शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणीकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
3
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
4
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
5
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
6
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
7
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
8
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
9
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
10
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!
11
Smriti Mandhana: 'वनडे क्वीन'ची 'परफेक्ट कपल गोल' सेट करणारी लव्हस्टोरी! पलाशसोबतचा मैदानातील 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
13
नवरीच्या वडिलांनी लढवली शक्कल; लग्नात कपड्यांवरच लावला QR कोड, पाहुण्यांनी स्कॅन केलं अन्...
14
भारतातील आघाडीचा टूथपेस्ट ब्रँड 'कोलगेट' आता लोक खरेदी करत नाहीयेत? विक्रीत सातत्यानं घट, जाणून घ्या कारण
15
PPF, EPF की GPF? तुमच्या निवृत्तीसाठी कोणती योजना चांगली? तिन्हींमध्ये नेमका काय फरक?
16
Jaipur Accident: डंपर बनला काळ! कारला धडक देत ५ वाहनांना उडवले, ५० जणांना चिरडले, १० जणांचा मृत्यू   
17
बापरे! तब्बल ८८ कोटीला एक टॉयलेट सीट विकतोय 'हा' माणूस; अखेर इतकी महाग का आहे?
18
‘हर-मन-की बात’... कुशीत ट्रॉफी, आणि टी-शर्टवरील खोडलेला ‘A Gentleman’s’ शब्दासह दिलेला मेसेज चर्चेत
19
टेक फंडांचा एका वर्षात निगेटिव्ह परतावा! 'या' ५ योजनांमध्ये सर्वाधिक नुकसान, गुंतवणूकदारांनी काय करावे?
20
"तेव्हा वाचलो पण आता प्रत्येक दिवस..."; अहमदाबाद विमान दुर्घटनेतून बचावलेल्या एकमेव व्यक्तीला 'या' गोष्टीचं दुःख!

एमआयएमचा जहाल विचार मान्य नाही - खासदार राजु शेट्टी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 14:23 IST

भाजपाच्या विरोधात व्यापक आघाडी निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे मात्र त्याचा अर्थ एमआयएमचा जहाल विचार आम्हाला मान्य आहे असा होत नाही अशी स्पष्ट भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजु शेट्टी यांनी मांडली.

अकोला: स्वाभिमानी शेतकरी संघटना ही शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लढणारी जिवंत चळवळ आहे. या चळवळीची विचारधारा ही संविधानावर विश्वास ठेवणारी आहे. आपले संविधान हे कुठल्याही जहाल विचारांना स्विकारत नाही. त्यामुळे भाजपा सोबत जातांना आम्हाला भाजपाचा जहाल विचार कधीही मान्य नव्हताच शेतकरी हिताच्या मुद्यावर त्यांना साथ दिली. तीच भूमिका एमआयएम सोबतची राहिल. अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत आघाडी बाबत ६ आॅक्टोबरला चर्चा आहे त्या चर्चेमध्ये भाजपाच्या विरोधात व्यापक आघाडी निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे मात्र त्याचा अर्थ एमआयएमचा जहाल विचार आम्हाला मान्य आहे असा होत नाही अशी स्पष्ट भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजु शेट्टी यांनी मांडली. कापूस सोयाबीन परिषदांच्या निमित्ताने विदर्भ दौºयावर असलेल्या खा. राजु शेट्टी यांनी बुधवारी ‘लोकमत’ कार्यालयाला भेट दिली. यावेळी संपादकीय सहकाºयांसोबत त्यांनी संवाद साधला.

भाजपा सरकारने शेतकºयांच्या विश्वासघात केला आहे. सध्या सरकारच्या विरोधात प्रचंड रोष आहे. त्यामुळे भाजपाला पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येऊन व्यापक आघाडी निर्माण करावी असा आमचा प्रयत्न आहे. त्याच प्रयत्नांचा भाग म्हणून अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत सध्या चर्चेचा प्रस्ताव दिला आहे. अ‍ॅड.आंबेडकर यांची एमआयएम सोबत मैत्री जाहिर झाली आहे. त्याचा कुठलाही परिणाम या चर्चेवर होणार नाही. मुळातच भाजपाच्या विरोधात व्यापक आघाडी करायची असेल तर सर्वच पक्षांना त्याचे कडवे व जहाल विचार बाजुला ठेवून किमान समान कार्यक्रमावर एक त्र यावे लागेल. त्याच दृष्टीने अ‍ॅड. आंबेडकरांसोबत आम्ही चर्चा करणार आहोत असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रवीकांत तुपकर हे उपस्थित होते. महात्मा गांधीचा जप करणारे मोदी हे हिटलरचमहात्मा गांधींचे नाव घेऊन देशभर स्वच्छतेचा जागर करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रत्यक्षात हिटलरच आहे अशी टीका खा.राजु शेटटी यांनी केली. देशाची वाटचाल सध्या एक पक्षीय अशी होत आहे हे लोकशाहीला घातक आहे. त्यामुळे लोकशाही, संविधान, धर्मनिरपेक्षता धोक्यात आहे असे ज्यांना वाटते त्यांनी एकत्र येऊन लढा देण्याची गरज आहे. असे ते म्हणाले.

टॅग्स :AkolaअकोलाRaju Shettyराजू शेट्टीSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना