शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

तूर, हरभरा खरेदीच्या मुद्द्यावर उद्या सहकार मंत्र्यांकडे बैठक - पालकमंत्र्यांची ग्वाही  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 13:49 IST

अकोला : केंद्र सरकारने गत चार वर्षांच्या कालावधीत केलेल्या विविध कामांची माहिती देत, जिल्ह्यातील तूर व हरभरा खरेदीच्या मुद्द्यावर बुधवारी सहकारमंत्र्यांकडे बैठक घेण्यात येणार असल्याची ग्वाही पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सोमवारी दिली.

ठळक मुद्देकेंद्र सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्याच्या पृष्ठभूमिवर अकोल्यातील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जिल्हा मार्केटिंग अधिकारी, जिल्हा उप-निबंधक (सहकारी संस्था ) व संबंधित अधिकाºयांची बैठक घेण्यात येणार असल्याचे पालकमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी स्पष्ट केले.विविध योजना व कार्यक्रम राबवून, सरकारने परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला आहे, असेही पालकमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी सांगितले.

अकोला : केंद्र सरकारने गत चार वर्षांच्या कालावधीत केलेल्या विविध कामांची माहिती देत, जिल्ह्यातील तूर व हरभरा खरेदीच्या मुद्द्यावर बुधवारी सहकारमंत्र्यांकडे बैठक घेण्यात येणार असल्याची ग्वाही पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सोमवारी दिली.केंद्र सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्याच्या पृष्ठभूमिवर अकोल्यातील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ‘नाफेड’मार्फत तूर खरेदी गत १५ मे पासून बंद करण्यात आली आहे; मात्र आॅनलाइन नोंदणी केलेल्या जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांची तूर खरेदी अद्याप बाकी आहे, तसेच खरेदी करण्यात आलेल्या तुरीचे चुकारे अद्याप शेतकºयांना मिळाले नाहीत. त्यानुषंगाने जिल्ह्यातील तूर व हरभरा खरेदी, प्रलंबित चुकारे आणि तूर व हरभरा खरेदीसंदर्भात शेतकºयांच्या तक्रारी इत्यादी मुद्द्यांवर बुधवारी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे जिल्हा मार्केटिंग अधिकारी, जिल्हा उप-निबंधक (सहकारी संस्था ) व संबंधित अधिकाºयांची बैठक घेण्यात येणार असल्याचे पालकमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी स्पष्ट केले. केंद्र सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्याबद्दल, सरकारने केलेल्या कामांची माहिती २५ मे ११ जूनपर्यंत जनतेला देण्यात येणार आहे. त्यामध्ये राज्यातील पालकमंत्री चार वर्षात सरकारने केलेल्या कामांची माहिती जनतेला देणार आहेत, तसेच लाभार्थी आणि बुद्धीजीवींचे संमेलने घेण्यात येणार आहे. लोकांच्या घरापर्यंत पोहोचून सरकारच्या कामांची माहिती देण्यात येणार असल्याचे सांगत, गत चार वर्षात सरकारने केलेल्या कामांची माहिती पालकमंत्र्यांनी दिली. त्यामध्ये प्रामुख्याने प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, सिंचनावर विशेष भर, शेतकºयांना मदतीसाठी ५० टक्के नुकसान भरपाईचा निकष ३५ टक्क्यांवर आणला असून, महिलांसाठी ३६ आठवड्यांची प्रसूती रजा यांसह शिक्षण, आरोग्य, कृषी, कौशल्य विकास अशा विविध योजना व कार्यक्रम राबवून, सरकारने परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला आहे, असेही पालकमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी सांगितले. यावेळी माजी आमदार वसंतराव खोटरे, नारायणराव गव्हाणकर, डॉ.अशोक ओळंबे, हरीश आलीमचंदाणी, माजी महापौर उज्ज्वला देशमुख, अ‍ॅड. मोतीसिंह मोहता, मनोहर हरणे उपस्थित होते.

नेर-धामणा बॅरेजसह जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प लवकरच होतील पूर्ण!बळीराजा संजीवनी योजनेंतर्गत नेर-धामणा बॅरेजसह जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांची कामे लवकरच पूर्ण होतील, असा विश्वास व्यक्त करीत, नेर-धामणा बॅरेजचे काम पूर्ण झाल्यास जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यातील टंचाई परिस्थितीवर मात करण्यास मदत होणार असल्याचे पालकमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी सांगितले. नेर-धामणा बॅरेजच्या कामासाठी ३८ लाखांचा निधी उपलब्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :AkolaअकोलाBJPभाजपा