शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
3
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
4
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
5
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
6
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
7
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
8
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
9
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
10
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
11
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
13
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
14
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
15
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
16
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
17
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
18
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
19
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
20
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
Daily Top 2Weekly Top 5

पुनर्वसित आदिवासींचे जीवन धोक्यातच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 10:43 IST

रोजगार, शेती, आरोग्याच्या समस्या आजही कायम असल्याने शासनाचे आदिवासी विकासाचे धोरण अपयशी ठरत आहे.

- विजय शिंदे  लोकमत न्यूज नेटवर्कअकोट : अकोट तालुक्यात सातपुडा पायथ्याशी असलेल्या आदिवासीबहुल गावातील आदिवासी समाजाच्या समस्या कायम असतानाच मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील आदिवासी गावाचे पुनर्वसन करण्यात आले आहे. आदिवासी गावात शासनाने पुनर्वसन मोबदला दिला; मात्र काहींच्या अशिक्षितपणाचा फायदा घेत अनेकांनी त्यांना पुन्हा कंगाल केल्याचे प्रकार घडले, तर वातावरणात झालेल्या बदलांमुळे विविध आजारांमुळे शेकडो जणांचा मृत्यू झाला. रोजगार, शेती, आरोग्याच्या समस्या आजही कायम असल्याने शासनाचे आदिवासी विकासाचे धोरण अपयशी ठरत आहे.व्याघ्र प्रकल्पातील वनाचे व वन्यजीवांचे व संवर्धन करण्याकरिता मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची २२ फेब्रुवारी १९७४ मध्ये स्थापना करण्यात आली. त्यानंतर या प्रकल्पातील आठ गावांचे पुनर्वसन अकोट उपविभागात करण्यात आले. प्रत्येक कुटुंबाला १० लाख पुनर्वसन मोबदला दिला. त्यानंतर पुनर्वसित आदिवासींचे पिळवणुकीचे अनेक प्रकार समोर आले.या गंभीर प्रकाराकडे शासनाचे, मानवाधिकार विभागासह स्थानिक लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष केले आहे. आदिवासीना बँक व कायद्याचे पूर्णत: ज्ञान नाही. पुनर्वसित ग्रामस्थांना दिलेल्या मोबदल्याचे बॉन्ड बँकेत जमा आहेत. या बॉन्डमधून पैसे लागत असतील, तर आधी उपचाराची सर्व कागदपत्रे, अर्ज वन्य जीव विभागाकडे सादर करावे लागतात.उपचाराकरिता पैसे लागत असल्याचे शिफारसपत्र एसडीओंकडे पाठविण्यात येते. गंभीर आजार असल्यास उपचाराकरिता बॉन्ड तोडण्याची परवानगी एसीएफ व एसडीओ देतात; परंतु बहुतांश आदिवासी ग्रामस्थ या किचकट प्रक्रियेपासून अनभिज्ञ असल्याने आदिवासी बांधवांना अडचणी येतात.

२२८ पुनर्वसित आदिवासी गावकऱ्यांचा मृत्यू!आठही आदिवासी गावांमध्ये आरोग्याच्या कारणाने २२८ पुनर्वसित आदिवासी गावकऱ्यांचा आॅगस्ट २०१७ पर्यंत मृत्यू झाला आहे. त्यानंतर विविध कारणांनी मृत्यूच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. अनेक आदिवासी बांधवांना हक्काचे पैसे न मिळाल्याने उपचाराविना मृत्यू झाला आहे. त्यांचे पैसे लालफीतशाहीत अडकल्यामुळे या आदिवासींचा बळी गेला. त्यामुळे आदिवासी बांधवामध्ये चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :AkolaअकोलाMelghatमेळघाटforest departmentवनविभाग