शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
3
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
4
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
5
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
6
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
7
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
8
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
9
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
10
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
11
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
12
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
13
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
14
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
15
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
16
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
17
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
18
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
19
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
20
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव

मेळघाटातील पुनर्वसित आदीवासींचे आंदोलन ३२ दिवसानंतर मागे; काही मागण्या पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2018 13:46 IST

पोपटखेड : शासनाकडून मेळघाट व्याघ्रप्रकल्पातून आकोट तालुक्यात पुनर्वसन करतेवेळी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्याने पुन्हा मेळघाटात जाऊन ठान मांडलेल्या आठ गावांमधील आदिवासींनी काही मागण्या पूर्ण झाल्यामुळे त्यांचे आंदोलन अखेर २६ जानेवारी रोजी मागे घेतले.

ठळक मुद्दे मौजे गुल्लरघाट, धारगड, केलपानी, बारुखेडा, आमोना,सोमठाना बु. , सोमठान खुर्द, नागरतास या गावांचे आकोट तालुक्यात पुनर्वसन करण्यात आले होते.या गावांमधील नागरिकांनी त्यांना सुविधा मिळत नसल्याचा निषेध करीत २५ डिसेम्बर २०१७ रोजी आमोना मार्गे पोच मार्गाने मेळघाटातील पूर्वीच्या गावी जाऊन ठान मांडले. गत ३२ दिवसांपासून आपल्या पुर्वीच्या गावांमध्ये ठाण मांडून असलेल्या आदीवासींनी शांततेने आंदोलन करीत आपल्या मागण्या काही प्रमाणात पुर्ण करण्यात यश मिळविले आहे.

पोपटखेड (जि. अकोला) : शासनाकडून मेळघाट व्याघ्रप्रकल्पातून आकोट तालुक्यात पुनर्वसन करतेवेळी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्याने पुन्हा मेळघाटात जाऊन ठान मांडलेल्या आठ गावांमधील आदिवासींनी काही मागण्या पूर्ण झाल्यामुळे त्यांचे आंदोलन अखेर २६ जानेवारी रोजी मागे घेतले.मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील अतिसंरक्षीत भागातील मौजे गुल्लरघाट, धारगड, केलपानी, बारुखेडा, आमोना,सोमठाना बु. , सोमठान खुर्द, नागरतास या गावांचे आकोट तालुक्यात पुनर्वसन करण्यात आले होते.  या पुनर्वासित गावांमधील नागरिकांनी शासनाने आश्वासीत केल्याप्रमाणे शेती व इतर सुविधा मिळत नसल्याचा निषेध करीत २५ डिसेम्बर २०१७ रोजी आमोना मार्गे पोच मार्गाने मेळघाटातील पूर्वीच्या गावी जाऊन ठान मांडले. गत ३२ दिवसांपासून आपल्या पुर्वीच्या गावांमध्ये ठाण मांडून असलेल्या आदीवासींनी शांततेने आंदोलन करीत आपल्या मागण्या काही प्रमाणात पुर्ण करण्यात यश मिळविले आहे. प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारी २०१८ रोजी आमदार बच्चू कडु यांच्या उपस्थितीत आपले आंदोलन मागे घेतल्याचे जाहीर केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुनर्वासित अदिवासिंना अडीच एकर शेत देण्याचे आश्वासन दिले होते .परन्तु शासन निर्णयप्रमाने ज्या कुटुंबांना १० लाख रुपयांचे पॅकेज मिळालेल्या कुटुंबांना एक एकर शेती मिळणार आहे. तसेच आकोट तालुक्यातील पुनर्वासित गावात स्थानिक सुख सुविधा करीता जो निधि पुनर्वासित आदिवासींच्या खात्यामधुन कपात केला तो निधि परत मिळणार आहे. तसेच अठरा वर्षवरील जे पात्र व्यक्ति आहेत त्यांना सुद्धा लाभ मिळणार आहे. पुनर्वसन होताना पूर्वीचे घर होते त्यांचे सुद्धा पुनर्मूल्यांकन होणार आहे. अशा प्रकारे पुनर्वासित आदिवासींच्या आंदोलनाला यश मिळाले आहे.

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणMelghatमेळघाट