शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

वातावरणात ५० टक्क्यांपेक्षा अधिक धूळ : अकोल्याचा गुदमरतोय श्वास !

By atul.jaiswal | Updated: November 18, 2017 14:36 IST

अकोला : धुळीचे शहर अशी ओळख होत असलेल्या अकोल्यातील धुळीचे प्रमाण निश्चित मानकापेक्षा ५० टक्के जास्त असल्याचा अहवाल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिला आहे. यासोबतच शहरातील वाहनांची संख्याही वाढत असून, या वाहनांच्या धुरामुळेही शहरातील हवा प्रदूषित झाली आहे.

ठळक मुद्देवाहनांच्या धुराचीही भरदम्याचा आजार बळावला

- अतुल जयस्वाल

 अकोला : धुळीचे शहर अशी ओळख होत असलेल्या अकोल्यातील धुळीचे प्रमाण निश्चित मानकापेक्षा ५० टक्के जास्त असल्याचा अहवाल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिला आहे. यासोबतच शहरातील वाहनांची संख्याही वाढत असून, या वाहनांच्या धुरामुळेही शहरातील हवा प्रदूषित झाली आहे. धूर आणि धुळीच्या मिश्रणामुळे अकोल्याचा श्वास गुदमरत असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. दमा व श्वसनासंबंधीचे विकार वाढीस लागल्याचे डॉक्टर सांगत असले, तरी प्रशासनाकडून या प्रकाराची फारशी गंभीर दखल घेतल्या जात नसल्याचे चित्र आहे.हवेची गुणवत्ता खराब असलेल्या राज्यातील १७ शहरांमध्ये अकोल्याचा समावेश आहे. वाढती धूळ, जाळलेला कचरा, प्लास्टिक व रासायनिक वस्तूंचे वाढते प्रमाण आणि वाहनांच्या प्रदूषणामुळे दमा, श्वसन विकार आणि फुप्फुस विकारांमध्ये तिपटीने वाढ झाली आहे. प्रदूषण, धूळ, धुराच्या संपर्कात आल्यामुळे नागरिकांना सर्दी, खोकला, कफ वाढणे, श्वास घेण्यास त्रास होणे यासारखे आजार वाढत आहेत. वातावरणातील धूळ व धुराचा लहान मुले व वृद्धांना सर्वाधिक त्रास होत असून, त्यांना श्वसनाचे विकार जडत आहेत.धूर, धूळ व जड हवेच्या मिश्रणाची शहरावर चादरअकोला शहरात मुख्य रस्ते सिमेंटचे झाले असले, तरी या रस्त्यांवरही धूळ उडताना दिसते. बहुतांश मुख्य रस्त्यांवरून वाहने गेल्यानंतर धूळ उडते. रस्त्यांवरील ही धूळ हवेत मिसळून नाकांवाटे नागरिकांच्या श्वसनसंस्थेत प्रवेश करते. सायंकाळच्या वेळी रस्त्यावरील धूळ, वाहनांचे धूर व जड झालेली हवा यांच्या मिश्रणाची दाट चादर शहराला कवेत घेते.

ब्लॅक कार्बन, धुळीचे कण ठरताहेत घातकशहरांमधील वातावरणातील प्रदूषणाला कारणीभूत सल्फेट नायट्रेटस, कार्बन मोनोआॅक्साइड, ब्लॅक कार्बन, धुळीचे कण व २.५ मायक्रॉनचे पार्टिकल कण श्वसननलिकेमध्ये श्वासाद्वारे शरीरात शिरतात. त्यामुळे श्वसननलिका लालसर होते, आकुंचन पावते. यापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी जागरूक होण्याची गरज आहे.

२० टक्के शाळकरी मुलांना अस्थमावाढते प्रदूषण, मानसिक ताण व धकाधकीच्या जीवनामुळे दिवसेंदिवस अस्थमाचे रुग्ण वाढत आहेत. यामध्ये शाळकरी मुलांचे प्रमाण लक्षणीय असून, सुमारे २० टक्के मुलांना अस्थमाने आपल्या जाळ्यात ओढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अकोला शहरातही हे प्रमाण मोठे आहे. अस्थमा असलेल्या अनेक रुग्णांना त्यांना हा आजार झाल्याची कल्पनाही नसते. अस्थमाचे शाळकरी मुलांमधील वाढते प्रमाण चिंताजनक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

श्वसन विकाराचे वाढते प्रमाण चिंताजनकश्वसन विकारामध्ये भारताचा क्रमांक सातवा होता. आता भारत तिसºया क्रमांकावर आला असून, श्वसन विकाराचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. भारतात दरवर्षी १२ ते २० लाख रुग्ण श्वसन, फुप्फुस आजारांनी ग्रस्त असल्याचे आढळून येतात. श्वसन विकारामध्ये खोकला, कफ पडणे, श्वास घेण्यास त्रास होणे, छातीत घरघर करणे, फुप्फुस कमकुवत होणे आदी त्रास जाणवतात.वाहनांच्या धुरामुळे होणारे प्रदूषण व धूळ ही मानवी आरोग्यासाठी घातक असल्यामुळे नागरिकांनी बाहेर पडताना मास्क किंवा नाकाला रुमाल बांधण्याची खबरदारी बाळगावी, तसेच आठवड्यातून एक दिवस सायकलचा वापर केल्यास प्रदूषणाचे प्रमाण कमी होण्यासही मदत होईल.

- डॉ. अभिजित अडगावकर, सहयोगी प्राध्यापक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला.

 

टॅग्स :Akola cityअकोला शहर