शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
2
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
3
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
4
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
5
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
6
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
7
Sukesh Chandrashekhar : "२१७ कोटी देण्यास तयार, पण...", महाठग सुकेश चंद्रशेखरचा मास्टरस्ट्रोक; खंडणी प्रकरणात मोठी ऑफर
8
AUS vs ENG: डोक्यात निवृत्तीचा विचार, मनात भीती… आणि त्यानेच सामना फिरवला!
9
कौतुकास्पद! आईने दागिने विकून शिकवलं, १० वेळा अपयश आलं पण लेकाने वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं
10
विराट कोहलीचा VIDEO घेण्यासाठी बस ड्रायव्हरची भन्नाट 'आयडिया', सोशल मीडियावर क्लिप VIRAL
11
राजकारण पेटलं! कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारची बुलडोझर कारवाई; ४०० हून अधिक घरं पाडली
12
शाकंभरी नवरात्र २०२५: शाकंभरी मातेच्या कृपेने 'या' राशींचे उजळणार भाग्य; २०२६ ची होणार स्वप्नवत सुरुवात!
13
"भाजपाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, मतदारांचाही विश्वासघात करेल"; राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मुळीक यांचे टीकास्त्र
14
Battle Of Galwan Teaser: मौत से क्या डरना...! 'बॅटल ऑफ गलवान'चा टीझर, 'या' दिवशी सिनेमा रिलीज होणार
15
जिवलग जीवाचा... विराट कोहली!! स्वत:चीच विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला दिलं एकदम खास 'गिफ्ट'
16
सोन्या-चांदीची भरारी, विदेशींची माघार अन् भारतीयांचा एल्गार! हे वर्ष कोणासाठी ठरलं फायद्याचं
17
जिममध्ये जाणाऱ्यांनो सावधान! १९ वर्षीय विद्यार्थ्याचा प्रोटीन शेक प्यायल्याने मृत्यू; नेमकं काय घडलं?
18
प्रशासनाचा गलथान कारभार! निवडणूक एका ठिकाणी, अधिकाऱ्यांनी प्रक्रिया केली दुसरीकडे; उमेदवाराच्या विजयानंतर शासनाला आली जाग
19
बांगलादेशमध्ये उलटफेर! शेख हसीना यांना विरोध करणारा पक्ष फुटला,जमातमध्ये आश्रय घेतला
20
TATA Steel विरोधात खटला दाखल; १४८ अब्ज रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी, प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आंबेडकरांच्या टाळीला मायावतींकडून प्रतिसाद नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 10:05 IST

राष्टÑीय पातळीवर राजकारण करण्यासाठी अ‍ॅड. आंबेडकरांनी प्रसंगी कम्युनिस्ट नेत्यांची साथ घेतली आहे; मात्र बहुजन नेत्यांना टाळी देण्याचा कधीच प्रयत्न केला नाही.

ठळक मुद्देसीएए-एनआरसीला विरोध करण्यासाठी त्यांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांना जंतर-मंतरवर आमंत्रित केले होते.मंगळवारी झालेल्या धरणे आंदोलनात मायावती सहभागी झाल्या नाहीत. पुढच्या टप्प्यात त्या सहभागी झाल्या, तर भविष्यात हे दोन्ही नेते एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

-  राजेश शेगोकारअकोला: ‘सीएए’, ‘एनआरसी’ला विरोध करण्यासाठी जंतर-मंतरवर आयोजित धरणे आंदोलनात सहभागी होण्यासाठी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी प्रथमच उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री बहन मायावती यांना जाहीरपत्र दिले होते; मात्र मायावतींनी अ‍ॅड. बाळासाहेबांच्या पत्राला प्रतिसाद दिला नसल्याचे समोर आले आहे. राष्टÑीय पातळीवर राजकारण करण्यासाठी अ‍ॅड. आंबेडकरांनी प्रसंगी कम्युनिस्ट नेत्यांची साथ घेतली आहे; मात्र बहुजन नेत्यांना टाळी देण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. या आंदोलनाच्या निमित्ताने मायावतींच्या माध्यमातून बहुजन नेत्यांना टाळी देण्याचा प्रयत्न मानला जात होता.सोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून राजकारणात ‘अकोला पॅटर्न’ निर्माण करून प्रस्थापित राजकीय पक्षांना पर्याय देणाऱ्या अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नावाला राष्ट्रीय पातळीवर वलय आहे. त्यांनी प्रत्येक लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने वेगळा प्रयोग केला. भारिप-बहुजन महासंघ या माध्यमातून त्यांनी राजकारणात सोशल इंजिनिअरिंग राबवून त्यांच्या पक्षाला यश मिळवून दिले. गत लोकसभा निवडणुकीत याच भारिप-बमसंचा विस्तार करीत त्यांनी वंचित बहुजन आघाडीची स्थापना करून धनगर, ओबीसींसह मुस्लीम अशी मोट बांधली. या प्रयोगामुळे वैयक्तिकरीत्या अ‍ॅड. आंबेडकर विजयी होऊ शकले नसले तरी त्यांनी प्रस्थापित राजकीय पक्षांची समीकरणे बिघडविली. हे सर्व प्रयोग राबविताना अ‍ॅड. आंबेडकरांनी राष्टÑीय पातळीवर एखाद्या बहुजन नेत्याला सोबत घेण्याची भूमिका यापूर्वी जाहीरपणे घेतल्याचे दिसत नाही. सीएए-एनआरसीला विरोध करण्यासाठी त्यांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांना जंतर-मंतरवर आमंत्रित केले होते. मायावतींचे उत्तर प्रदेशातील महत्त्व व त्यांचे कार्य याची प्रशंसा करून अ‍ॅड. आंबेडकरांनी त्यांना लिहिलेले पत्र पाहता मायावती यांनी अ‍ॅड.आंबेडकरांना टाळी दिली, तर नव्या राजकीय समीकरणांची मांडणी होऊ शकेल, अशी राजकीय क्षेत्रात चर्चा होती. मंगळवारी झालेल्या धरणे आंदोलनात मायावती सहभागी झाल्या नाहीत; मात्र पुढच्या टप्प्यात त्या सहभागी झाल्या, तर भविष्यात हे दोन्ही नेते एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही. ‘सीएए’, ‘एनआरसी’च्या माध्यमातून बहुजनांचे अधिकारच संपविण्याची तयारी हे सरकार करीत आहे. त्यामुळे अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी बहन मायावतींना पत्र लिहून आमंत्रित केले होते. त्या आजच्या आंदोलनात सहभागी झाल्या नाहीत. कदाचित भविष्यात होतील. आंदोलन तीव्र करीत बहुजनांची ताकद वाढविणे, हाच आमचा प्रयत्न आहे. यामध्ये कुठलेही राजकारण नाही. आधी देश महत्वाचा.

- राजेंद्र पातोडे, राज्य प्रवक्ते वंचित बहूजन आघाडी

 

टॅग्स :PoliticsराजकारणPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरmayawatiमायावतीVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टी