शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
4
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
5
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
6
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
7
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
8
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
9
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
10
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
11
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
12
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
13
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
14
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
15
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
17
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
18
गरिबांच्या खिशावर ‘दरोडा’ टाकणाऱ्या लाचखोरांच्या मालमत्तेवर ‘हातोडा’ कधी?
19
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
20
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली

मूग-उडिदाचे उत्पादन बुडाले; रब्बी पेरणीचे आव्हान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 15:43 IST

पावसात खंड पडल्याने, जिल्ह्यातील बहुतांश भागत मूग व उडीद पिकाच्या पेरण्या उलटल्या होत्या.

अकोला: पाऊस सुरू होण्यास झालेला विलंब आणि त्यानंतर पावसात खंड पडल्याने, जिल्ह्यात मूग व उडीद पिकाच्या पेरण्या उलटल्याने, यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यात मूग व उडिदाचे उत्पादन बुडाले. त्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर रब्बी पेरणीचा खर्च भागविण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. त्यानुषंगाने मूग-उडीद उत्पादक शेतकऱ्यांना रब्बी पेरणीसाठी शासनाकडून मदत देण्याची मागणी होत आहे.यावर्षीच्या पावसाळ्यात जिल्ह्यात पाऊस सुरू होण्यास विलंब झाला. रिमझिम पावसात खरीप पेरण्या झाल्यानंतर गत २३ जुलैपर्यंत पावसात खंड पडल्याने, जिल्ह्यातील बहुतांश भागत मूग व उडीद पिकाच्या पेरण्या उलटल्या होत्या. तसेच अनेक शेतकºयांना मूग व उडीद पिकाची वखरणी करावी लागली. त्यामुळे यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यात मूग, उडीद पिकाचे उत्पादन बुडाले असून, पेरणीचा खर्चही वसूल झाला नसल्याने, जिल्ह्यातील मूग, उडीद उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. रब्बी हंगामातील पेरणी तोंडावर आली असून, रब्बी पेरणीचा खर्च कसा भागविणार, असा प्रश्न आर्थिक अडचणीत सापडलेल्या मूग, उडीद उत्पादक शेतकºयांसमोर निर्माण झाला आहे. त्यानुषंगाने अडचणीत सापडलेल्या मूग व उडीद उत्पादक शेतकºयांना रब्बी पेरणीसाठी शासनामार्फत मदत देण्यात यावी, अशी मागणी शेतकºयांकडून होत आहे.पावसात खंड पडल्याने शेतकºयांना मूग व उडीद पिकाची वखरणी करावी लागली. मूग-उडीद पिकाचे उत्पादन बुडाल्याने, शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे रब्बी पेरणीसाठी मूग व उडीद उत्पादक शेतकºयांना शासनाकडून मदत मिळाली पाहिजे.- मनोज तायडेशेतकरी जागर मंच, अकोला.

 

टॅग्स :agricultureशेतीAkolaअकोलाFarmerशेतकरी