शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
2
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
3
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
4
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
5
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
6
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
7
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
8
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
9
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
10
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
11
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
12
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
13
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
14
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
15
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
16
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
17
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
18
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
19
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
20
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कुपोषित बालकांसाठी ‘मिशन झीरो’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 01:41 IST

शिर्ला : पातूर तालुक्यातील डोंगराळ दुर्गम भागात आढळून आलेल्या ३१ कुपोषित बालकांना सक्षम करण्यासाठी ‘मिशन झीरो’ राबविण्याला तहसीलदार डॉ.आर. जी. पुरी यांनी सुरुवात केली आहे. बोडखा डोंगरी गावातील अनिकेत राजेश सरदार आणि ऋतुजा राजेश सरदार २५ महिन्यांच्या बालकांना कुपोषणातून बाहेर काढण्यासाठी मदत म्हणून पातूर आयुर्वेद विशारद डॉ. नितीन शेंडे तथा राष्ट्रीय सेवा योजनेच्या प्रा. भास्कर काळे यांनी जबाबदारी स्वीकारली.    

ठळक मुद्देपातूरचे तहसीलदार पुरी यांचा पुढाकार सहा महिन्यांत कुपोषण आणणार शून्यावर!

लोकमत न्यूज नेटवर्कशिर्ला : पातूर तालुक्यातील डोंगराळ दुर्गम भागात आढळून आलेल्या ३१ कुपोषित बालकांना सक्षम करण्यासाठी ‘मिशन झीरो’ राबविण्याला तहसीलदार डॉ.आर. जी. पुरी यांनी सुरुवात केली आहे. बोडखा डोंगरी गावातील अनिकेत राजेश सरदार आणि ऋतुजा राजेश सरदार २५ महिन्यांच्या बालकांना कुपोषणातून बाहेर काढण्यासाठी मदत म्हणून पातूर आयुर्वेद विशारद डॉ. नितीन शेंडे तथा राष्ट्रीय सेवा योजनेच्या प्रा. भास्कर काळे यांनी जबाबदारी स्वीकारली.                        पातूर तहसीलदार डॉ. आर. जी. पुरी यांनी थेट बोडखा गाठले. स्वत: वैद्यकीय शास्त्रात पारंगत असल्याने कुपोषित बालकांची तपासणी केली. त्याबरोबरच पातूर तालुका प्रभारी बालविकास अधिकारी समाधान राठोड ह्यांच्याकडून माहिती घेतली.  तालुक्यातील मळसूर येथील तीन, आलेगाव पाच, अंधारसांगवी दोन, चोंढी दोन, झरंडी पाच, या व्यतिरिक्त १२ मुले कुपोषित आहेत. याकडे आरोग्य विभागाने लक्ष देण्याची गरज आहे 

काय आहे मिशन झिरो?पातूर तालुक्यामध्ये असलेल्या कुपोषित बालकांची जबाबदारी समाजकार्य करणार्‍या व्यक्तींकडे विशेषत: डॉक्टरांकडे सोपवण्यात येणार आहे. या व्यक्तींना जबाबदारी दिलेल्या बालकाला सहा महिन्यांत कुपोषणातून बाहेर काढण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे. तालुक्यातील सर्व कुपोषित बालकांची जबाबदारी स्वीकारून तहसीलदार पुरी यांनी कुपोषित बालकांची संख्या शून्यावर आणण्याचा मानस व्यक्त केला आहे. त्यानुसार त्यांनी कार्यही सुरू केले आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाययोजना तहसीलच्यावतीने राबवण्यात येणार आहेत. 

बालविकास प्रकल्प अधिकार्‍यांचे पद रिक्त मानवी निर्देशांक उंचावण्यासाठी शासनाचा मानव विकास मिशन कार्यक्रम गत दोन वर्षांपासून पातूर तालुक्यात कार्यान्वित आहे. मात्र, देशाच्या उज्‍जवल भविष्य असणारी लहान मुलांची काळजी घेणारी यंत्रणा अव्यवस्थित आहे. वर्षापासून पातूर तालुका बालविकास प्रकल्प अधिकारी पद रिक्त आहे. त्याबरोबरच पातूर अणि मळसूरची पर्यवेक्षकांची पदे रिक्त आहेत. येथील विस्तार समाधान राठोड यांच्याकडे  प्रभार देण्यात आलेला आहे. सदर अधिकार्‍यांचा वेळ शासकीय बैठकांमध्ये खर्च होतो. त्यामुळे शासनाने रिक्त पदे भरणे गरजेचे आहे.

पातूर तालुक्यातील कु पोषित बालके      आगीखेड येथील ऐश्‍वर्या प्रेमसिंग तवर, शिर्ला येथील विरा अनिल दाणे, अनुष्का विशाल खंडारे, शिर्ला पट्टे अमराई येथील मिरर गोपाल चव्हाण, सना निर्दोष राजिक, दुर्गेश उमेश गाडगे, समायरा फिरदोस वसिमोद्दिन, बागायत पातूरचे प्रणव शिवाजी कुकडकर, विनीत दिनेश हिरळकार, दिग्रस बु.चेओम विनायक शेळके, तेजल शिवहरी गवई, तुंलगा खु.चे प्रांजली सुभाष सोनोने, मळसूरचे रुपेश पळसकर, अडगावचे लक्ष्मी राजेश शिरसाट, अडगावचे प्रवीण सुरेश खरात, पांगराचे आरुषी सुनील राठोड, सावरगावचे जयकुमार मनोहर चव्हाण, अंबाशीचे रितेश विजय डांगे, कार्लाचे संदेश कैलास चव्हाण, पिंपळडोळीचे राहुल गजानन खुळे, पाचरणचे प्रथमेश बंडू ससाने, पळसखेडचे श्‍वेता रोहिदास चव्हाण, प्राप्ती रवींद्र जाधव, बाभूळगावचे नयन योगेश खिल्लारे, आस्था गोरखनाथ खिल्लारे, देऊळगावचे असिका मंगेश राऊत, पूर्वी विनायक उपर्वट, भंडारजची आरुषी धर्मदास इंगळे, भानोसचे विष्णू विठ्ठल राठोड, प्राची संदीप चव्हाण आणि बोडख्याचे अनिकेत आणि ऋतुजा राजेश सरदार आदी बालके कुपोषित आहेत.