शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

शरीराच्या कॅन्सरपेक्षा मनाचा कॅन्सर सर्वात घातक - डॉ. अविनाश सावजी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 10:39 IST

शरीराच्या कॅन्सरपेक्षा मनाचा कॅन्सर सर्वात घातक असून, तो दूर झाला पाहिजे. यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत प्रसिद्ध समाजसेवक प्रयास सेवांकुर अमरावतीचे डॉ. अविनाश सावजी यांनी व्यक्त केले.

अकोला: गत काही वर्षांपासून कॅन्सरचा आजार सातत्याने वाढत आहे. त्यासाठी समाजामध्ये जनजागृती आवश्यक आहे. कॅन्सरच्या आजाराशी लढा देण्यात यशस्वी झालेल्या योद्ध्यांच्या अनुभवाद्वारे समाजामध्ये जनजागृतीचा प्रयत्न सुरू आहे. शरीराच्या कॅन्सरपेक्षा मनाचा कॅन्सर सर्वात घातक असून, तो दूर झाला पाहिजे. यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत प्रसिद्ध समाजसेवक प्रयास सेवांकुर अमरावतीचे डॉ. अविनाश सावजी यांनी व्यक्त केले.प्रयास सेवांकुर अमरावती व आरंभ संस्था अहमदनगरच्यावतीने अहमदनगर ते अमरावतीदरम्यान कॅन्सर प्रबोधन यात्रेला ४ फेब्रुवारी नगर येथून सुरुवात झाली. ही यात्रा शुक्रवारी अकोल्यात आली होती. त्यावेळी पत्रपरिषदेत ते बोलत होते.समाजामध्ये कॅन्सरच्या आजाराविषयी जनजागृती व्हावी, यासाठी आरंभचे प्रदीप काकडे यांनी कॅन्सरशी यशस्वी लढा देणारे गीता पोळ (औरंगाबाद), शरीफ शेख, वैशाली वैराडकर (बुलडाणा) यांना घेऊन ही कॅन्सर प्रबोधन यात्रा काढली आहे. असे सांगत, डॉ. अविनाश सावजी यांनी, कॅन्सरच्या आजारासाठी समाजामध्ये जनजागृती झाली पाहिजे, यासाठी यात्रेच्या माध्यमातून आम्ही औरंगाबाद, जालना, अकोल्यातील संत तुकाराम हॉस्पिटलला भेटी दिल्या. पाच वैद्यकीय महाविद्यालयांनासुद्धा भेट दिली. यासोबतच शाळा, महाविद्यालयांमध्ये जाऊन जनजागृती करण्यात येत आहे. स्तन, मुख आणि शरीराचा कॅन्सर गंभीर विषय आहे. असे त्यांनी सांगितले कॅन्सर योद्धा गीता पोळ यांनी स्तनाचा कॅन्सर झाल्यानंतरही त्यातून सकारात्मक विचारातून बाहेर पडले. आता कॅन्सर झालेल्या महिलांना एकत्र करून त्यांना कॅन्सरवर मात करण्यासाठी प्रेरित करीत असल्याचे सांगितले. डॉ. सावजी यांनी, कॅन्सरवर मात करण्यासाठी शासनाने कॅन्सर आजारातून बरे झालेल्यांना रुग्ण समुपदेशनाचे काम दिले तर त्याचा फायदा होईल, असे सांगितले. पत्रपरिषदेला रा.तो. आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आशुतोष कुळकर्णी, डॉ. सुनील बिहाडे, डॉ. राजेंद्र मेंडकी, डॉ. दिलीप मानकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी) 

 

टॅग्स :Akolaअकोलाcancerकर्करोगHealthआरोग्य