शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

मोदी सरकार असेपर्यंत सरदार पटेल यांच्या मूर्तीपेक्षा उंच मूर्ती होणार नाही - जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 14:17 IST

अकोला: सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्मारकच सर्वात उंच असले पाहिजे, यासाठी मुंबईच्या अरबी समुद्रातील आंतरराष्ट्रीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाची उंची कमी करण्यात येत असून, जोपर्यंत नरेंद्र मोदी सरकार आहे, तोपर्यंत सरदार वल्लभभाई पटेल यांच्या मूर्तीपेक्षा दुसरी उंच मूर्ती होणार नाही, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शनिवारी येथे केला.

अकोला: सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्मारकच सर्वात उंच असले पाहिजे, यासाठी मुंबईच्या अरबी समुद्रातील आंतरराष्ट्रीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाची उंची कमी करण्यात येत असून, जोपर्यंत नरेंद्र मोदी सरकार आहे, तोपर्यंत सरदार वल्लभभाई पटेल यांच्या मूर्तीपेक्षा दुसरी उंच मूर्ती होणार नाही, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शनिवारी येथे केला.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर अयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. केंद्र आणि राज्य सरकारवर टीका करीत, मुख्यमंत्री रोजच नव्या घोषणा करतात, ते त्यांच्या आणि लोकांच्याही लक्षात राहत नाही, असा आरोप त्यांनी केला. सरकारच्या धोरणाविरुद्ध काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात यापूर्वी संघर्ष यात्रा काढली आहे, असेही पाटील यांनी सांगितले....तर समृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचे नाव मागण्याची वेळ आली नसती!दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रती मुख्यमंत्र्यांना प्रेम असते, तर समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी करण्याची वेळ आली नसती, असा आरोप जयंत पाटील यांनी केला. समृद्धी महामार्गासाठी जमीन संपादनात मोठा घोटाळा झाल्याचा आरोपही पाटील यांनी केला.काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची जागा वाटपावर चर्चा सुरू!आगामी लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची सध्या राज्यातील जागा वाटपावर चर्चा सुरू आहे. विधानसभा निवडणूकही आघाडी मिळून लढविणार आहे, आघाडीतील मित्र पक्षांसाठी काही जागा सोडण्यात येतील, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :AkolaअकोलाNCPराष्ट्रवादी काँग्रेसJayant Patilजयंत पाटीलNarendra Modiनरेंद्र मोदी