शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

शरीराच्या कॅन्सरपेक्षा मनाचा कॅन्सर सर्वात घातक - डॉ. अविनाश सावजी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 10:39 IST

शरीराच्या कॅन्सरपेक्षा मनाचा कॅन्सर सर्वात घातक असून, तो दूर झाला पाहिजे. यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत प्रसिद्ध समाजसेवक प्रयास सेवांकुर अमरावतीचे डॉ. अविनाश सावजी यांनी व्यक्त केले.

अकोला: गत काही वर्षांपासून कॅन्सरचा आजार सातत्याने वाढत आहे. त्यासाठी समाजामध्ये जनजागृती आवश्यक आहे. कॅन्सरच्या आजाराशी लढा देण्यात यशस्वी झालेल्या योद्ध्यांच्या अनुभवाद्वारे समाजामध्ये जनजागृतीचा प्रयत्न सुरू आहे. शरीराच्या कॅन्सरपेक्षा मनाचा कॅन्सर सर्वात घातक असून, तो दूर झाला पाहिजे. यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत प्रसिद्ध समाजसेवक प्रयास सेवांकुर अमरावतीचे डॉ. अविनाश सावजी यांनी व्यक्त केले.प्रयास सेवांकुर अमरावती व आरंभ संस्था अहमदनगरच्यावतीने अहमदनगर ते अमरावतीदरम्यान कॅन्सर प्रबोधन यात्रेला ४ फेब्रुवारी नगर येथून सुरुवात झाली. ही यात्रा शुक्रवारी अकोल्यात आली होती. त्यावेळी पत्रपरिषदेत ते बोलत होते.समाजामध्ये कॅन्सरच्या आजाराविषयी जनजागृती व्हावी, यासाठी आरंभचे प्रदीप काकडे यांनी कॅन्सरशी यशस्वी लढा देणारे गीता पोळ (औरंगाबाद), शरीफ शेख, वैशाली वैराडकर (बुलडाणा) यांना घेऊन ही कॅन्सर प्रबोधन यात्रा काढली आहे. असे सांगत, डॉ. अविनाश सावजी यांनी, कॅन्सरच्या आजारासाठी समाजामध्ये जनजागृती झाली पाहिजे, यासाठी यात्रेच्या माध्यमातून आम्ही औरंगाबाद, जालना, अकोल्यातील संत तुकाराम हॉस्पिटलला भेटी दिल्या. पाच वैद्यकीय महाविद्यालयांनासुद्धा भेट दिली. यासोबतच शाळा, महाविद्यालयांमध्ये जाऊन जनजागृती करण्यात येत आहे. स्तन, मुख आणि शरीराचा कॅन्सर गंभीर विषय आहे. असे त्यांनी सांगितले कॅन्सर योद्धा गीता पोळ यांनी स्तनाचा कॅन्सर झाल्यानंतरही त्यातून सकारात्मक विचारातून बाहेर पडले. आता कॅन्सर झालेल्या महिलांना एकत्र करून त्यांना कॅन्सरवर मात करण्यासाठी प्रेरित करीत असल्याचे सांगितले. डॉ. सावजी यांनी, कॅन्सरवर मात करण्यासाठी शासनाने कॅन्सर आजारातून बरे झालेल्यांना रुग्ण समुपदेशनाचे काम दिले तर त्याचा फायदा होईल, असे सांगितले. पत्रपरिषदेला रा.तो. आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आशुतोष कुळकर्णी, डॉ. सुनील बिहाडे, डॉ. राजेंद्र मेंडकी, डॉ. दिलीप मानकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी) 

 

टॅग्स :Akolaअकोलाcancerकर्करोगHealthआरोग्य