शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
3
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
4
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
5
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
6
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
7
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?
8
'मुंबईचा फौजदार' सिनेमाचा रिमेक येणार? गश्मीर म्हणाला- "मी सिनेमा बनवेन पण प्राजक्ता माळीला..."
9
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
10
Ritul: मासिक पाळीदरम्यान केस का धुवू नयेत? जाणून घ्या शास्त्र आणि विज्ञान!
11
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
12
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
13
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
14
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
15
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
16
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
17
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
18
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
19
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
20
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...

पुनर्वसित आदिवासींचे जीवन धोक्यातच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 10:43 IST

रोजगार, शेती, आरोग्याच्या समस्या आजही कायम असल्याने शासनाचे आदिवासी विकासाचे धोरण अपयशी ठरत आहे.

- विजय शिंदे  लोकमत न्यूज नेटवर्कअकोट : अकोट तालुक्यात सातपुडा पायथ्याशी असलेल्या आदिवासीबहुल गावातील आदिवासी समाजाच्या समस्या कायम असतानाच मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील आदिवासी गावाचे पुनर्वसन करण्यात आले आहे. आदिवासी गावात शासनाने पुनर्वसन मोबदला दिला; मात्र काहींच्या अशिक्षितपणाचा फायदा घेत अनेकांनी त्यांना पुन्हा कंगाल केल्याचे प्रकार घडले, तर वातावरणात झालेल्या बदलांमुळे विविध आजारांमुळे शेकडो जणांचा मृत्यू झाला. रोजगार, शेती, आरोग्याच्या समस्या आजही कायम असल्याने शासनाचे आदिवासी विकासाचे धोरण अपयशी ठरत आहे.व्याघ्र प्रकल्पातील वनाचे व वन्यजीवांचे व संवर्धन करण्याकरिता मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची २२ फेब्रुवारी १९७४ मध्ये स्थापना करण्यात आली. त्यानंतर या प्रकल्पातील आठ गावांचे पुनर्वसन अकोट उपविभागात करण्यात आले. प्रत्येक कुटुंबाला १० लाख पुनर्वसन मोबदला दिला. त्यानंतर पुनर्वसित आदिवासींचे पिळवणुकीचे अनेक प्रकार समोर आले.या गंभीर प्रकाराकडे शासनाचे, मानवाधिकार विभागासह स्थानिक लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष केले आहे. आदिवासीना बँक व कायद्याचे पूर्णत: ज्ञान नाही. पुनर्वसित ग्रामस्थांना दिलेल्या मोबदल्याचे बॉन्ड बँकेत जमा आहेत. या बॉन्डमधून पैसे लागत असतील, तर आधी उपचाराची सर्व कागदपत्रे, अर्ज वन्य जीव विभागाकडे सादर करावे लागतात.उपचाराकरिता पैसे लागत असल्याचे शिफारसपत्र एसडीओंकडे पाठविण्यात येते. गंभीर आजार असल्यास उपचाराकरिता बॉन्ड तोडण्याची परवानगी एसीएफ व एसडीओ देतात; परंतु बहुतांश आदिवासी ग्रामस्थ या किचकट प्रक्रियेपासून अनभिज्ञ असल्याने आदिवासी बांधवांना अडचणी येतात.

२२८ पुनर्वसित आदिवासी गावकऱ्यांचा मृत्यू!आठही आदिवासी गावांमध्ये आरोग्याच्या कारणाने २२८ पुनर्वसित आदिवासी गावकऱ्यांचा आॅगस्ट २०१७ पर्यंत मृत्यू झाला आहे. त्यानंतर विविध कारणांनी मृत्यूच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. अनेक आदिवासी बांधवांना हक्काचे पैसे न मिळाल्याने उपचाराविना मृत्यू झाला आहे. त्यांचे पैसे लालफीतशाहीत अडकल्यामुळे या आदिवासींचा बळी गेला. त्यामुळे आदिवासी बांधवामध्ये चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :AkolaअकोलाMelghatमेळघाटforest departmentवनविभाग