शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

पाणंद रस्त्याच्या कामांसाठी अत्यल्प निधी; ३३ जिल्ह्यांसाठी शासनाने दिले ५५ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 13:05 IST

अकोला: शासनाने मोठा गाजावाजा करून ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या सोयीसाठी विविध योजनांचे एकत्रीकरण करत प्रत्येक जिल्ह्यात ‘पालकमंत्री शेत-पाणंद रस्ते योजना’ सुरू केली. त्यासाठी निधी देताना कमालीचा हात आखडता घेतला आहे.

अकोला: शासनाने मोठा गाजावाजा करून ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या सोयीसाठी विविध योजनांचे एकत्रीकरण करत प्रत्येक जिल्ह्यात ‘पालकमंत्री शेत-पाणंद रस्ते योजना’ सुरू केली. त्यासाठी निधी देताना कमालीचा हात आखडता घेतला आहे. राज्यातील ३३ जिल्ह्यासाठी केवळ ५५ कोटी रुपये निधी दिला. रस्ते निर्मितीचा खर्च पाहता त्यातून केवळ १,३७५ किमीचे रस्ते होऊ शकतात. त्यातून जिल्हानिहाय ४१ किमीचे रस्तेच निर्माण होण्याची शक्यता आहे.फेब्रुवारी २०१८ मध्ये नियोजन विभागाने ‘पालकमंत्री शेत-पाणंद रस्ते योजना’ राबवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शेतरस्ता, पाणंद रस्ता अतिक्रमणमुक्त करून कच्चा रस्ता तयार करण्यासाठी राज्यातील ३३ जिल्हाधिकाºयांना ५५ कोटी रुपये निधी २५ मे २०१८ रोजी देण्यात आला. त्यातून प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्री शेत-पाणंद रस्ते निर्मितीचा उपक्रम राबवण्याला आता सुरुवात झाली आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील पालकमंत्र्यांच्या पुढाकारात ही योजना कार्यान्वित होत आहे; मात्र त्यासाठी शासनाकडून प्राप्त निधी पाहता किती गावांमध्ये हा उपक्रम राबवावा, हा प्रश्न अनेक पालकमंत्र्यांपुढे असल्याने हा उपक्रमच थंड बस्त्यात ठेवण्याचा प्रयत्न सर्वच जिल्ह्यांमध्ये सुरू आहे.३३ जिल्ह्यांमध्ये ५५ कोटींपैकी किती निधी मिळाला, यावरच त्या जिल्ह्यातील शेत-पाणंद रस्त्यांची किती किलोमीटरची कामे होतील, हे ठरले आहे. रस्त्यावरील अतिक्रमण काढणे, त्यासाठी उत्खनन करणे, त्यातील निघणारा मुरूम किंवा दगड रस्त्यावर टाकणे, त्याची दबाई करणे, तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूने निर्माण होणाºया चरातून पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी सिमेंट पाइप उपलब्ध करणे, ही सर्व कामे पाहता प्रती एक किमी रस्त्यासाठी किमान ४ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. एक किमी रस्त्यासाठी होणारा खर्च, तसेच जिल्ह्यात मिळालेला निधी हे प्रमाण पाहता प्रत्येक जिल्ह्यात जास्तीत जास्त ६० किमीचे रस्ते निर्माण होतील, अशी परिस्थिती आहे.

शेकडो गावांचे समाधान कसे होणारप्रत्येक जिल्ह्यात गावांची संख्या शेकडो असल्याने ६० किमिचे रस्ते किती गावांत करावे, या विवंचनेत पालकमंत्री, रोजगार हमी योजना विभाग आहे. त्यामुळे या घोळातच हा उपक्रम सुरू करण्यास टाळाटाळ होत आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाgovernment schemeसरकारी योजनाfundsनिधी