शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
4
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
5
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
6
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
7
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
8
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
9
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
10
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
11
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
12
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
13
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
14
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
15
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
16
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
17
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
18
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
19
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
20
Sukesh Chandrashekhar : "२१७ कोटी देण्यास तयार, पण...", महाठग सुकेश चंद्रशेखरचा मास्टरस्ट्रोक; खंडणी प्रकरणात मोठी ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

मध्यान्ह भोजन : विद्यार्थ्यांना उपाशी ठेवल्यानंतरही देयकाची उधळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 14:02 IST

केवळ कागदोपत्री पुरवठा झालेल्या आहाराचे देयक अदा करताना आता संबंधित कंत्राटदारांवर कोट्यवधींची उधळण करण्याचा प्रकार घडत आहे.

- सदानंद सिरसाटअकोला : दुष्काळी परिस्थितीत शाळेतील विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन द्या, असा आदेश असताना राज्यातील १४६७९ गावांत आहार देण्यातच आला नाही. आता केवळ कागदोपत्री पुरवठा झालेल्या त्या आहाराचे देयक अदा करताना आता संबंधित कंत्राटदारांवर कोट्यवधींची उधळण करण्याचा प्रकार घडत आहे. त्यासाठी कंत्राटदारांनी देयकेही सादर केली असून, ती अदा केली जात आहेत.गेल्यावर्षीच्या हंगामात २०१७-१८ मध्ये पिकांची पैसेवारी ५० पेक्षा कमी असलेल्या राज्यातील हजारो गावांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला. त्या गावांमध्ये करावयाच्या उपाययोजनांसाठी शासनाने २८ फेब्रुवारी २०१८ रोजी आदेश दिला. ठरल्याप्रमाणे असलेल्या उपाययोजना त्या-त्या विभागाने राबविण्याची जबाबदारी आहे. त्यानुसार राज्यातील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना एप्रिल ते जून २०१८ या काळात (६७ दिवस) आहार देण्याची तयारी शिक्षण विभागाने केली. प्राथमिक शिक्षण संचालक सुनील चौहान यांनी सर्व जिल्हा परिषदांना आहार देण्यासाठी तांदूळ आणि निधीची मागणी करण्याचे पत्र १४ मार्च रोजी दिले. त्यातच मागणीअभावी तांदूळ किंवा निधी न मिळाल्यास विद्यार्थी पोषण आहारापासून वंचित राहतील. त्यावर जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्याचेही बजावले. राज्यातील शिक्षणाधिकाऱ्यांनी मागणी केलेल्या हजारो टन तांदळाचा दाणाही आॅगस्ट २०१८ पर्यंत कोणत्याच जिल्ह्यात पोहोचलेला नव्हता, हे विशेष. १४६७९ गावांतील लाखो विद्यार्थ्यांसाठी आहारच शिजला नाही. ही परिस्थिती असताना त्या सुटीच्या काळात आहार वाटप केल्याचे कागदोपत्री दाखवून शासनाचा कोट्यवधींचा निधी लाटण्याचा प्रकार घडत आहे.

केंद्र शासनाने तांदूळच दिला नव्हता...दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना आहार देण्यासाठी तांदळाचा पुरवठा केंद्र शासनाकडून भारतीय खाद्य निगममार्फत केला जातो; मात्र तांदूळच मिळाला नव्हता. त्यानंतर अकोला जिल्ह्यासाठी ११२.१६ क्विंटल तांदूळ देण्यात आला. त्यातून शिजविण्यात आलेल्या आहार पुरवठ्यापोटी कोट्यवधींची देयकेही अदा केली जात आहेत. विशेष म्हणजे, ज्या गावांमध्ये आहार वाटप झाला नाही, तेथीलही देयक अदा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

उन्हाळी सुट्यांत ८३ हजार विद्यार्थ्यांची उपस्थितीइयत्ता विद्यार्थीपहिली ते पाचवी ६४७०७सहावी ते आठवी १९१९८ विभागनिहाय दुष्काळी गावेविभाग                            गावांची संख्याअमरावती                       ६५२४नागपूर                           ३२७५औरंगाबाद                      ३५७७कोल्हापूर                           ३०१नाशिक                           १००२

 

टॅग्स :AkolaअकोलाSchoolशाळा