शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
4
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
5
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
6
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
7
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
8
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
9
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
10
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
11
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
12
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
13
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
14
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
15
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
16
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
17
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
18
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
19
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
20
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट

मध्यान्ह भोजन : विद्यार्थ्यांना उपाशी ठेवल्यानंतरही देयकाची उधळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 14:02 IST

केवळ कागदोपत्री पुरवठा झालेल्या आहाराचे देयक अदा करताना आता संबंधित कंत्राटदारांवर कोट्यवधींची उधळण करण्याचा प्रकार घडत आहे.

- सदानंद सिरसाटअकोला : दुष्काळी परिस्थितीत शाळेतील विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन द्या, असा आदेश असताना राज्यातील १४६७९ गावांत आहार देण्यातच आला नाही. आता केवळ कागदोपत्री पुरवठा झालेल्या त्या आहाराचे देयक अदा करताना आता संबंधित कंत्राटदारांवर कोट्यवधींची उधळण करण्याचा प्रकार घडत आहे. त्यासाठी कंत्राटदारांनी देयकेही सादर केली असून, ती अदा केली जात आहेत.गेल्यावर्षीच्या हंगामात २०१७-१८ मध्ये पिकांची पैसेवारी ५० पेक्षा कमी असलेल्या राज्यातील हजारो गावांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला. त्या गावांमध्ये करावयाच्या उपाययोजनांसाठी शासनाने २८ फेब्रुवारी २०१८ रोजी आदेश दिला. ठरल्याप्रमाणे असलेल्या उपाययोजना त्या-त्या विभागाने राबविण्याची जबाबदारी आहे. त्यानुसार राज्यातील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना एप्रिल ते जून २०१८ या काळात (६७ दिवस) आहार देण्याची तयारी शिक्षण विभागाने केली. प्राथमिक शिक्षण संचालक सुनील चौहान यांनी सर्व जिल्हा परिषदांना आहार देण्यासाठी तांदूळ आणि निधीची मागणी करण्याचे पत्र १४ मार्च रोजी दिले. त्यातच मागणीअभावी तांदूळ किंवा निधी न मिळाल्यास विद्यार्थी पोषण आहारापासून वंचित राहतील. त्यावर जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्याचेही बजावले. राज्यातील शिक्षणाधिकाऱ्यांनी मागणी केलेल्या हजारो टन तांदळाचा दाणाही आॅगस्ट २०१८ पर्यंत कोणत्याच जिल्ह्यात पोहोचलेला नव्हता, हे विशेष. १४६७९ गावांतील लाखो विद्यार्थ्यांसाठी आहारच शिजला नाही. ही परिस्थिती असताना त्या सुटीच्या काळात आहार वाटप केल्याचे कागदोपत्री दाखवून शासनाचा कोट्यवधींचा निधी लाटण्याचा प्रकार घडत आहे.

केंद्र शासनाने तांदूळच दिला नव्हता...दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना आहार देण्यासाठी तांदळाचा पुरवठा केंद्र शासनाकडून भारतीय खाद्य निगममार्फत केला जातो; मात्र तांदूळच मिळाला नव्हता. त्यानंतर अकोला जिल्ह्यासाठी ११२.१६ क्विंटल तांदूळ देण्यात आला. त्यातून शिजविण्यात आलेल्या आहार पुरवठ्यापोटी कोट्यवधींची देयकेही अदा केली जात आहेत. विशेष म्हणजे, ज्या गावांमध्ये आहार वाटप झाला नाही, तेथीलही देयक अदा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

उन्हाळी सुट्यांत ८३ हजार विद्यार्थ्यांची उपस्थितीइयत्ता विद्यार्थीपहिली ते पाचवी ६४७०७सहावी ते आठवी १९१९८ विभागनिहाय दुष्काळी गावेविभाग                            गावांची संख्याअमरावती                       ६५२४नागपूर                           ३२७५औरंगाबाद                      ३५७७कोल्हापूर                           ३०१नाशिक                           १००२

 

टॅग्स :AkolaअकोलाSchoolशाळा