले होते तर २0८ हेक्टर क्षेत्रावरील भाजीपाला व इतर पिकांचे नुकसान झाले होते.पण हा पाऊस ूउसंतच देत नसून , वादळीवार्‍यासह गारपीट होत असल्याने सर्वच पिकांचे नुकसान होत आहे. गत आठ दिवसात पश्‍चिम विदर्भातील पीक नुकसानाचा आकडा हा पन्नास हजार हेक्टरच्यावर गेला आहे. विभागीय कृषी सहसंचालक एस.आर. सरदार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अवकाळी पावसाने पश्‍चिम विदर्भातील गहू, हरभरा पिकांचे नुकसान झाले असल्याचे सांगीतले. मात्र पाऊस सुरू च असल्याने सर्वेक्षण व नुकसानाचे आकडे बदलत असल्याचे स्पष्ट केले. *पिकांची काढणी रखडली रब्बी हंगामातील गहू, हरभरा आणि खरीपातील तूर काढणी सध्या सुरू आहे. पण हा पाऊस उसंत देत नसल्याने आणि पिके शेतात अक्षरश: आडवी झाल्याने शेतकर्‍यांनी हवालदिल झाला आहे. पावसामुळे काढणी रखडली आहे.