शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

एमआयएमचा जहाल विचार मान्य नाही - खासदार राजु शेट्टी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 14:23 IST

भाजपाच्या विरोधात व्यापक आघाडी निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे मात्र त्याचा अर्थ एमआयएमचा जहाल विचार आम्हाला मान्य आहे असा होत नाही अशी स्पष्ट भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजु शेट्टी यांनी मांडली.

अकोला: स्वाभिमानी शेतकरी संघटना ही शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लढणारी जिवंत चळवळ आहे. या चळवळीची विचारधारा ही संविधानावर विश्वास ठेवणारी आहे. आपले संविधान हे कुठल्याही जहाल विचारांना स्विकारत नाही. त्यामुळे भाजपा सोबत जातांना आम्हाला भाजपाचा जहाल विचार कधीही मान्य नव्हताच शेतकरी हिताच्या मुद्यावर त्यांना साथ दिली. तीच भूमिका एमआयएम सोबतची राहिल. अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत आघाडी बाबत ६ आॅक्टोबरला चर्चा आहे त्या चर्चेमध्ये भाजपाच्या विरोधात व्यापक आघाडी निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे मात्र त्याचा अर्थ एमआयएमचा जहाल विचार आम्हाला मान्य आहे असा होत नाही अशी स्पष्ट भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजु शेट्टी यांनी मांडली. कापूस सोयाबीन परिषदांच्या निमित्ताने विदर्भ दौºयावर असलेल्या खा. राजु शेट्टी यांनी बुधवारी ‘लोकमत’ कार्यालयाला भेट दिली. यावेळी संपादकीय सहकाºयांसोबत त्यांनी संवाद साधला.

भाजपा सरकारने शेतकºयांच्या विश्वासघात केला आहे. सध्या सरकारच्या विरोधात प्रचंड रोष आहे. त्यामुळे भाजपाला पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येऊन व्यापक आघाडी निर्माण करावी असा आमचा प्रयत्न आहे. त्याच प्रयत्नांचा भाग म्हणून अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत सध्या चर्चेचा प्रस्ताव दिला आहे. अ‍ॅड.आंबेडकर यांची एमआयएम सोबत मैत्री जाहिर झाली आहे. त्याचा कुठलाही परिणाम या चर्चेवर होणार नाही. मुळातच भाजपाच्या विरोधात व्यापक आघाडी करायची असेल तर सर्वच पक्षांना त्याचे कडवे व जहाल विचार बाजुला ठेवून किमान समान कार्यक्रमावर एक त्र यावे लागेल. त्याच दृष्टीने अ‍ॅड. आंबेडकरांसोबत आम्ही चर्चा करणार आहोत असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रवीकांत तुपकर हे उपस्थित होते. महात्मा गांधीचा जप करणारे मोदी हे हिटलरचमहात्मा गांधींचे नाव घेऊन देशभर स्वच्छतेचा जागर करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रत्यक्षात हिटलरच आहे अशी टीका खा.राजु शेटटी यांनी केली. देशाची वाटचाल सध्या एक पक्षीय अशी होत आहे हे लोकशाहीला घातक आहे. त्यामुळे लोकशाही, संविधान, धर्मनिरपेक्षता धोक्यात आहे असे ज्यांना वाटते त्यांनी एकत्र येऊन लढा देण्याची गरज आहे. असे ते म्हणाले.

टॅग्स :AkolaअकोलाRaju Shettyराजू शेट्टीSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना