शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
3
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
4
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
5
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
6
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
7
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
8
Travel : मन मोहून टाकतील असे भारतातील 'हिडन' हिल स्टेशन्स; ९०% लोकांना या जागांबद्दल माहितीच नाही!
9
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
10
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
11
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
12
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
13
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
14
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
15
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
16
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...
17
Smartphones: २४ जीबी रॅम, ७५०० mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; जबरदस्त फोन लॉन्च!
18
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
19
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
20
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!

मेळघाटातील पुनर्वसित आदीवासींचे आंदोलन ३२ दिवसानंतर मागे; काही मागण्या पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2018 13:46 IST

पोपटखेड : शासनाकडून मेळघाट व्याघ्रप्रकल्पातून आकोट तालुक्यात पुनर्वसन करतेवेळी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्याने पुन्हा मेळघाटात जाऊन ठान मांडलेल्या आठ गावांमधील आदिवासींनी काही मागण्या पूर्ण झाल्यामुळे त्यांचे आंदोलन अखेर २६ जानेवारी रोजी मागे घेतले.

ठळक मुद्दे मौजे गुल्लरघाट, धारगड, केलपानी, बारुखेडा, आमोना,सोमठाना बु. , सोमठान खुर्द, नागरतास या गावांचे आकोट तालुक्यात पुनर्वसन करण्यात आले होते.या गावांमधील नागरिकांनी त्यांना सुविधा मिळत नसल्याचा निषेध करीत २५ डिसेम्बर २०१७ रोजी आमोना मार्गे पोच मार्गाने मेळघाटातील पूर्वीच्या गावी जाऊन ठान मांडले. गत ३२ दिवसांपासून आपल्या पुर्वीच्या गावांमध्ये ठाण मांडून असलेल्या आदीवासींनी शांततेने आंदोलन करीत आपल्या मागण्या काही प्रमाणात पुर्ण करण्यात यश मिळविले आहे.

पोपटखेड (जि. अकोला) : शासनाकडून मेळघाट व्याघ्रप्रकल्पातून आकोट तालुक्यात पुनर्वसन करतेवेळी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्याने पुन्हा मेळघाटात जाऊन ठान मांडलेल्या आठ गावांमधील आदिवासींनी काही मागण्या पूर्ण झाल्यामुळे त्यांचे आंदोलन अखेर २६ जानेवारी रोजी मागे घेतले.मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील अतिसंरक्षीत भागातील मौजे गुल्लरघाट, धारगड, केलपानी, बारुखेडा, आमोना,सोमठाना बु. , सोमठान खुर्द, नागरतास या गावांचे आकोट तालुक्यात पुनर्वसन करण्यात आले होते.  या पुनर्वासित गावांमधील नागरिकांनी शासनाने आश्वासीत केल्याप्रमाणे शेती व इतर सुविधा मिळत नसल्याचा निषेध करीत २५ डिसेम्बर २०१७ रोजी आमोना मार्गे पोच मार्गाने मेळघाटातील पूर्वीच्या गावी जाऊन ठान मांडले. गत ३२ दिवसांपासून आपल्या पुर्वीच्या गावांमध्ये ठाण मांडून असलेल्या आदीवासींनी शांततेने आंदोलन करीत आपल्या मागण्या काही प्रमाणात पुर्ण करण्यात यश मिळविले आहे. प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारी २०१८ रोजी आमदार बच्चू कडु यांच्या उपस्थितीत आपले आंदोलन मागे घेतल्याचे जाहीर केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुनर्वासित अदिवासिंना अडीच एकर शेत देण्याचे आश्वासन दिले होते .परन्तु शासन निर्णयप्रमाने ज्या कुटुंबांना १० लाख रुपयांचे पॅकेज मिळालेल्या कुटुंबांना एक एकर शेती मिळणार आहे. तसेच आकोट तालुक्यातील पुनर्वासित गावात स्थानिक सुख सुविधा करीता जो निधि पुनर्वासित आदिवासींच्या खात्यामधुन कपात केला तो निधि परत मिळणार आहे. तसेच अठरा वर्षवरील जे पात्र व्यक्ति आहेत त्यांना सुद्धा लाभ मिळणार आहे. पुनर्वसन होताना पूर्वीचे घर होते त्यांचे सुद्धा पुनर्मूल्यांकन होणार आहे. अशा प्रकारे पुनर्वासित आदिवासींच्या आंदोलनाला यश मिळाले आहे.

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणMelghatमेळघाट