शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
2
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
3
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
4
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
6
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
7
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
8
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
9
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
10
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
11
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
12
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
13
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
14
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
15
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
16
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
17
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
18
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
19
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
20
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?

मध्यान्ह भोजन : विद्यार्थ्यांना उपाशी ठेवल्यानंतरही देयकाची उधळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 14:02 IST

केवळ कागदोपत्री पुरवठा झालेल्या आहाराचे देयक अदा करताना आता संबंधित कंत्राटदारांवर कोट्यवधींची उधळण करण्याचा प्रकार घडत आहे.

- सदानंद सिरसाटअकोला : दुष्काळी परिस्थितीत शाळेतील विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन द्या, असा आदेश असताना राज्यातील १४६७९ गावांत आहार देण्यातच आला नाही. आता केवळ कागदोपत्री पुरवठा झालेल्या त्या आहाराचे देयक अदा करताना आता संबंधित कंत्राटदारांवर कोट्यवधींची उधळण करण्याचा प्रकार घडत आहे. त्यासाठी कंत्राटदारांनी देयकेही सादर केली असून, ती अदा केली जात आहेत.गेल्यावर्षीच्या हंगामात २०१७-१८ मध्ये पिकांची पैसेवारी ५० पेक्षा कमी असलेल्या राज्यातील हजारो गावांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला. त्या गावांमध्ये करावयाच्या उपाययोजनांसाठी शासनाने २८ फेब्रुवारी २०१८ रोजी आदेश दिला. ठरल्याप्रमाणे असलेल्या उपाययोजना त्या-त्या विभागाने राबविण्याची जबाबदारी आहे. त्यानुसार राज्यातील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना एप्रिल ते जून २०१८ या काळात (६७ दिवस) आहार देण्याची तयारी शिक्षण विभागाने केली. प्राथमिक शिक्षण संचालक सुनील चौहान यांनी सर्व जिल्हा परिषदांना आहार देण्यासाठी तांदूळ आणि निधीची मागणी करण्याचे पत्र १४ मार्च रोजी दिले. त्यातच मागणीअभावी तांदूळ किंवा निधी न मिळाल्यास विद्यार्थी पोषण आहारापासून वंचित राहतील. त्यावर जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्याचेही बजावले. राज्यातील शिक्षणाधिकाऱ्यांनी मागणी केलेल्या हजारो टन तांदळाचा दाणाही आॅगस्ट २०१८ पर्यंत कोणत्याच जिल्ह्यात पोहोचलेला नव्हता, हे विशेष. १४६७९ गावांतील लाखो विद्यार्थ्यांसाठी आहारच शिजला नाही. ही परिस्थिती असताना त्या सुटीच्या काळात आहार वाटप केल्याचे कागदोपत्री दाखवून शासनाचा कोट्यवधींचा निधी लाटण्याचा प्रकार घडत आहे.

केंद्र शासनाने तांदूळच दिला नव्हता...दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना आहार देण्यासाठी तांदळाचा पुरवठा केंद्र शासनाकडून भारतीय खाद्य निगममार्फत केला जातो; मात्र तांदूळच मिळाला नव्हता. त्यानंतर अकोला जिल्ह्यासाठी ११२.१६ क्विंटल तांदूळ देण्यात आला. त्यातून शिजविण्यात आलेल्या आहार पुरवठ्यापोटी कोट्यवधींची देयकेही अदा केली जात आहेत. विशेष म्हणजे, ज्या गावांमध्ये आहार वाटप झाला नाही, तेथीलही देयक अदा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

उन्हाळी सुट्यांत ८३ हजार विद्यार्थ्यांची उपस्थितीइयत्ता विद्यार्थीपहिली ते पाचवी ६४७०७सहावी ते आठवी १९१९८ विभागनिहाय दुष्काळी गावेविभाग                            गावांची संख्याअमरावती                       ६५२४नागपूर                           ३२७५औरंगाबाद                      ३५७७कोल्हापूर                           ३०१नाशिक                           १००२

 

टॅग्स :AkolaअकोलाSchoolशाळा